shabd-logo

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023

43 पाहिले 43
अंक दुसरा

प्रवेश पहिला

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)

सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे का

आता बाहेर?

सुधाकर : अगे, जरूरीचं काम असल्याखेरीज का मी असा तातडीने जात असेन? मला गेलंच पाहिजे आता! आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका. सिंधू : मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायच एक दोन का तीनच वेळा काय ते फराळाला घरी राहायचं
झालं तेवढं! विचारू मी एक? फार दिवस माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाहीना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते.
(राग - मांड-जिल्हा, ताल दादरा, चाल कहा मानले.) स्थिरवा मना दयाघना विनतिसी या माना। होई पात्र न रोषा दीना हृदयी करुणा आणा ॥ ध्रु. ॥ जाहला दोष नम करी चुकूनि काही प्रेमला, क्षमा तरित्या करा विनतिसी या माना ॥ 1॥

सुधाकर: अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडाव लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागत आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?

सिंधू : (रडत) मग बोलणं जरा असं त्रासिकपणाच होतं. बाळाचं सुध्दा कोडकौतुक पुरविणं होत नाही!

सुधाकर ; तुझ्याशी बोलणं मोठ पंचायतीचं काम आहे बुवा! किती वेळा सांगू की, माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून! बाळाचं कोडकौतुक मी मनापासून पण हे सांगायला तरी कशाला हवं! तुझे तुला दिसून येत नाही? बरं, आता रहू नकोस! उद्या मुदत संपून सनद मिळायची आहे म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे त्यात स्वतःलाही त्रास आणि दुसन्यालाही त्रास (स्वगत) रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे! हा रामलाल
चांगला इंग्लंडला गेलेला. पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळे तसाच परतून आला. त्यामुळे ही नसती विवंचना माझ्यामागं लागली आहे.
हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? (जातो.)

सिंधू : देवा, आता माझी सारी काळजी तुलाच !

(राग तिलककामोद ताल एकताल चाल अब तो लाज.) प्रणतनाथ! रक्षि कान्त करि तदीय असुख शांत ॥ध्रु.॥
अशुभा ज्या योजी देव पतिलागी, त्या सदैव।
परिणभावी मंगलात ॥ 1॥
(रामलाल व शरद येतात.)
(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सिंधू व सुधाकर)

सिधू : वन्स गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होत; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे का

आता बाहेर?

सुधाकर: अगं, जरूरीचं काम असल्याखेरीज का मी असा तातडीने जात असेन? मला गेलंच पाहिजे आता! आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका.

सिंधू : मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायचं; एक दोन का तीनच वेळा काय ते फराळाला घरी राहायचं झालं तेवढं विचारू मी एक? फार दिवस माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाहीना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते.

(राग - मांड-जिल्हा ताल- दादरा चाल- कहा मानले.) स्थिरवा मना दयाघना विनतिसी या माना। होई पात्र न रोषा दीना हृदयी करुणा आणा ॥ ध्रु. ॥ जाहला दोष मम करी चुकूनि काही | प्रेमला, क्षमा
तरित्या करा । विनतिसी या माना॥ 1॥

सुधाकर: अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह, काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा !. तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कस ठरविलस?

सिंधू : (रडत) मग बोलणं जरा असं त्रासिकपणाचं होतं, बाळाचं सुध्दा कोडकौतुक पुरविणं होत नाही!

सुधाकर : तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा! किती वेळा सांगू की, माझ तुझ्यावर अगदी पहिल्यासारख प्रेम आहे म्हणून! बाळाचं कोडकौतुक मी मनापासून पण हे सांगायला तरी कशाला हवं! तुझं तुला दिसून येत नाही? बरं, आता रडू नकोस! उद्या मुदत संपून सनद मिळायची आहे म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे त्यात स्वतःलाही त्रास आणि दुसन्यालाही त्रास! (स्वगत) रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे! हा रामलाल चांगला इंग्लंडला गेलेला, पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळे तसाच परतून आला. त्यामुळे ही नसती विवंचना माझ्यामागं लागली आहे. हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? (जातो.)

सिंधू : देवा, आता माझी सारी काळजी तुलाच !

