1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले. माझे मनात ज्या शेकडो कल्पना येत असत, ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या व्यक्ती उभ्या राहत, त्या सर्वांतून हे पुस्तक निर्माण झाले आहे. माझे मनाच्या समाधानासाठी हे सारे मी हिहित असे. प्रत्यक्ष सृष्टीत अतृप्त राहिलेल्या शेकडो हदयांच्या भुका शांत करण्याचा हा एक मार्ग होता. ज्या व्यक्तिंना कृतीवीर होता येत नाही, ते वाचिवीर होतात.
5 अनुयायी
11 पुस्तके