shabd-logo

मल्ल प्रेमयुद्ध भाग 4

18 July 2023

0 पाहिले 0
तिघे ट्रेनच्या बाकड्यावर शांत बसले होते.

" दादा अशी कशी ट्रेन कॅन्सल व्हईल? आज दोघी निघालो नाही तर परवा तिथे पोहचणार कस आणि नाही पोहचलो तर ऍडमिशन कॅन्सल व्हईल. किती मुश्किलीने तिथे ऍडमिशन मिळाली होती. आमदार साहेबांमुळे फ्री मध्ये शिकणार होते मी आणि रत्ना." क्रांतीच्या चेहऱ्यावर चिंतेच जाळ पसरलं होत तसं रत्नाच्या सुद्धा.

आपण फोन करूया तिथे त्यांना सांगू की ट्रेन पावसामुळे 2 दिवस रद्द झाल्या आहेत किंवा आमदार साहेबांकडून फोन गेला तर...?" रत्ना तिच्या डोक्यात येणाऱ्या आयडिया त्या दोघांना सांगत होती.

' हा तस व्हयल... बर आधी घरी चला. रत्ना तू चल आज आमच्या गावाला उद्या सोडतो तुला तस आईला फोन करून सांगू..." दोघीही संतोषच्या गाडीमध्ये बसल्या. दोघीही हिरमुसलेल्या होत्या.

सूरज आँख दिखा ले

आज कल तेरी आँख झुकनी है

तेरे अन्दर है जीतनी आग

यहाँ उससे भी दुगुनी है

सूरज आँख दिखा ले

आज कल तेरी आँख झुकनी है

तेरे अन्दर है जीतनी आग

यहाँ उससे भी दुगुनी है

तलवार हाथ में है

तेरे दे मार सोचना क्यूँ

जब ज़िंदगी है एक ही

दो बार सोचना क्यूँ

मैं परिंदा क्यूँ बनूँ

मुझे आसमाँ बनना है

मैं परिंदा क्यू बनू 

मैं एक पन्ना क्यूँ रहूँ

मुझे दास्ताँ बनना है

मुझे आसमाँ बनना है।

नवीनच रिलीझ झालेल्या सायना पिक्चरमधले हे गाणं क्रांतीला खूप आवडत होते. ती हिरमुसली कि संतोष हे गाणं लावायचा.

दंगल पिक्चरची तर सेंचुरी झाली असेल एवढ्या वेळा बघितला होता. गाण्याचा आवाज जसा वाढला तश्या दोघी खुलल्या मोकळ्या मनाने "मैं परिंदा क्यूँ बनूँ, मुझे आसमाँ बनना है, मैं परिंदा क्यूँ बनूँ, मुझे आसमाँ बनना है" जोरात म्हणायला लागल्या. संध्याकाळ झाली होती. विठुरायाच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम सुरु झाला होता. आज एकादशी असल्यामुळे उपवास सोडायच्या आतच लोकांनी कीर्तनाला हजेरी लावलेली होती. नेहमीच व्हायचे एकादशीला लवकर कीर्तनाचा कार्यक्रम सुरु व्हायचा. ह.भ.प अर्जुनदादा चौधरी म्हणजेच क्रांतीचे दादा होते. गळ्यात वीणा, टाळ डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर चंदन, अबीरचा टीका, शांत मुद्रेत तुकाराम महाराजच्या अभंग गात त्याचा अर्थ सांगत होते. कोणी त्यांना तबल्याची साथ देत होते तर कोणी पेटी वाजवत होते. ऐकणारे इतर सगळे टाळावर ताल धरत होते.

तुकाराम महाराज सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म

विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळं ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत. प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं, त्याचीच संगत आपल्याला आवडते, आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसाचीच संगत करावी. जो स्वत:च्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो, त्याला दूर ठेवणं हेच चांगलं होय. परंपरा अशीच चालत आली आहे. ज्याची संगत भलती-सलती असेल, त्याच्या सहवासाचा त्याग करावा, हीच खरी नीती होय. मग अशी व्यक्ती पिता असो, पुत्र असो, बंधू असो, की आणखी कोणी असो. ज्याचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही, त्याचा सहवास करू नये. आपण वचनाचं, नातिकतेचं, माणूसकीचं सत्य पालन करावं, त्यापेक्षा वेगळं वागू नये. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल, त्यांच्यापासून दूर रहावं. || जय तुकोबाराय||

चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||
ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत
त्यागावरी ||२|| हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि । विजाति संग्रही धरू नये ||३|| तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४|| 

विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल ...

विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल ... सगळे अभंग मन लावून ऐकत होते.

पाटीलवाड्यात सगळे शांततेत जेवत होते. कोणीच कोणासोबत बोलत नव्हते. तेजश्री सगळ्यांना डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांना वाढत होती. संग्रामला तिने आमटी दिली.

"वता सगळं पातेल वतताय ताटात... तेजश्री घाबरली आणि मागं सरकली.

"त्यांच्यावर कशापाई चिडताय ?" सुलोचनाबाई म्हणाल्या.

"आई कधी अक्कल येणार ह्यांना... शिकल्या कश्या ह्या ग्रॅज्युएशन हेच समजत न्हाय." संग्रामने भाकरी आमटीत चुरली. सगळं राग त्या भाकरीवर काढला.

दादा तुम्ही वहिनीला कशाला वरडता माझा राग त्यांच्यावर कशाला काढता. मी जो निर्णय घेतलाय तो इचार करून घेतलाय. आम्ही करू तर त्या पोरीशी लग्न करणार. काहीसुद्धा करा." सगळ्यांचे घास हातात राहिले.

काहीसुद्धा करायची गरज न्हाय आम्ही मागणी घालायला गेल्यावर कोणाची टाप हाय आमच्या वीरला न्हाय म्हणायची." आबांनी डाव्या हाताने मिशीला पीळ दिला.

"आबा जी पोरगी मैदानात पोरासोबत कुस्ती करायला उतरती ती लग्नाला सहज न्हाय म्हणलं. ती कशाला बघ आपण कोण हाय." संग्राम म्हणाले.

॥ आम्ही लिहून देतो गरीब लोकांची पोरगी फुकट श्रीमंतांच्या घरी आना बघा कोण न्हाय म्हणतया . " आबांनी ठेकर दिली.

"व्हय आना घरात पैलवान पुरगी... तेजश्री अन माझ्यासारखी डोक्यावर पदर घेऊन घरभर हिंडली मजी बर" सुलोचना बाईंनी डोक्यावरचा पदर सांभाळत म्हणाल्या."

"ते तुम्ही तुमचं बघा माझं काम झालं मंजी झालं पाहिजे." वीरन हात धुतला अन उठून निघून गेला.

"मंजी तुम्हाला म्हणायचं का कि तुमच्या बायकोपेक्षा हुशार बाई घरात आली न्हाय पाहिजे." आबा म्हणाले.

' तिच्यापेक्षा येडी पोरगी जन्माला आली असल असं वाटत तर न्हाय..." संग्रामने रागाने तेजश्रीकडे बघितलं. तेजश्री रडत वरती गेली.

"सम्राट कशापाई त्यास्नी सतत बोलता... लेकरू होत न्हाय हा काय त्यांचा दोष हाय का ?" सुलोचनाबाई म्हणाल्या.

"मग आमचा हाय व्हय...? पाटलाची औलाद हावूत..." संग्राम रागाने बोलले.

"संग्राम आईबरोबर बोलताय आवाज खाली करून बोलायचं." आबांनी आवाज टाकला तस संग्राम शांत होऊन वर गेले.

तेजश्री रडत बेडवर बसल्या व्हत्या. संग्राम आल्याची चाहूल लागताच त्यांनी डोळे पुसले आणि डोक्यावर पदर घेतला.

"रडा... आयुष्यभर रडत बसा... येत काय त्या शिवाय ? आम्ही जाऊन येतो." संग्राम मागे वळले.

"त्या लताबाईंच्या कोठीवर ना .? जा आम्हाला

"त्या लताबाईंच्या कोठीवर ना...? जा आम्हाला सगळ्या खबरी लागतात." तेजश्रीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि संग्रामकडे डोळे वर करून पहिले. संग्राम तसाच मागे फिरला आणि तेजश्रीचे गाल जोरात धरले.

"लय बोलायचं न्हाय आमच्या समोर कळलं का? व्हय जातो आम्ही लताबाईच्या कोठीवर . आम्हाला आवडती ती. राहती तशी... तुम्ही स्वतःला आरश्यात बघा काय आवडण्यासारखं हाय तुमच्यात." धरलेल्या गालाची पकड अजून घट्ट होती. तेजश्री दुखतंय म्हणून विव्हळत होती, संग्रामचे हात झटकत होती, तरी त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने रागाने तिचे गाल सोडले आणि तीला पलंगावर ढकलले. सगळा चेहरा लाल झाला होता. रागाने संग्राम निघून गेला. ...