(राग तिलककामोद ताल एकताल चाल अब तो लाज.) प्रणतनाथा रक्षि कान्त करि तदीय असुख शांत ॥ ध्रु. ॥ अशुभा ज्या योजी देव पतिलागी, त्या सदैव। परिणभवी मंगलात॥ 1॥

(रामलाल व शरद् येतात)

सिंधू : हे बघितलंस भाई? आताच जाणं झालं रोजचंच सांगणं- कामासाठी जायचं आहे आणि फराळासाठी वाट पाहू नका!

रामलाल : काय चमत्कार आहे कळत नाही! सनद तूर्त रद्द झालेली आहे. हा पैशावियशांच्या अडचणीत नाही ना? हो, कदाचित मानी
स्वभावामुळे उघड करून नाही बोलायचा कुणाजवळ!

शरद् : छे, ती अडचण मुळीच नाही. दादाची सनद गेली एवढं कळलं मात्र, त्या घटकेपासून वहिनीच्या वडिलांनी, दादा नको नको म्हणून
लिही, तरी मोकळया मुठीन पैसे पाठवायला सुरुवात केली आहे.

सिंधू : नाही रे भाई, पैशाची कसली अडचण? काही तरी वेडंवाकडं आहे माझं मनच मला सांगत आहे! भाई, आता कसे रे करायचे?

(रडू लागते.)

रामलाल : ताई, सिधूताई, हे काय असं वेडयासारख? तू चांगली राहाणी धीराची अन् हे अस करायच? धीर धर-
(राग भीमपलासी ताल- त्रिवट, चाल- बिरजमें धूम मचाई.)
सचतुरे, धैर्यसदा सुखधाम विपदि महा सकल पुरवी काम ॥धु॥
निजभजकांच्या विघ्नभंजनी जणु दुसरे प्रभुनाम ॥ 1॥

मी एक दोन दिवसांत बारकाईने चौकशी करून खरं काय आहे ते शोधून काढतो जा ही शरद बाळाला बाहेरून घेऊन आली आहे. त्याला नेऊन नीट निजीव; हं डोळे पूस! अगदी हसून खेळून राहिल पाहिजे नाही तर आपण नाही पडायचे या कामात! कशाला काही पत्ता नाही आणि उगीच रडत सुटणं म्हणजे काय झालं! जा त्याला घेऊन

सिंधू : भाई, भाई तू काही म्हण पण

(राग - जिल्हा मांड, ताल कवाली, चाल- पिया मनसे.) दयाछाया घे निवारूनिया, प्रभु मजवरी कोपला ॥ भु ॥
जीवनासि मम आधार गुरु जो तोहि कसा अजि लोपला ॥ 1॥

रामलाल : शरद, शरद, जा बेटा. ताईची जरा समजूत घाल जा! तिला उगीच रडू देऊ नकोस! (शरद् जाते. रामलाल जाऊ लागतो.)

(गीता येते)

गीता : भाईसाहेब

रामलाल : कोण? गीता, नव्हे? मला हाक मारली तुम्ही?

गीता : हो! अगदी निलाजरेपणान हाक मारली! शरदिनीबाईप्रमाण मलाही आपली मुलगीच म्हणा! भाईसाहेब, बाईसाहेबाच आत्ताच बोलण मी ऐकल आणि जीव कळवळून आला. अगदी बोलल्याखेरीज राहवेना म्हणून आपली धावत आले बघा, दादासाहेब काय करतात, कुठे जातात, कुणाबरोबर जातात, सार मला माहीत आहे.

रामलाल : अस! काय काय काय करतात सांगा पाहू?

गीता : काय सांगायचं कपाळ! आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे (हळूच दारू प्यायला!

रामलाल : काय, दारू? (निःश्वास टाकून) रघुवीर! श्रीहरी गीताबाई, तुम्ही खात्रीनं म्हणता?

गीता : अहो, खात्री कसली? डोळ्यांदेखतच्या गोष्टीसारखी ही गोष्ट मला माहीत आहे! आमच्या घरातल्यांनीचदादासाहेबांना-

रामलाल : थांबा, इथं नका बोलू! सिचून एखादा शब्द ऐकला तर ती आपल्या जिवाचा अनर्थापात करील! तुम्ही जरा बाहेर चला, अंमळ

पलीकडे. सगळं माहीत असेल ते मला सांगा चला. (स्वगत) अरेरे, चांडाळा दुर्दैवा काय केलंस है?

