प्रश्नकर्ता: दादा, ही अहंकाराची गोष्ट घरात बऱ्याच वेळा लागू
पडते, संस्थेत लागू पडते, दादाचे काम करीत असताना ही अहंकारामुळे संघर्ष होत असतो तिथे ही लागू पडते. तिथे सुद्धा समाधान पाहिजे ना?
दादाश्री : हो समाधान पाहिजे ना ! तो आपल्या इथे ज्ञान घेतलेला समाधान करेल, पण ज्ञान नाही तिथे काय समाधान घेईल? तेथे मग वेगळा होत जाईल, त्याच्या बरोबर मन वेगळे होत जाते. आपल्या इथे वेगळे नाही पडणार !!!
प्रश्नकर्ता पण दादा, संघर्ष करायला नको ना ?
दादाश्री : संघर्षण, हा तर स्वभाव आहे. असा माल (कर्म) भरून आणला आहे म्हणून असे होते. जर असा माल आपला नसता तर असे झाले नसते. त्यामुळे आपण समजून घ्यावे कि भाऊची तशी सवयच आहे. मग आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. कारण कि, सवय, सवईवाल्याची ( पूर्वसंचित संस्कारवाले जीव), आणि 'आपण' आपले (शुद्धात्मा)! आणि मग त्याचा निकाल होऊन जातो. तुम्ही अडकून राहिलात तरच भानगड! बाकी, संघर्ष होणारच. संघर्ष होणार नाही असे घडतच नाही. त्या संघर्षामुळे आपण एकमेकांपासून वेगळे होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. संघर्ष तर अवश्य होतोच. तो तर पति-पत्नीमध्ये पण होतो, पण तरी ते एकत्र राहतात ना पुन्हा? ते तर होत राहते. ह्यासाठी कोणावर कसला ही दबाव केलेला नाही कि तुम्ही संघर्षात पडू नका. प्रश्नकर्ता: पण दादा, संघर्ष होऊ नये असा सतत भाव ठेवायला
पाहिजे ना?
दादाश्री हो, असायला पाहिजे, तेच करायचे ना! प्रतिक्रमण करायचे आणि त्यासाठी भाव ठेवायचा! परत तसे झाले तर परत प्रतिक्रमण करायचे कारण कि (संचित कर्माचा) एक थर निघून जातो मग दुसरा थर पण निघून जातो ना? असे थर आहेत ना ! माझे जेव्हा जेव्हा संघर्ष होत होते, तेव्हा नोंद करत होतो, आज चांगले ज्ञान मिळाले! संघर्षामुळे अजागृति राहत नाही. जागृतिच जागृति राहते ना! ते आत्माचे व्हिटामिन आहे. त्यामुळे ह्या संघर्षात काहीच भानगड नाही. संघर्षा नंतर एकमेकाशी वेगळे व्हायचे नाही हाच इथे पुरुषार्थ आहे. आपले मन समोरच्यासाठी वेगळे होत असेल तर प्रतिक्रमण करून सर्व सुरळीत करावे. आम्ही ह्या सर्वा बरोबर कशाप्रकारे मिळून जुळून राहतो? तुमच्या बरोबर ही आमचे पटत आहे कि नाही पटत? असे आहे, शब्दाने संघर्ष ऊभा होतो. मला खूप बोलावे लागते, तरीसुद्धा संघर्ष होत नाही ना?
संघर्ष तर होणारच, जशी ही भांडी एकमेकांवर आदळतील कि नाही आदळणार? पुद्गलचा स्वभाव आहे संघर्ष करणे ते. पण माल भरलेला असेल तर भरलेला नसेल तर नाही. पूर्वी आमचा पण संघर्ष होत होता। पण ज्ञान झाल्यानंतर संघर्ष झाला नाही. कारण कि, आमचे ज्ञान अनुभवज्ञान आहे. आणि आम्ही निकाल करून आलेलो आहोत, ह्या ज्ञानाने सर्व निकाल करून करून आलो आहोत आणि तुम्हाला निकाल करायचे बाकी आहे.