लता बाई संग्रामची वाटच बघत होती. लावण्याची खान होत लताबाई... लाल जर्द नववारी, हलका मेकअप आणि लालबुंद लिपस्टिक लावलेली लता संग्रामची वाट बघत होती. पैशांचा खजिना व्हता तिचा संग्राम म्हणजे. 

Bhagyashali raut ची आणखी पुस्तके

1

मल्ल प्रेमयुद्ध भाग 1

17 July 2023
0
0
0

डांगेमैदानात नुसता धिंगाणा सुरु होता. चारही बाजूला पब्लिक आरोळ्या देत होते. क्रांतीने मॅटवर रत्नाला चितपट केले होते. नेहमीप्रमाणं या हि वर्षी क्रांतीने तिच्यापेक्षा जास्त वजनाच्या रत्ना देवरे या मुलील

2

मल्ल प्रेमयुद्ध भाग 2

17 July 2023
0
0
0

संध्याकाळ झाली होती. रायगाव गावात जल्लोषात क्रांतीची मिरवणूक सुरू होती. तालुक्याच्या गावापासून 4 किलोमीटरवर एक छोटं गाव होत. निसर्गाने नटलेलं.... त्याच छोट्या गावातली क्रांती आज महाराष्ट्रात नाव कमवत

3

मल्ल प्रेमयुद्ध भाग 3

17 July 2023
0
0
0

भूषण आल्यावर वीरची तंद्री तुटली. भूषण लहानपानापासूनचा वीर आणि भूषण एकमेकांचे खास मित्र... भूषण मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. वीरच्या घरच्यांना त्यांची मैत्री आवडत नव्हती. मैत्री बरोबरच्या लोकांबरोबर अस

4

मल्ल प्रेमयुद्ध भाग 4

18 July 2023
0
0
0

तिघे ट्रेनच्या बाकड्यावर शांत बसले होते." दादा अशी कशी ट्रेन कॅन्सल व्हईल? आज दोघी निघालो नाही तर परवा तिथे पोहचणार कस आणि नाही पोहचलो तर ऍडमिशन कॅन्सल व्हईल. किती मुश्किलीने तिथे ऍडमिशन मिळाली होती.

5

मल्ल प्रेम युद्ध भाग 5

18 July 2023
0
0
0

सूर्योदयापूर्वी दादा उठले होते. सगळी पोर शांत झोपली होती. रात्री पोर उशिरा आल्यामुळे बोलणेझाले नव्हते. दादांनी लक्ष नेहमीप्रमाणे गुरांच्या हंबरण्याकडे खाटेवरून उठून दादा गोठ्यात गेले. सोनेरी, लाल, पिव

6

मल्ल प्रेम युद्ध भाग 6

18 July 2023
0
0
0

रत्ना आवराआवर करत होती. तिला तिच्या गावीनिघायचं होत."रत्ना आवर तुला सोडून आल्यावर मला रानातनागरायला जायचंय." संतोष गडबडीत म्हणाला.'मग नाही जात आज ..." रत्ना हसली.खरच नको जाऊ आज उद्या जा... मी फोन करून

7

मल्ल प्रेम युद्ध भाग - 7

25 July 2023
0
0
0

"अर्जुनराव जे हाय ते तुमच्या समोर... कसला आडपडदा न्हाय की लपवाछपवी... हा शेतजमीन बघायला जायचं असेल जाऊ... संग्राम गाड्या काढा." आबांनी आदेश सोडला तसे संग्राम उठला."नको... नको अमास्नी इशवास हाय आबासाहे

8

मल्ल प्रेम युद्ध भाग - 8

25 July 2023
0
0
0

गाडी दारात पोहचली. गाडीचा आवाज ऐकून दादा, चिनू नि आई बाहेर आले. समोर वीर क्रांती आणि रत्नाला एकत्र बघून त्यांना पहिल्यांदा काय बोलावे सुचत नव्हते.क्रांतिच्या लक्षात आले.दादा संतू ची गाडी बंद पडली म्हण

9

मल्ल प्रेम युद्ध भाग - 9

25 July 2023
0
0
0

संग्रामला खूप उशिरा जाग आली. बेड वर तो उठून बसला. डोकं फार जड वाटत होतं. त्याने दोन्ही हाताने डोकं दाबून धरलं. त्याने आजूबाजूला पाहिले. तेजश्री कुठेच दिसत नव्हती. त्याने जोरात हाक मारली. "तेजश्री..."

---

एक पुस्तक वाचा