(राग बिलावल ताल- त्रिवट चाल सुमरन कर.) वसुधातलरमणीयसुधाकर। व्यसनधनतिमिरी बुडविसी कैसा? ॥ ध्रु. ॥ सृजुनि जया परमेश सुखावे नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा! ॥ 1॥
(जातो. पडदा पडतो)

प्रवेश दुसरा

(स्वळ रस्ता. पात्रे भगीरथ व रामलाल)

भगीरथ : (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खर पण दुःखी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दुःखाचा अर्क वाटेल त्या रीतीन कोळून प्यावा लागतो, हेच खरा संसार-संसारः परमेश्वरा! संसाराचा माझ्याइतका कडू अनुभव यापुढ कोणत्याही तरुणाच्या कपाळी लिहून ठेवू नकोस आणि ठेवायचाच असला तर त्या दुदैवी निवाला आतल्या आत जाळण्यासाठी दीर्घायुष्य तरी देऊ नकोस!

(राग खमाज ताल- त्रिवट, चाल- सनक मुख विनुत) प्रणय जरी भगला तरी नर जगता मुकला ॥ धुः ॥ घोर निरयसम त्यासी विकट जग दीर्घ जीवित शापचि खर तयाला ॥ 1॥

(रामलाल येतो)

रामलाल : (स्वगत) यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतान सांगितलेल खरे नसलं तर नाही पण तिचं म्हणण हजार हिश्श्यांनी खोटं नाहीच! बाकी हे बोलायचं ठरल्यावर त्याला याच्याइतका योग्य मनुष्य मात्र गीतेनं सांगितलेल्या पाच-सातजणांपैकी एकही नाही! शिवाय याची माझी थोडीशी ओळखही आहेच! (उघड) नमस्कार भगीरथ!

भगीरथ : ओहो! कोण? डॉक्टरसाहेब? या! डॉक्टरसाहेब, तुम्ही परत आलात एवढं कळल. पण परतण्याच कारण नाही कळला

रामलाल : तुम्हाला माहीत असेलच की, प्रथम इंग्लंडात काही दिवस काढून शेवटच्या परीक्षेसाठी जर्मनीत जाण्याचा माझा विचार होता. पुढे ही लढाईची वावटळ सुरू झाली, तेव्हा साहजिकच जर्मनीत जाण्याचा बेत रद्द केला! चार सहा महिने इंग्लंडात काढले आणि आलो परत झाल.

भगीरथ : काय एक एक अडचणी असतात पाहा!

रामलाल : बरं, ते राहू द्या तूर्त भगीरथ, मी तुमच्याकडे आलो आहे एका कामासाठी हवापाण्याची प्रस्तावना केल्यावाचून एकदम

सरळपणान आणि मोकळ्या मनानं बोलायचं आहे ते बोलू का?

भगीरथ : अगदी खुशाल बोला!

रामलाल : पाहा, मग लपवाछपवी करू लागाल! नाही ना? बरे तर मग, आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! है, चकित होऊ नका! मला सर्व काही ठाऊक आहे! तशी मला एकटयाला जायलासुध्दा हरकत नाही! पण माहीतगारामार्फत शिरकाव : झालेला बरा! माझे एक-दोन मित्रही आहेत त्यात; पण सकोचामुळे कोणी कबूल व्हायचं नाही! तेव्हा सर्वांची विमान वर चढल्यावरच गाठी पडलेल्या क्या!

(स्थळ रस्ता. पात्रे भगीरथ व रामलाल)

भगीरथ : (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खर पण दुःखी जिवाला दारू सुखाच स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दुःखाचा अर्क वाटेल त्या रीतीन कोळून प्यावा लागतो, हेच खरा संसार संसारा परमेश्वरा संसाराचा माझ्याइतका कडू अनुभव यापुर्व कोणत्याही तरुणाच्या कपाळी लिहून ठेवू नकोस आणि ठेवायचाच असला तर त्या दुदैवी जिवाला आतल्या आत जाळण्यासाठी दीर्घायुष्य तरी देऊ नकोस!

(राग खमाज ताल- त्रिवट, चाल- सनक मुख विनुत)

प्रणय जरी भंगला तरी नर जगता मुकला॥ ध्रु. ॥ घोर निरयसम। त्यासी विकट जग

दीर्घ जीवित शापचि खर तयाला ॥ 1॥ (रामलाल येतो.)

रामलाल : (स्वगत) याच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतानं सांगितलेलं खरं नसलं तर नाही पण तिचे म्हणण हजार हिश्श्यांनी खोट नाहीचा बाकी हे बोलायचं ठरल्यावर त्याला याच्याइतका योग्य मनुष्य मात्र गीतेन सांगितलेल्या पाच-सातजणांपैकी एकही नाही! शिवाय याची माझी थोडीशी ओळखही आहेच! (उघड) नमस्कार भगीरथ!

भगीरथ : ओहो! कोण? डॉक्टरसाहेब? या! डॉक्टरसाहेब, तुम्ही परत आलात एवढं कळल, पण परतण्याचं कारण नाही कळलं!

रामलाल : तुम्हाला माहीत असेलच की. प्रथम इंग्लंडात काही दिवस काढून शेवटच्या परीक्षेसाठी जर्मनीत जाण्याचा माझा विचार होता. पुढे ही लढाईची वावटळ सुरु झाली, तेव्हा साहजिकच जर्मनीत जाण्याचा बेत रद्द केला! चार सहा महिने इंग्लंडात काढले आणि आलो परत झालं.

भगीरथ : काय एक एक अडचणी असतात पाहा!

रामलाल : बरे, ते राहू द्या तूती भगीरथ, मी तुमच्याकडे आलो आहे एका कामासाठी हवापाण्याची प्रस्तावना केल्यावाचून एकदम सरळपणान आणि मोकळ्या मनानं बोलायचं आहे ते बोलू का?

भगीरथ: अगदी खुशाल बोला!

रामलाल : पाहा, मग लपवाछपवी करू लागाल! नाही ना? बरे तर मग, आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! हैं, चकित होऊ नका! मला सर्व काही ठाऊक आहे! तशी मला एकटयाला जायलासुध्दा हरकत नाही! पण माहीतगारामार्फत शिरकाव झालेला बरा! माझे एक-दोन मित्रही आहेत त्यात पण संकोचामुळे कोणी कबूल व्हायचं नाही! तेव्हा सर्वांची विमाने वर चढल्यावरच गाठी पडलेल्या बया!

भगीरथ : डॉक्टरसाहेब, तुम्ही या पंथातले आहात? मला नाही खरं वाटत!

रामलाल : पूर्वी नव्हतो; पण परदेशगमन करून ही विद्या शिकून आलो झाला तिकडच्या थंड प्रदेशात या भानगडीवाचून चालतच नाही. इथ

आल्यापासून मनमोकळेपणान घेण्याची जरा पंचाईत पडू लागली आहे; तेव्हा हा मार्ग हुडकून काढला! कराल ना एवढं काम!

भगीरथ : माझी काही हरकत नाही; पण तिथला एकदर प्रकार कितपत रुचेल तुम्हाला-

रामलाल : न रुचायला काय झाल? अहो, हा चोरटेपणाचा तरी त्रास टळेल ना, मी म्हणतो!

भगीरथ : ठीक आहे. चला मग आताच!

रामलाल : नाही! अगदी सुरुवातीपासूनच नको! मंडळी रंगात आली म्हणजे गेलेल बरा म्हणजे दुसऱ्याला सकीच नाही, आपल्यालाही संकोच

भगीरथ : तसंच करू या! पण डॉक्टर, ही कल्पना नव्हती मला! थोड्या नवलाची गोष्ट आहे!!

रामलाल : वा, नवल माझ्याबद्दल की तुमच्याबद्दल अधिक? तसे म्हटल तर तुम्ही अगदी तरुण, शिवाय पदवीधर- पण तुम्ही-

भगीरथ: मी दुर्देवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे! संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझे प्रेम होत, तिच दुसऱ्याशी लग्न लागल आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो! पण जाऊ द्या. त्या कुळकथा सांगायला आपल्याला पुढं पुष्कळ वेळ सापडणार आहे. तूर्त आपल्या रस्त्याला लागू या! रामलाल चला (दोघेही जातात.)

(पडदा पडतो)

प्रवेश तिसरा

(स्थळः आर्यमदिरामंडळ. पात्रे, तळीराम, भाऊसाहेब, बापूसाहेब, रावसाहेब, सोन्याबापू, मन्याबापू, जनुभाऊ, शास्त्री, खुदाबक्ष, मगनभाई, वगैरे वगैरे... हुसेन सर्वांना पेले भरून देत आहे. मंडळीचे खाणे चालले आहे.)

हुसेन : सुधाकरसाहेब (पेला पुढे करतो.)

सुधाकर : हुसेन, मला नको आता!

शास्त्री : वा सुधाकर, नको म्हणजे काय गोष्ट आहे? घेतला पाहिजे!

सुधाकर : पण मला अगदी आटोकाट बेताची झाली आहे! आता पुरे!

खुदाबक्ष : नाही सुधाकर, मंडळीचा बेरंग होतो आहे!

बापूसाहेब : घ्याहो, सुधाकर! उद्या तुमची सनद तुम्हाला परत मिळणार आणि आज तुम्ही अस चोरटे काम चालविल आहे?

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणखी आमचं सांगणं मोडायचं? वा, मग झालंच म्हणायच

सुधाकर : है, आण बाबा तो पेला! आता मात्र हा शेवटचा है!

(पितो.)

शास्त्री : अहो, आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्याबाहेर वागता तुम्ही? आम्ही तुमच्या आयत्यावेळी उपयोगी पडलो! जाणि तुमचे दोस्त म्हणविणारे तुमची सनद गेल्यामुळे तुमची कुचेष्टा करायला लागले आणि सनद गेल्यामुळे तुम्ही दारू पिण्याला सुरुवात केली म्हणून गावभर तुमची निंदा करीत सुटले.

खुदाबक्ष : आता उद्या सनद सुरू होताच त्यांना जबाब द्या!

सुधाकर : नुसता जबाब द्या! भर कचेरीत खेटरान एकेकाची पूजा करतो. पाजी लोक!

तळीराम : नाही नाही. दादासाहेब. उद्या त्या लोकाच्या नाकावर टिचून दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा! घ्या खबर गुलामांची!

सुधाकर : हो, मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो! उद्या दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला हिंमत आहे माझी!

जनूभाऊ : शावास, जरूर दारू पिऊन जा!

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे तुमच्या जिवासाठी जीव देऊ! दारू पिऊनच कचेरीत जा! मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही! तुम्हाला वाटेल तितक्या आम्ही नोकल्या देऊ! हे घ्या वचन! तुम्हाला गरज पडेल त्या वेळी तुम्हाला वाटेल तेव्हढी मोठी नोकरी लावून देण्याच मी तुम्हाला वचन देतो! भाऊसाहेब, बापूसाहेब आपणही त्यांना वचन द्या.

(सर्व सुधाकरला वचन देतात.)

शास्त्री : सुधाकर, आता माघार घ्यायची नाही!

सुधाकर : माघार घ्यायची मला हिंमत नाही! मी आता कचेरीत जायला तयार आहे!

खुदाबक्ष : बस्स, बस्स, शास्त्रीबुवा! आता असंच करायचं, की सर्वांनी उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत असे सारख पीतराहायचं आणि सुधाकराला तसाच कचेरीत पोहोचवायचा!

शास्त्री : पसत आहे ही कल्पना!

(स्थळः आर्यमंदिरामंडळ पात्रे, तळीराम, भाऊसाहेब, बापूसाहेब, रावसाहेब, सोन्याबापू, मन्याबापू, जनुभाऊ, शास्त्री, खुदाबक्ष, मगनभाई,
वगैरे वगैरे... हुसेन सर्वांना पेले भरून देत आहे. मंडळीचे खाणे चालले आहे.)

हुसेन : सुधाकरसाहेब (पेला पुढे करतो)

सुधाकर : हुसेन, मला नको आता!

शास्त्री : वा सुधाकर, नको म्हणजे काय गोष्ट आहे? घेतला पाहिजे!

सुधाकर : पण मला अगदी आटोकाट बेताची झाली आहे! आता पुरे!

खुदाबक्ष : नाही सुधाकर, मंडळीचा बेरंग होतो आहे!

बापूसाहेब : घ्याहो, सुधाकर! उद्या तुमची सनद तुम्हाला परत मिळणार आणि आज तुम्ही अस चोरट काम चालविल आहे?

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणखी आमचं सांगणं मोडायचं? वा मग झालंच म्हणायचं.

सुधाकर : है, आण बाबा तो पेला! आता मात्र हा शेवटचा है!

(पितो.)

शास्त्री : अहो, आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्याबाहेर वागता तुम्ही? आम्ही तुमच्या आयत्यावेळी उपयोगी पडलो! आणि तुमचे दोस्त म्हणविणारे तुमची सनद गेल्यामुळे तुमची कुचेष्टा करायला लागले आणि सनद गेल्यामुळे तुम्ही दारू पिण्याला सुरुवात केली म्हणून गावभर तुमची निंदा करीत सुटले...

खुदाबक्ष : आता उद्या सनद सुरू होताच त्यांना जबाब द्या!

सुधाकर : नुसता जबाब था! भर कचेरीत खेटरान एकेकाची पूजा करतो. पाजी लोक!

तळीराम : नाही, नाही. दादासाहेब उद्या त्या लोकांच्या नाकावर टिचून दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा! घ्या खबर गुलामांची! 12

सुधाकर : हो, मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो! उद्या दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला हिंमत आहे माझी !

जनूभाऊ : शावास, जरूर दारू पिऊन जा!

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे तुमच्या जिवासाठी जीव देऊ! दारु पिऊनच कचेरीत जा ! मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही! तुम्हाला वाटेल तितक्या आम्ही नोकऱ्या देऊ! हे घ्या वचन! तुम्हाला गरज पडेल त्या वेळी तुम्हाला वाटेल तेव्हढी मोठी नोकरी लावून देण्याच मी तुम्हाला वचन देतो! भाऊसाहेब, बापूसाहेब आपणही त्यांना वचन द्या...

(सर्व सुधाकरला वचन देतात.)

शास्त्री : सुधाकर, आता माघार घ्यायची नाही!

सुधाकर: माघार घ्यायची मला हिंमत नाही! मी आता कचेरीत जायला तयार आहे!

खुदाबक्ष : बस्स, बस्स, शास्त्रीबुवा ! आता असच करायच, की सर्वांनी उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत असे सारख पीतराहायचे आणि सुधाकराला तसाच कचेरीत पोहोचवायचा!

शास्त्री: पसत आहे ही कल्पना!

तळीराम : हुसेन, दादासाहेबांना दे एक प्याला आणखी!

हुसेन : हा जी साहेब!

सुधाकर : आता नको. मी बेशुध्द होईन!

(पेला देतो.)

जनुभाऊ : आम्ही जिवाला जीव देऊ तुमच्यासाठी! आम्ही पण बेशुध्द होऊ!

सुधाकर : नको, आता नको आहे. मला हिमत आहे मी पिऊ शकतो!

तळीराम : दादासाहेब, आता हा खास शेवटचा है, हा एकच प्याला!

(सुधाकर पितो व गुगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात.)

रामलाल : (भगीरथास एकीकडे) हे भगीरथ, थोडा वेळ इथं बाजूला उभे राहू. आणि मंडळी जरा रंगात आली, की आपणही होऊ सामील! |

भगीरथ : (रामलालास एकीकडे) आपल्याला यायला फार वेळ झाला आज!

मन्याबापू : (मोठ्याने रडायला लागतो.) जनुभाऊ अरे इकडे ये! (जनुभाऊच्या गळ्याला मिठी मारून मोठ्याने रडायला लागतो.)

जनूभाऊ : अरे, रडतोस का मन्याबापू असा!

मन्याबापू : मला जास्त चढली आहे!

जनुभाऊ : मग काय करू म्हणतोस?

मन्याबापू : मला आणखी पाज!

जनुभाऊ : हे ही घे (मन्याबापू पितो व पुन्हा रडू लागतो.) अरे, आता का रडतोस?

मन्याबापू : मला जास्त चढत नाही!

जनूभाऊ : मग मर (जनूभाऊ स्वतः पितो.)

रामलाल : (भगीरथास एकीकडे) भगीरथ, पाहा या एकमेकांच्या लीला! आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ? एका कार्यासाठी मघाशी
तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही! माझ्या एका मित्राला जो या शहराची केवळ शोभा- त्याला-
सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा.

मन्याबापू : दारू ही खराब चीज आहे! दारू ही भिकार वस्तू आहे. दारू ही वाईट गोष्ट आहे.

जनूभाऊ: मन्या! काय बडबडतो आहेस है!

मन्याबापू : मी चळवळ करतो आहे! मद्यपाननिषेध करीत आहे.

जनुभाऊ : निषेध करू नकोस! मद्यपान कर!

मन्याबापू : दारू ही खराब चीज आहे, दारु हे मद्यपान आहे. दारू हा निषेध आहे, दारू ही चळवळ आहे!

जनुभाऊ : मन्या, मन्या, सांभाळ, भडकत चाललास!

मन्याबापू : दारू आहे! दारू अशुध्द आहे!

जनुभाऊ : तीर्थोदक च वन्हिश्च नान्यतः शुध्दिमर्हतः वहातं पाणी किंवा अग्नी ही जात्या शुध्द असतात दारूचा प्रचंड ओघ चारी खंडात
वाहतो आहे आणि तिच्या पीटी आग आहे. दारू दुहेरी शुध्द आहे. हे धर्मवचनावरून सिध्द होत आहे!

मन्याबापू : दारू अधर्म आहे. दारू धर्मबाह्य आहे!.

जनुभाऊ: मद्यपानाला प्रायश्चित्तही आहे! रात्री दारू पिऊन सकाळी ब्राह्मणाला एक काशाचं भांडं दान केलं म्हणजे पाप राहात नाही! जाता जर तोंड बंद केल नाहीस, तर तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल.

मन्याबापू : दारुमुळे आपापसात कलह माजतात तंटे माजतात.

जनूभाऊ: मन्या! नरडं दाबून जीव घेईन आता दारूमुळे जन्माची वैरं बंद होतात, दारूच्या दरबारात आग आणखी पाणी सलोख्यान संसार करतात.

मन्याबापू : दारूमुळे मनुष्य असंबद्ध बडबडू लागतो!

जनुभाऊ : साफ खोट आहे! मी मघापासून असंबध्द बडबडतो आहे.

जनूभाऊ : तू मुळीच असंबद्ध बडबडत नाहीस..

मन्याबापू : मी खरे बडबडतो आहे. दारू वाईट आहे, असे मी बडबडतो आहे!

जनुभाऊ : मुळीच नाही! दारू चांगली आहे, असं तू म्हणतो आहेस. दारू वाईट आहे, असे कबूल करतोस की नाही बोल?

मन्याबापू : नाही म्हणायचं तस. दारू चांगली आहे!

शास्त्री : अरे, बोलण्याच्या गडबडीत तुम्ही आपल्या बाजू बदलून लढता आहात!

जनुभाऊ : अस का? ठीक आहे! चल मन्या, पुन्हा आपापल्या बाजू घेऊन पहिल्यापासून लढ्!

(एकमेकाच्या गळ्यात मिठ्या मारून थोडा वेळ दोघेही रडतात.)

रामलाल : भगीरथ, प्रेमभंगाचा ताप चुकविण्यासाठी, या गोठणीवर येऊन तुम्ही विसावा घेता?

सोन्याबापू] रडू लागती

खुदाबक्ष : का सोन्याबापू, तुम्ही का रडायला लागलात ?

सोन्याबापू : दारूच्या सद्गुणांचं केवढ उदात्त चित्र हे! अरेरे. याचा फायदा घेऊन पुरुषाप्रमाणेच आमच्या स्त्रीवर्गाला आपली उन्नती करून घेता
येत नाही, हे केवळ दुर्भाग्य आहे!

जनूभाऊ ::सोन्याला कंठ फुटला वाटते हो! या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस ! कसला रे कपाळाचा
स्त्रीवर्ग? यामुळेच या सुधारकाची चीड येते! सोन्याबापू खुदाबक्ष अबलांचा अन्याय होतो आहे! तुम्ही अविध आहात! यवन आहात! मुसलमान आहात! स्त्रीजातीचा काही अभिमान धरा!

खुदाबक्ष : बायकांना आत्मा नसतो!

जनुभाऊ : भले शाबास! खांसाहेब, खाशी खोड मोडलीत! बायकाचे चोचले माजविल्यामुळे या सुधारकाचा सारखा वीट येत चालला आहे!
'खर की नाही शास्त्रीबुवा?

शास्त्री : नाही, माझा सुधारकाच्यावर कटाक्ष या मुद्दयावर नाही! सुधारणेच्या नावाखाली सुधारकानी जो सावळागोंधळ मांडला आहे. धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे! सुधारणेचे नाव सांगून उद्या तुम्ही जर अपेयपान करू लागलात, अभक्ष्य भक्षण करू लागलात, सुधारक म्हणून मांसाहार करू लागलात खुदाबक्ष आज मटण शिजल आहे चांगलं नाही? तुम्ही जर खाण्यापिण्याचा ताळ सोडू लागलात तर ते आम्हा जुन्या लोकांना कधी खपायच नाही. मांसाहार कधी खपायचा नाही- अरे हुसेन, आणखी आण मटण थोड आगरकरांचा तिटकारा येतो तो या कारणानी टिळकाबद्दल आम्हाला आदर वाटतो तो या कारणामुळ

सोन्याबापू : मग टिळकांच्या गीतारहस्याबद्दल एवढी आरडाओरड का माजली आहे ती ?

(शास्त्री बुचकळ्यात पडतो.)

खुदाबक्ष : मी सांगतो त्याचं कारण एरव्ही टिळकांच्याबद्दल आम्हाला आदर आहे; पण गीतारहस्यात टिळकानी श्रीमत शंकराचार्यांना छेडले आहे. त्यांनी आर्यधर्माच्या ऐन गड्ड्याला हात घातला आहे! सनातनधर्माची ही हानी आहे, म्हणून..

शास्त्री : भले शाबास (त्याच्या गळ्याला मिठी मारतो.) खुदाबक्ष आज तू सनातन आर्यधर्माची बाजू राखलीस! आज मी मुसलमान झालो! अरे, कोणी शेंडी उपटून ती हनवटीखाली चिकटवून मला दाढीदीक्षित करा! खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालो!

(पगडयांची अदलाबदल करू लागतात.)

रामलाल : अरेरे, भगीरथ, सस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानाच वैरसुध्दा या नरपशूच्या नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटते. कुठे पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठे श्रीशंकराचार्य, कुठे सनातनधर्म आणि कुठे हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्याचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहाव, आणखी त्यांच्या तेजान आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा सध्येच्या चोवीस नावाबरोबरच टिळक-आगरकर यांची नाव भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालाचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ पुरे झाला
हा प्रसंग!

भगीरथ : रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळे हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही.

रामलाल : भगीरथ, पाहा या प्रेतांच्याकडे! यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता? हतभागी महाभागा तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुध्दीचा आहेस, थोर अंत:करणाचा आहेस, रोमारोमात जिवंत आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास? एकोणीसशे मैल लांबीचा आणि अठराशे मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदानी भरलेला, हजारो पीडानी हैराण झालेला, तुझा स्वदेश तेहतीस कोटी केविलवाण्या किंकाळयांनी तुला हाका मारीत प्रेमभंगामुळे (अनाठायी पडलेल जीवित सार्थकी लावायला तुला दारुखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का? असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळ केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवनतकाली सेवा करायची तुला सधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ, आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागून दारू प्यायला लागलास, आणखी या नरपशूच्या पतित झालास? पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली साहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणिमात्रांना लाभत नाही पतितांच्या उध्दारासाठी, साधूच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंतालासुध्दा आवरत नाही भगीरथ, दीन, हीन, पंगू, अनाच, अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहात आहे. पाणिग्रहणावाचून रिकामा असलेला तुझा हात चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीजात गुलामगिरीत पडली आहे, लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत. साडेसहा कोटी माणसांसारखी माणसे नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत. या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे-

(राग अडाणा, ताल- त्रिवट, चाल सुंदरी मोरी का.)

झणी दे कर या दीना प्रेमजलातुर मृतशा दे जल ते या मीना ॥ ध्रु ॥

वाचा तरी उपकारमधूच्या या करि सतत पाना॥ 1॥

भगीरथ रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणाऱ्या परमेश्वरा, मी अजाण आहे. रस्ता चुकलो आहे; यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारतमातेचा दासानुदास झाला आहे.

शास्त्री : भगीरथ, काय गडबड आहे? तळीराम, भगीरथाला दे! (तळीराम पेला भरतो.)

भगीरथ: मित्रहो, माझ्याकरता हे कष्ट घेऊ नका. आजपासून हा भगीरथ तुम्हाला आणि तुमच्या दारुला पारखा झाला.

तळीराम : भगीरथ, काय भलतंच मॉडल आहेस हे? अरे मंडळीच्या आग्रहाखातर फार नको फक्त एवढा एकच प्याला! बस्स, एकच
प्याला! भगीरथ (पेला जमिनीवर पाडून) एकच प्याला! एकच प्याला!


Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा