shabd-logo

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023

22 पाहिले 22
प्रवेश पहिला

(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)

जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?

लीला : अशीच त्या दीनदयाळू परमेश्वराची इच्छा दिसते; स्वर्गात तरी तो तुम्हाला सुखात ठेवो!

जयंत: लीले, स्वर्गाबद्दलची माझी कल्पना क्षणोक्षणी ढासळत चालली आहे. स्वर्गाची प्रत्यक्ष साक्ष अजून कोणाला पटली आहे का? त्यापेक्षा परिचयाने प्रिय झालेली ही पृथ्वी किती तरी हवीशी वाटत आहे. खरोखरीच स्वर्ग असेल का? परमेश्वर असेल का? ही देखता डोळ्या आड होणारी प्रेमाची सृष्टी पुन्हा कल्पनातीत काळी तरी लाभेल का? एक ना दोन, हजारो तकांनी आत्मा व्याकुळ झाला आहे; स्वर्गात अप्सरा असतील पण अशी बाळपणाची सोबतीण, संस्कारजन्य प्रेमाची खाण, अशी लीला असेल काय? स्वाभाविक रीतीने मरण येताना मनुष्य बेशुद्ध होतो हे त्याचे केवढे भाग्या पण अगदी जाणीवपणाने जगाचा निरोप घेताना संशयाच्या भोव-यात सापडून माझी काय स्थिती झाली ही!

सुशीला : बाळा जयता, धीर धर, ही केवळ ईश्वर श्रद्धेची कसोटी आहे. दृढभावाचा भुकेला भगवान कोणालाही अंतर देत नाही त्याच्यावर दृढविश्वास मात्र ठेव

(पात्रे भगीरथ व शरद्: शरद् रडते आहे.)

भगीरथ : (स्वगत भाईसाहेबांच माझ्याशी असं तुटकपणाच वागण का होते याचे कारण आता माझ्या लक्षात आल! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे. कडू काळाचा कडवटपणाही याच्यापुढे अमृतासारखा वाटेल ! या वयात, अशा अपत्यस्नेहाच्या भरात, भाईसाहेबांच्या विवेकशाली पुरुषालासुध्दा प्रेमानं हे प्रेम नाही निराशेत सात्त्वि प्रेम करुणावृत्तीच रूप घेतं या कामानं कदाचित ज्याचं त्याला कळल्यावाचूनही अस होत असेल. या स्पर्धेची जाणीव रामलालांना पहिल्यापासूनच नको हा विचारा भाईसाहेबांच्या नावाचा अगदी अनुदार उल्लेख झाला आणि विचार तर अगदी भलता झाला! अरेरे! परमेश्वरा, किती दुःखप्रद प्रसंगात मला आणून ठेवलंस है! भाईसाहेबांच्या मनोवृत्तीविषयी न्यायनिष्ठुर निर्णय देण्यासाठी या हतभागी भगीरथान विचार करावा? त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादान जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीने पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा, मातेच्या शुध्द्ध शीलाबद्दल नीचपणानं चौकशी करायची, प्रत्यक्ष परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्कवितर्क लढवायचे, तशातलंच है अनन्वित पातक आहे! भाईसाहेबांनी आधीच आपल्या प्रेमाची रतिमात्र तरी कल्पना मला दिली असती तर शरदच्या स्नेहभावाला प्रेमाच्या पायरीवर चढविण्याऐवजी मी केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसविलं असतं! पण त्यांनाच आधी त्यांच्या मनाची वृत्ती कळली नसेल! ते काही असो; माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरद्च्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे (उघड) शरद, अशा हृदयभेदक स्थितीतही तुझ्याशी निठुरपणानं बोलतो याची मला क्षमा कर आता तुझ्याशी असं बोलताना मला समाधान वाटत आहे असे मुळीच समजू नकोस. या विषारी विचारानं माझं हृदय आतल्या आत सारखं जळत आहे. अगदी उपाय नाही म्हणूनच मला असं बोलावे लागत आहे, त्याची क्षमा कर आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दे शरद भगीरथाच्या सुखासाठी वाटेल ते दुःख भोगायला तू तयार आहेस का? हैं, अशी रडून मला निरुत्साह करू नकोस! संशयाच्या दीन दृष्टीने पाहू नकोस! अशा प्रश्नाचं स्पष्ट शब्दांनी उत्तर देणं कोणत्याही बालिकेला, त्यातून तुझ्यासारख्या कोमल मनाच्या आणि आजन्म दुःखाग्नीत करपून निघणाऱ्या बालविधवेला अगदीच मरणाहूनही अधिक आहे, हे मी जाणून आहे! पण आताचा प्रसंगच असा चमत्कारिक आहे, की स्पष्ट बोलल्यावाचून गत्यंतर नाही. कुलीनतेची मर्यादा आणि प्रायोजकता यांनाही आपण क्षणभर बाजूला ठेवलं पाहिजे सांग शरद, अगदी मोकळ्या मनानं सांग भगीरथाच्या सुखासाठी तू वाटेल ते दुःख भोगायला तयार होशील का?

शरद् : तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचे कारणच नाही. जे तुमचं सुख ते माझं दुःख असं कधी तरी घडेल का?

भगीरथ : प्रेमाच्या सहवासात राहताना भिन्न जिवांना जी एकरूपता मिळते तीच विरहाच्या चिरनिराश सृष्टीतही राखणे फार दुष्कर आहे.

शरद्: विरहाची सृष्टी विरहाची कल्पना आपण आता-

भगीरथ : मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणे काय ते बोलून टाकतो शरद, दुसऱ्या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद्, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल ! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल

शरद : भगीरथ, भगीरथ, काय हो बोललात है? खरोखरीच तुमचं हृदय पार जळून गेलं आहे का? अगदी विषाचा भगीरथ, हृदयदाहक प्राणघातक विषाचा वर्षाव केलात हो माझ्यावर !


प्रवेश दुसरा

(स्थळ- तळीरामाचे घर, पात्रे बिछान्यावर आसन्नमरण तळीराम, त्याच्या भोवती शास्त्री, खुदाबक्ष, डिसोझा, दादीशेठ दारूवाला, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल, सोन्याबापू सुधारक, यल्लाप्पा वगैरे आर्यमंदिरामडळाचे सभासद)

सोन्याबापू : शास्त्रीबुवा, कालची रात्र फारच जड गेली: वास्तविक काल रात्रीच तळीराम गार व्हायचा! पण आजचा दिवस आणखी दारू पिण्याचं याचं सद्भाग्य होतं म्हणूनच हा वाचला!

खुदाबक्ष : तशीच रात्र लांबलचक तरी किती वाटली! काही केल्या संपेना! तळीरामाच्या आयुष्यात आणि तिच्यात चेंगटपणाबद्दल जशी काय पैजच चालली होती!

सोन्याबापू : जितकी लांबलचक तितकीच भेसूर! आम्ही इतकी सध्या केलेली पण डोळयाला डोळा लावून पळभरसुध्दा ध्यान करण्याचा कोणाला धीर झाला नाही.

मन्याबापू : खरंच आहे; घडीभराच्या ध्यानानं कायमचा प्राणायाम व्हायचा एखादे वेळी! यमदुतांच्या स्वाच्या येणार आहेत अस कळल्यावर झोपेन मुडद्यासारखं पडायची कोण छाती करणार? तळीरामाऐवजी न जाणो ते आपल्यालाच चुकून न्यायचे ही प्रत्येकाला धास्ती वाटायचीच.

सोन्याबापू: तेवढी दिव्याची ज्योत काय ती संथपणान तळीरामाची प्राणज्योती विझते की काय हे टक लावून पाहात होती!

विरुपाक्ष: ठीकच आहे. जन्ममरणाचा जिचा रोजचा रोजगार, तिला कसली भीती वाटणार? बरं, दिव्याची ज्योत जरी संथ असली तरी तळीरामाची धडपड सारखी चालू असेल, नाही?

मन्याबापू : मुळीच नाही! आज ही जी तळीरामाच्या देहाची यमराजाच्या विरुध्द निःशस्त्र प्रतिकाराची चळवळ इतक्या हातघाईवर आलेली दिसते तिचा काल मागमूससुध्दा नव्हता! काल सारी रात्रभर तळीरामान फक्त सनदशीर चळवळच चालू ठेवलेली होती. शरीराचा स्वामी स्थानभ्रष्ट होऊ नये म्हणून इमानी अवयवानी इतकी जबाबदारी घेतली होती की डेक्कन सभेनेसुध्दा तिच्यापुढे हात टेकावेत! डोळयात उरलेला प्राण तसाच निघून जाऊ नये म्हणून ती पापणीपासून दुर झाली नाही त्याची झोप नेहमी म्हणजे इतकी जहाल असायची, पण काल रात्री तिच्यावर सभाबंदीच्या कायद्याची अमलबजावणी झाल्यासारखं दिसत होत! नेहमी वटवट करणारी जीभ आज अशी सरकारजमा का झाली हे पाहण्यासाठी एखादं कपोलकल्पित कारण सापडेना म्हणून दोन्ही गाल एखाद्या विरक्त साधूप्रमाण अंतर्मुख झाले आहेत. नाकानं सुध्दा पंचप्राणाना बाहेर जाता येऊ नये म्हणून विश्वासातल्या वाऱ्यालासुध्दा येरझाऱ्या करता येऊ नयेत अशी कडेकोट नाकेबंदी केली होती... सारी रात्रभर असा निपचित पडला होता, की विलायतेतल्या कसलेल्या परीक्षकालासुध्दा छातीला हात लावून सांगता आलं नसतं, की हा तळीराम असा बेशुध्द पडला आहे तो मेल्यामुळे, झोपेमुळे, दासमुळ

सोन्याबापू: किंवा वैद्याच्या औषधामुळे म्हणून

मन्याबापू : अरे खरंच, औषध देण्याची वेळ झाली! जागा करावा आता याला तळीराम, ऊठ, औषध घेतोस ना?

तळीराम : मला नीट बशीव, आता मला औषध नको आहे माझ मरण अगदी जवळ आल आहे.

जनुभाऊ: तळीराम, असा धीर सोडतोस? भिऊ नकोस! आम्ही तुला मरू देणार नाही; अरे, ती दारूची बाटली याच्यापुढं आणून ठेव.
डोळ्यासमोर दारूची बाटली असल्यावर हा कामयचे डोळे मिटील ही भीतीच सोडा जीव गेला तरी मरायचा नाही!

मन्याबापू : ऐका हो जनूभाऊ! शास्त्रीबुवा, बघा हो याने जरा डोळे पांढरे केले हो!

विरूपाक्ष: अरे अरे, अरे! अहो, कुणी गंगा इकडे घ्या वर जरा! आणि तसेच तुळशीपत्रही आणा! तळीराम

तळीराम: सावध हो बाबा! वैद्याला, डॉक्टरला बोलावू का?

तळीराम: गंगा नको; तुळशीपत्र नको. काही नको! मला मरताना थोडीशी दारू पाजा म्हणजे झालं! तुळशीपत्राऐवजी तोंडावर एक बूच ठेवा म्हणजे ठसका लागला तरी तोडातली दारू सोडणार नाही! आणा थोडीशी!

विरुपाक्ष : अहाहा, याला म्हणाव खरा दारूचा अभिमानी! पुढच्या जन्मी तू यापेक्षाही मोठा दारुबाज होणार! प्रत्यक्ष भगवतानीच गीतेत म्हणून ठेवल आहे, की

"ये ये वाऽपि स्मरन् माव त्यजत्यते कलेवर।
त तमेवैति कीतेय सदा तद्भावभावितः ॥"

(त्याला दारू पाजतो.)

तळीराम: आणखी थोडी दे म्हणजे मला थोडासा थकवा येईल! मला तुम्हाला माझी अखेरची इच्छा सांगायची आहे! जरा आणखी दे पाहू!

मन्याबापू: आणखी दारूला तू सध्या पात्र नाहीस!

जनूभाऊ : पिऊ दे रे त्याला या वेळी नाही म्हणू नकोस!

(त्याला दारू पाजतात.)

तळीराम: अरेरे. मला दारुसुध्दा नीटशी पिता येत नाही! शास्त्रीबुवा, खुदाबक्ष मी आता मरतो, माझ सांगणं लक्षात ठेवा. आधी त्या भगीरथाला सांगा की तळीराम दारू पिता पिता मेला अखेरपर्यंत प्रेमाच्या पकडीत सापडला नाही सांगाल ना?

विरुपाक्ष: अगदी बजावून सांगू!

तळीराम : मी मेल्यावर माझ्या घरात दारूचाच गुत्ता काढा! त्याच नाव 'तळीराम मोफत मद्यालय अस ठेवा. ते सारी रात्रभर उघड
ठेवण्याबद्दल खटपट करून परवानगी काढा! म्हणजे अडल्याविडल्याची अडचण होणार नाही! त्या मद्यालयात आल्यागेल्यांना, गोरगरिबांना, गोब्राह्मणांना फुकट दारू पाजा! विद्यार्थ्यांना निम्मे दरान दारू विका! माझी खरी भिस्त तरुण पिढीवरच आहे! माझ्या घरातल्या रिकाम्या बाटल्या, ग्लास एखाद्या कुटुंबवत्सल दारुवाजाला द्या! माझ्या वर्षश्राध्दाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा! गोप्रदान करण्याऐवजी बुचाचा एक तराफा माझ्या नावानं नदीत सोडा म्हणजे मी त्याच्यावर बसून वैतरणानदी उतरून स्वर्गात जाईन! दोस्त हो! माझी ही इच्छा पुरी कराल ना? न केलीत तर माझी आशा गुंतून मी भूत होईन मला मुक्ती मिळणार नाही!

मन्याबापू: आम्ही सगळेजण वाटेल ती मेहनत करून तुझी इच्छा पूर्ण करू! तू काही काळजी करू नकोस.

जनुभाऊ: तशातून तू भूत झालासच तरी तुझ्या भुताला आम्ही व्हिस्कीच्या बाटलीत भरून कोडून ठेवू! आणखी काही इच्छा आहे!

तळीराम: आणखी काही नाही वाटेल त्याच्या नादी लागून दारू सोडू नका! दारू न पिण्याची शपथ फार दिवस टिकत नाही; आपल्या आर्यमदिरामंडळाचा अभिमान धरा काही झाल तरी संस्था बुडवू नका! आई आहे गी शास्त्रीबुवा, मला आणखी थोडी दारू द्या! आणि तुम्ही सारेही माझ्याबरोबर शेवटची घ्या! माझी हेल्थ भरपूर ड्रिंक करा! (त्याला दारू देतात व सर्वजण मोठाले पेले भरतात) स्वर्गात मला दारू मिळेल का रे?

सोन्याबापू : तळीराम, टु युवर हेल्थ (सर्व पितात)

तळीराम : थोडी दारू! आणखी एकच प्याला! (मरतो.)

सोन्याबापू : अरेरे, आटपला बाजार! दारूच्या या जिवंत गुत्त्याचे एकदम साडेआठ वाजले! शास्त्री गेला, मदिरेचा खरा कैवारी गेला!

खुदाबक्ष : अभागी अर्थमदिरामंडळाचा खरा आर्य आधार तुटला!

जनुभाऊ : मंदिरे, मंदिरे, तुझी धुंदी उतरली! तुझ्या यशाचा वाटा इथंच राहिला! तुझ्या सौभाग्याच्या लाल तजेल्यावर प्रेतकळा आली! तुझी अडखळती चाल इथं कायमची खुंटली! तुझं बरळणे यापुढं बंद झालं!

शास्त्री : खरा खरा महात्मा दारूबाज आज आम्हाला सोडून गेला! असा दारूबाज पुन्हा होणं नाही!

खुदाबक्ष : ती गोष्टच काढावयाला नको! आपण सारेच पिणारे, पण तळीरामाची गोष्ट निराळी! पिताना कधी दिवस पाहिला नाही, की रात्र पाहिली नाही!

शास्त्री : आज बारा वर्षे झाली, केव्हाही तळीरामाच्या तोंडाची दुरूनच घपकन् घाण आली नाही असं झालंच नाही! असे खडतर व्रत एक पुर तप चालविलं!

खुदाबक्ष : तपस्वीच तो! बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले! बारा वर्षे अडखळत बोलला, आणि अडखळतच चालला!

जनुभाऊ: स्वार्थत्याग तरी केवढा ! दारूसाठी बायको सोडली, मग दुसऱ्या आप्तांची काय कथा!

शास्त्री : दारू पिणारालाच त्यानं आप्त केला हा मन्याबापू जरा नेमस्तपणानं घेणारा, म्हणून नेहमी त्याला आपल्या शेजारी यानं आग्रहानं पाजावी, तसाच मगनभाई, जरा भित्रा, पण त्यालाही- मगन : (एकदम मुक्तकंठाने रडून) तळीराम, आता मला आग्रहान कोण रे दारू पाजील? काटकसरीनं निशा चढविण्यासाठी, मिक्श्चर करण्याचा उपदेश कोण रे करील?

जनुभाऊ : शास्त्रीबुवा, अशा रडण्यानं या महात्म्याचा गौरव कसा होणार? याच्यासाठी उघड्या मैदानात एक जंगी जाहीर सभा जरूर भरविली पाहिजे.

मन्याबापू : बेजबाबदार जंगी जाहीर सभा मुळीच नको! सनदशीर पध्दतीनं इथंच एक सभेची बैठक उठवूया आणि काय करायच ते ठरवून टाकूया. एक छोटसं कार्यकारी मंडळही नेमा पाहू-

शास्त्री : तुमचं म्हणणं उक्त आहे. तुम्हीच कार्यकारी मंडळाचे चिटणीस व्हा.. मन्याबापू : बरं, मग आधी अध्यक्ष निवडा! कोण होतो अध्यक्ष?

खुदाबक्ष: तसं कोण सांगणार? सगळ्याचीच योग्यता सारखी वाटते.

जनूभाऊ : मग चिठ्ठया टाका!

यल्लाप्पा : दम खा! माझी अशी सूचना आहे, की मी अध्यक्ष होतो, तिला आपण सर्वांनी अनुमोदन द्यावं! कारण, अध्यक्षाला सभा संपेपर्यंत स्वस्थ बसून राहणं एवढंच काम करायच असतं आणि मला इतकी जास्त झाली आहे, की थोडया वेळात माझा अगदी लोळागोळा होईल! तेव्हा सभेचे काम आटपेपर्यंत मी आपला प्रेत होऊन अध्याक्षांप्रमाणं पडून राहीन !

खुदाबक्ष: मग तळीरामाचे प्रेतच तुझ्यापेक्षा जास्त योग्य आहे

जनूभाऊ : बरोबर आहे! शिवाय, हल्ली सभांतून, कामाच्या दृष्टीनं थोर माणसांच्या तसबिरा अध्यक्षस्थानी ठेवण्याची वहिवाट आहे. त्या दृष्टीने तसबिरींपेक्षा प्रेत केव्हाही अधिक लायक! सबब तळीरामाच्या प्रेतालाच अध्यक्षस्थानी बसवावे!

खुदाबक्ष : अध्यक्षांची निवड झाल्यावर मी आता सभेपुढं जोरानं पहिला ठराव असा आणतो, की आधी घरातली सगळी दारू पिऊन मग पुढं कार्याला लागावे. ठराव पसार कार्यकारी मंडळाच्या उत्साही चिटणिसानी सर्वांना पेले भरून द्यावेत अशी मी त्यांना जोराने विनती करतो.

शास्त्री: ज्याअर्थी सर्वांनाच चढत चालली आहे, त्याअर्थी यापुढं प्रत्येकानं बसूनच बोलावं, असा दुय्यम ठराव मी पुढं आणतो. माझे पाय लटपटताहेत ठराव लवकर पसार करा!

मगन : (त्याला सावरून) या ठरावाला मी टेका देतो ठराव पसार

जनुभाऊ : तळीरामाच्या मरणानिमित्त शहरातील सर्व दारूची दुकानं दिवसभर बंद ठेवण्याची मक्तेदारांना विनंती करावी, असं या सभेचं ठाम मत आहे.

शास्त्री: खुदाबक्ष वगैरे शेम! धिक्कार! नो, नो!

मन्याबापू : सन्मान्य सभासद जनुभाऊ यांचा ठराव पुष्कळशा सभेला मान्य नाही. मिस्टर विरुपाक्षशास्त्री, राजश्री खुदाबक्ष श्रीयुत मगनभाई व श्रीयुत मी या ठरावाबद्दल जोराने खेद करतो. मृत महात्म्याच्या धोरणाकडे सभेचा कटाक्ष आहे. तळीरामाला दारूची दुकाने बंद झालेली खपत नसत; म्हणून सबंध दिवस दुकानं बंद ठेवण्याऐवजी संबंध रात्रभर दुकान उघडी ठेवण्यासाठीच सभेनं खटपट करावी ठराव पसारा

शास्त्री : सदरहू प्रेताची यात्रा वाजतगाजत काढावी!

मगन: दारूखेरीज अनाठायी खर्च न करण्याकडे तळीरामाचं धोरण होते; म्हणून वाजंत्र्यांचा खर्च ही सभा करू इच्छित नाही! त्याच्या हातापायांच्या काड्यानीच पोटाचा नगारा वाजवावा, अशी माझी उपसूचना आहे. उपसूचना पसारा प्रेतामागं भाडोत्री रडण्यासाठी काही गुजराथी बायका आणण्याची मी खटपट करतो.

जनुभाऊ : शेम्! तळीरामाला बायकांच्या नावाचासुध्दा तिटकारा होता; म्हणून रडण्यासाठी बायकाऐवजी मन्याबापू यांनी काही मवाळ मित्रच आणावे, अशी मी शिफारस करतो.

मन्याबापू : ही सभा या ठरावाचा निषेध करीत आहे. मी असं विचारतो की, जोरानं विचारतो की, मृताच्या अंत्यविधींच्या वेळी, एक विशिष्ट ध्वनी करावा लागतो त्यासाठी आपल्या जहाल जिवलगांना आणायला जनुभाऊ तयार आहेत का? मी स्पष्टच सांगतो, की नेमस्तांसाठी जर पितरपाकाचा रङका पंधरवडा असेल तर जहालांसाठी जोरकस तोंडसुखाचा फाल्गुनमास असता!

खुदाबक्ष : दोस्तहो, असे भांडून सभेत बखेडा घालू नका! ही काय देशातल्या दोन्ही पक्षांतल्या विद्वानांची सभा आहे, म्हणून तुम्ही असा धिंगाणा घालावा? मी ठासून सांगतो- कुत्सित कोटी मनात आणून कोणी हसू नये मी म्हणून टाकतो की मी दारू ठासून सांगतो की, ही आम्हा दारूबाजांची सभा आहे. वर्षातून तीन दिवस चढणारी ही देशभक्तीची निशा नाही; पण दिवसांतून तीन वेळा पचनी पाडलेली ही दारूची निशा आहे. तुम्ही देशभक्त आहात का? तुम्ही विद्वान आहात का? नाही! मग एकेरीवर येऊन सुरळीत सभा मोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अशी एकमेकांवर आग पाखडण्यात काय अर्थ आहे? काम पुढे चालवा.

शास्त्री : मी असा ठराव पुढे आणतो, की तळीरामाचे प्रेत व्हिस्कीच्या बाटल्यांभोवती येणाऱ्या पेंढयाच्या पिशव्यांनी जाळावं!

खुदाबक्ष : आर्यधर्माच्या दृष्टीन हा भडाग्नि होतो. हा धर्मबाह्य ठराव आहे. या ठरावाला मी तळीरामाच्या वतीन हरकत घेतो

मन्याबापू : दोघेही श्रीयुत चुकताहेत! तळीरामाचा दारू पिणं हा एकच धर्म होता सबब धर्माच्या दृष्टीनं पाहता तळीरामाला एखाद्या दारूच्या भट्टीत जाळावं, असा ठराव मी आणतो! पसार! जनूभाऊ मी असा ठराव आणतो की आपण सर्व अगदी गाढव आहोत! प्रेतयात्रा कशी न्यायची हे ठरविण्यापूर्वीच आपण जाळायला आरंभ केला! मिरवणूकीच्या वेळी गाडीचे घोडे सोडून, आपण गाडी ओडून तळीरामाचा सन्मान करावा, अशी मी सूचना करतो.

मगन : या ठरावाला माझा असा वांधा आहे, की घोडे सोडून आपण गाढव गाडी ओढीत बसलो तर ते उलट अपमानकारक आहे!

मन्याबापू: आता फार महत्त्वाचा ठराव मी फारच जोरानं पुढं आणतो. तळीरामाचं काहीतरी स्मारक करायला पाहिजे; त्यासाठी तळीराम स्मारक फंड कमिटी स्थापून तिच्यामार्फत फंड गोळा करण्याचं सभेनं ठरवावी वर्गण्यांचे आकडे भराभर पडले पाहिजेत! आणि याच बैठकीत पडले पाहिजेत. आकडे मोठाले पण पाहिजेत! किमानपक्ष एककान हजाराचा आकडा तरी घातलाच पाहिजे.

शास्त्री : लाखाची गोष्ट सांगितलीता आपले श्रीमंत शेट मगनभाई यांच्यापासूनच शेज धरावी! शेटजींनी तोंड वाईट करण्याचे कारण नाही! है आकडे वसूल करण्यात येतील अशी त्यांनी मुळीच भीती बाळगू नये! आजवर कोणत्या स्मारकसभेनं आकडे वसूल करून स्मारक केल्याचं कोणाच्या स्मरणात आहे? त्या वेळेपुरतेच पहिल्या उसळीच्या भरात हे दर्शनी आकडे टाकायचे असतात! पुढं सर्वांनाच त्या आकडयांसकट स्मारकाचाही विसर पडत जातो!

मगन: तत्राप मी लेखी गुंतायचा नाही; म्हणून या ठरावाला मी जोरान

खुदाबक्ष: हा, मगनभाई-

मगन : या ठरावाला मी जोरान

खुदाबक्ष: हा हा

मगन : या ठरावाला मी जोरानं काहीच करीत नाही!

शास्त्री : आता मृताचं प्रेत बाहेर काढावे असा माझा शेवटचा ठराव आहे. उठा सर्वजण आधी प्रेत बाहेर नेऊन ठेवू! (सर्वजण उठतात व धुंद झालेल्या यल्लाप्पाच्या हातापायांची ओढाताण करतात.)

यल्लाप्पा : मला कोण ओढत आहे, असं ही सभा जोरानं विचारीत आहे.

शास्त्री : मेलेला मनुष्य काही विचारीत नाही, असं बहुमतान सभेचं ठाम मत आहे.

यल्लाप्पा: मी मेलो नाही, असा एकमताने ठराव मी मांडतो.

खुदाबक्ष: मग कोण मेला आहे? कोणी तरी मेला आहे हे खास!

मन्याबापू: पुनः सभेत दंगा सुरू झाला! थांबा, खुदाबक्ष, शास्त्रीबुवा, सभेची जादा बैठक भरवा आणि कोण मेला आहे, हे शिरस्तावर ठरवा!

खुदाबक्ष : ठीक आहे! सभा अशी सूचना करीत आहे, की जो मेलेला असेल त्यानं हात वर करावा. (काही वेळ थांबून) कोणीच हात वर करीत नाही त्याआधी कोणीच मेलेलं नाही असं सभा प्रतिपादन करीत आहे! तळीरामसुध्दा मेला नाही, असं सभेचं ठाम मत आहे!

शास्त्री : याबद्दल सभेला फार आनंद होत आहे. या आनंदाच्या भरात तळीरामाच्या मृत आत्म्याला, तळीराम मुळीच मेला नाही, अशी स्वर्गात अभिनंदनपर तार पाठविण्याची ही सभा ठराव करीत आहे.

सोन्याबापू : अरेरे! फुक्काफुकी सभेचा सारा समारंभ झाला म्हणावयाचा!

खुदाबक्ष : नाही. हा खटाटोप फुकट जाऊ द्यायचा नाही. या खटपटीचा उपयोग होण्याची वेळ येईपर्यंत, म्हणजे कोणीतरी मरेपर्यंत सर्वांनी मुडद्याप्रमाणे इथंच पडून राहावे असा ठराव मी पुढं आणतो ठराव पसारा

(सर्व अस्ताव्यस्त पडतात. पडदा पडतो)


प्रवेश तिसरा

(स्थळ- रामलालचा आश्रम, रामलाल प्रवेश करतो)

रामलाल : (स्वगत) माझ्या मनाच घाणेरड चित्र आता मला स्वच्छपणाने दिसायला लागला माझ्या अधःपाताला काही तरी सीमा आहे का? त्याच्या दृष्टीन कडे पाहताना मानीव नात्याच्या मोठेपणानं रक्तामांसाचे अंगभूत तारुण्य डोळ्यातून मुळीच नाहीस झाल नाही... शरदबद्दल मला जी सहानुभूती. भूतदया म्हणून वाटत होती. ती दुबळ्या मनाच्या हिंदू पुरुषाची पारावतवृत्ती कामुकता होती! गरीब गीतेला विद्यादान करताना, अनाथाला कल्याणाचा मार्ग दाखविल्यामुळेच आपल्याला हे समाधान होत आहे अशी माझ्या मनाची मी फसवणूक करीत आलो; पण ते तशा उदारपणाच नव्हता गीतेला शिकताना पाहून, शरदला समाधान वाटत होते, म्हणून मला त्या वेळी उत्साह वाटे! तोसुध्दा प्रियाराधनाचाच एक मार्ग होता!

(राग भैरव ताल- त्रिवट चाल- प्रभु दाता रे) मन पापी है। करिते निजवचन अनुपटिदिन ।। ध्रु । उपशमपर मतिमेषज सेवुनि सुप्तियन करि परि ते। विफल अति सुविवेकभिन्न ॥ 1 ॥

उपकारांच्या कृतज्ञतेमुळे बिचारा भगीरथ थोडयाच काळात माझ्याशी खुल्या दिलानं बोलूचालू लागला तेव्हा त्याचा मला कंटाळा वाटू लागला अधिक प्रसंगी मनुष्याची ती फाजील सलगी वाढून आपल्याला भगीरथाचा तिटकारा येत असावा अशी मी स्वतःची समजूत करीत होतो; पण ते कंटाळण्याचं खरं कारण नव्हत! भगीरथ आपल्याशी मनमोकळेपणानं वागल्याच शरदन वेळोवेळी सांगितल्यामुळेच, न कळत माझ्या मनात जागृत झालेला गूढ मत्सर हेच त्या कंटाळ्याच कारण होते! त्या तरुण जिवांचा परस्परांकडे ओढा दिसू लागताच माझ्या प्रौढ मनात मत्सराची आग भडकली! तेव्हा - धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाण मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाण मानलेल्या शरद्च्या कोवळ्या हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे. पराक्रमी पुरुषार्थान मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळे दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळ्या जिवावर आम्ही सुलतानी अरेरावीन गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रुवीच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनही मुर्दाड झाल्यामुळे आज आमच्यात वस्तुमात्रातील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही, असे सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलापबुद्धी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थांची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही! पूर्वजानी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येन मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणाऱ्या घारी गिधाडाप्रमाण अगदी क्षुद्र अमिषानसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात, पाच हजार वर्षाचं दीर्घायुष्य मोजणाऱ्या भारतवर्षरूप पुराणपुरुषा! तुझ्या विराट् देहासाठी हिमाचलासारख भव्य मस्तक निर्माण केल्यावर गंगासिंधूसारख्या पवित्र ललाटरेखांनीही विधात्याला तुझ्या सुखाचा चिरकालीन लेख लिहिता येऊ नये का? सांग, हतभाग्या भारतवर्षा! भावी काळी या रामलालासारखी कंगाल पैदास आपल्या पोटी निपजणार, या कडू भीतीमुळे दक्षिण महासागरात जीव देण्यासाठी कमरेइतका उतरल्यावर कोणत्या पापांची प्रायश्चित्तं देण्यासाठी परमेश्वरानं तुला उचलून धरला? परमेश्वरा, माझ्या अपराधाची मला कधी तरी क्षमा होईल का? भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसऱ्या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळे भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवाची क्षमा माग

भगीरथ : भाईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतला तर तुमच्या लाडक्या भगीरथाला तुम्ही क्षमा कराल का? आपल्या पायाजवळ एक विनती करण्यासाठी मी आलो आहे.

(स्थळ- रामलालचा आश्रम, रामलाल प्रवेश करतो.)

रामलाल: (स्वगत) माझ्या मनाचं घाणेरडं चित्र आता मला स्वच्छपणान दिसायला लागला माझ्या अधःपाताला काही तरी सीमा आहे का? | पित्याच्या दृष्टीने शरद्कडे पाहताना मानीव नात्याच्या मोठेपणानं रक्तामासाचं अंगभूत तारुण्य डोळ्यातून मुळीच नाहीस झालेलं नाही. शरदबद्दल मला जी सहानुभूती, भूतदया म्हणून वाटत होती, ती दुबळ्या मनाच्या हिंदू पुरुषाची पारावतवृत्ती कामुकता होती! गरीब गीतेला विद्यादान करताना, अनाथाला कल्याणाचा मार्ग दाखविल्यामुळेच आपल्याला हे समाधान होत आहे अशी माझ्या मनाची मी फसवणूक करीत आलो; पण ते तशा उदारपणाच नव्हत! गीतेला शिकताना पाहून, शरदला समाधान वाटत होतं, म्हणून मला त्या वेळी उत्साह वाटे! तोसुध्दा प्रियाराधनाचाच एक मार्ग होता!

(राग भैरव ताल- त्रिवट, चाल- प्रभु दाता रे.) मन पापी है। करिते निजवचन अनुघटिदिन ।। ध्रु । उपशमपर मतिमेषज सेवुनि सुप्तियन करि परि ते । विफल अति सुविवेकभिन्न ॥ 1॥

उपकारांच्या कृतज्ञतेमुळे विचारा भगीरथ थोडयाच काळात माझ्याशी खुल्या दिलाने बोलूचालू लागला तेव्हा त्याचा मला कंटाळा वाटू लागला अधिक प्रसंगी मनुष्याची ती फाजील सलगी वाढून आपल्याला भगीरथाचा तिटकारा येत असावा अशी मी स्वतःची समजूत करीत होतो; पण ते कटाळण्याच खर कारण नव्हते! भगीरथ आपल्याशी मनमोकळेपणानं वागल्याच शरदन वेळोवेळी सांगितल्यामुळेच, न कळत माझ्या मनात जागृत झालेला गूढ मत्सर हेच त्या कंटाळयाचे कारण होते! त्या तरुण जिवांचा परस्परांकडे ओढा दिसू लागताच माझ्या प्रौढ मनात मत्सराची आग भडकली! तेव्हा - धिक्कार, शतशः धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाण मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाण मानलेल्या शरद्च्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे. पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणान मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळे दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवावर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या स्वीच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळे आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही, असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थांची पराक्रमशक्ती नाही आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही! पूर्वजानी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनही ताबडतोब बंद पडते. विद्येन मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवल तरी आमची मन आकाशात फिरणाऱ्या घारी गिधाडांप्रमाण अगदी क्षुद्र अमिषानसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात. पाच हजार वर्षाच दीर्घायुष्य मोजणाऱ्या भारतवर्षरूप पुराणपुरुषा! तुझ्या विराट् देहासाठी हिमाचलासारखं भव्य मस्तक निर्माण केल्यावर गंगासिंधूसारख्या पवित्र ललाटरेखांनीही विधात्याला तुझ्या सुखाचा चिरकालीन लेख लिहिता येऊ नये का? सांग, हतभाग्या भारतवर्षा! भावी काळी या रामलालासारखी कंगाल पैदास आपल्या पोटी निपजणार, या कडू भीतीमुळे दक्षिण महासागरात जीव देण्यासाठी कमरेइतका उतरल्यावर कोणत्या पापाची प्रायश्चित्तं देण्यासाठी परमेश्वरान तुला उचलून धरला? परमेश्वरा, माझ्या अपराधाची मला कधी तरी क्षमा होईल का? भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसऱ्या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळ भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवाची क्षमा माग

भगीरथ : भाईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतला तर तुमच्या लाडक्या भगीरथाला तुम्ही क्षमा कराल का? आपल्या पायाजवळ एक विंनती करण्यासाठी मी आलो आहे.

रामलाल : भगीरथ, माझ्याशी बोलताना आजच इतकी औपचारिक वृत्ती का वापरतोस?

भगीरथ: भाईसाहेब, लोकसेवा करण्याची विद्या शिकण्यासाठी म्हणून मी आपल्या आश्रयाला उभा राहिलो आहे पूर्वी सर्व विद्याप्राप्ती करून गुरुगृह सोडून जाताना गुरुदक्षिणा देण्याची वहिवाट होती; पण हल्लीच्या काळात दर महिन्याला अगोदर फी द्यावी लागते! भाईसाहेब या नव्या पध्दतीला अनुसरून मी तुम्हाला गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी आलो आहे. तिचा स्वीकार करून या आपल्या बाळाला आशीर्वाद द्या!

रामलाल : कसली दक्षिणा देणार तू?

भगीरथ: माझ्या स्वाधीन झालेल्या शरदच्या प्राणांची! भाईसाहेब, आपल्या सांगण्याप्रमाण आपलं सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करायला मी तयार आहे!

रामलाल: शरद्, भगीरथान म्हटल ते खरं का?

(शरद् खाली पाहते.)

भगीरथ: संकोचवृत्तीमुळे या प्रसंगी ती काय बोलणार?


रामलाल : (स्वगत) हो, खरच! याच काय, पण कोणत्याही प्रसंगी बिचारी हिंदू बालविधवा काय बोलणार? गाईला आत्मा नाही, अस ख्रिस्ती धर्मार्थ तत्त्व नव्यानं ऐकताच आम्ही आर्यधर्माभिमानी उपहासानं हसलो, पण माझ्यासारख्या जुलमी जनावरांच्या पशुवृत्तीन या गरीब गाईना आत्मा तर नाहीच पण जीभसुध्दा ठेविली नाही!

भगीरथ : शरद्, भाईसाहेबांना माझं म्हणणं खरं वाटत नाही; माझ्या शब्दासाठी तू-

रामलाल: थांब, भगीरथ, शरचा त्याग तू इतक्या सहजासहजी करायला तयार झालास हे तुझ्या प्रेमाचंच लक्षण समजू का? मला वाटतं, शरदवर तुझे मनापासून प्रेम मुळीच नव्हत! भगीरथ अस आपल्याला वाटत! सर्वसाक्षी सर्वेश्वराला काय वाटतं, ते भाईसाहेब, क्षमा करा, शरदविषयी माझ्या तोंडचे असले उद्गार तिच्या माझ्या नव्या नात्याला कमीपणा आणतील! आपल्या पदवीला पोहोचल्यामुळे शरदबद्दल सलगीन बोलण्याला मला अधिकार नाही!

रामलाल: (स्वगत) शाबास, भगीरथ, शाबास! तू जितका थोर आहेस तितकाच हा रामलाल नीच आहे! माझ्या मनाच्या हलकेपणामुळे बिचाऱ्या शरद्च्या प्रेमाचे तुला मलाचे धिंडवडे निघाले. ( उघड) अशा पवित्र प्रेमानं तिच्याशी वचनबध्द झाल्यावर तिचा त्याग करणं तुला उचित आहे का?

भगीरथ: एक वेळ नाही. पण हजार वेळ उचित आहे! ज्या कार्यासाठी आपण मला जीवदान दिल, त्या कार्यासाठी मला हा मोह सोडायचा आहे! शरदच्या लोभात भी सापडलो, तर आपला उपदेश मला साधणार नाही आणि भावी आयुष्याचा सन्मार्ग मला सापडणार नाही! समाजस्वरूप विराट्पुरुषाची सेवा करण्यासाठी, माझ्या देशाच्या कारणी पडण्यासाठी, आपल्या उपदेशासाठी, संसारसुखाचा आणि प्रेमाचा पाशबंध हा भगीरथ ताडून तोडून टाकीत आहे! आपल्यासारख्या थोर पुरुषाचा उपदेश-

रामलाल : भगीरथ, उपदेश करणं हे इतकं सोप काम आहे, की त्यामुळे मला थोर म्हणणं केवळ हास्यास्पद आहे! उपदेश करण्यापेक्षाही उपदेश ऐकून मोहाला झुगारून देणाराच नेहमी श्रेष्ठ असतो. मोठ्या मनाच्या मुलांनी, त्यागधर्माच्या तेजोमय तत्त्वान देदीप्यमान झालेल्या तुम्हा दोघांच्या मुखमंडलीकडे तोंड वर करून उघडया डोळयांनी पाहण्याची या क्षुद्र मनाच्या रामलालची योग्यता नाही! क्षणमात्राच्या पातकी मोहावेगाची मला क्षमा करा! बेटा शरद्, माझ्या अभद्र शब्दांची, पामर मनाची आणि या शेवटच्या पापस्पर्शाची मला एकदाच क्षमा कर! भगीरथ, शिष्यान गुरुला आधी गुरुदक्षिणा द्यावी, हा जसा हल्लीचा परिपाठ आहे. त्याचप्रमाण कुशाग्रबुध्दीच्या शिष्याला उत्तेजनासाठी पारितोषिक द्यावं, असाही नियम आहे माझ्या उपदेशाचा पहिला धडा तू इतक्या हुशारीन शिकला आहेस की तुझा गौरव करण माझे कर्तव्य आहे! उदार बाळा, हे आपल सुंदर चित्र घेऊन जन्माचा सुखी हो!

(शरचा हात भगीरथाच्या हातात देतो.)
(राग देसकार ताल- त्रिवट चाल- अरे मन राम) स्वीकारी रम्य अमल चित्रा या योग्य तुला प्रतिफल घ्याया भु.।। छात्रा पर गुणी अभ्यसनी हे वितरित गुरुमाया ।। 1 ।।

भगीरथ, लोकसेवेचं खडतर व्रत आचरिताना कधी कधी पुढाऱ्याला लोकापवादाला पात्र व्हावं लागतं, अशा वेळी निंदकांच्या वाग्बाणानी दुभंगलेल्या हृदयाच्या जखमा बऱ्या करण्यासाठी शरदच्या प्रेमळ अश्रूंची तुला भविष्यकाळी जरूर पडेल. रामलालच हे रिकामं हृदय- (गीता रडत येते; तिला पोटाशी धरून) ये बाळ, ये रामलालच हे रिकामे हृदय तुझ्यासारख्या अनाथ जिवासाठी अर्पण केल आहे! तळीरामाच्या अकाली मृत्यूमुळे तुझ्यावर जो अनर्थ गुदरला त्यात तुला पैशाखेरीज काही उपयोगी पडणार नाही. माझ्या पोक्त क्यातली काही वर्षे बाद करून स्वतः तरुण होण्याचा आणि त्यांची शरद्च्या कोवळ्या आयुष्यात बोजड भर टाकून तिला पोक्त करण्याचा नीच प्रयत्न करण्यापेक्षा तुझ्या वयातली काही वर्षे आपल्यासाठी घेऊन तुझ्यासारख्या कन्येशी पितृधर्मानं वागण्यातच या रामलालच्या वृध्दत्वाचं सार्थक होईल.. माझ्या चुलत्याची मला मिळालेली सर्व संपत्ती मी तुला देत आहे! तीच तुझ्या कामी येईल! तुझ्यासारख्या कुरुप विधवेबद्दल सहानुभूती वाटण्याइतकी व्यापक सुधारणा अजून आपल्या समाजात जन्मली नाही! भगीरथासारखं अपवादभूत रत्न एखादंच सापडण्याचा संभव! बाकी बहुतेक समाज रामलालसारख्या मनाचाच आहे! माझ्या उदाहरणावरून मला वाटायला लागलं आहे की. आमची सुधारणेत बरीचशी आत्मवंचना आहे! अनाथ बालविधवेची दया येण्यालाही आम्हाला चांगल्या चेहेऱ्याचा आधार लागतो. आमची सुधारणा अद्याप डोळ्यापुरतीच झालेली आहे! आमची विद्या अजून जिभेवरच नाचत आहे. जिभेचा शेंडा कापून टाकला तर आमच्यात संस्कृत व प्रौढ मानलेला सुशिक्षित कोणता हे देवालाही कळायचं नाही! इतका वेळ शरदच्या प्रेमाला पात्र होत नव्हती म्हणून मला खेद वाटत होता; पण प्रेमाला पात्र होणं हा मनुष्याचा धर्म असेल तर दया हा देवांचा गुण आहे!

(पद्माकर येतो)

पद्माकर: भाई, सुधाकरान आपल्या मुलाचा खून केला आहे आणि ताईला घातक जखम केली आहे! त्याला फौजदाराच्या ताब्यात देण्यासाठी मी निघालो आहे- चल माझ्याबरोबर

रामलाल: काय म्हणतोस तरी काय हे?

पद्माकर : वाटेन सर्व सांगतो; पण आधी लवकर चल; आणखी हेही सांगतो, की सुधाकराबद्दल या वेळी रदबदली करू नकोस. त्या नरपशूच्या मोहातून सुटली तर माझी अनाथ ताई अन्नाला तरी लागेल! चल, चल लौकरा

रामलाल: अरे, पण असा अविचार-

पद्माकर : माझ्या ताईन भोगलेल्या हालअपेष्टाची शपथ घेऊन सांगतो, की सुधाकराला सरकारी शासन देवविल्याखेरीज मी आता थाबणार नाही! याला अविचार म्हण, सूड म्हण, काय वाटेल ते म्हणा चल लौकर!

रामलाल : भगीरथ, शरद् आणि गीता यांना घेऊन ये. सुधाकराकडे चल

(सर्व जातात.)


प्रवेश चवथा

(स्थळ- सुधाकराचे घर पात्रे आसन्नमरण सिंधू जवळ सुधाकर, पद्माकर, रामलाल आणि फौजदार )

पद्माकर: दादासाहेब, हे पाहा मेलेल मूलः हे या हरामखोरान ठार मारल! ही पाहा माझी ताई! या दीनदुबळ्या देहाची या दारूबाज दुष्टानंच प्राणांतिक दुर्दशा केली आहे! असाच पकडा या नराधमाला-

फौजदार: भाऊसाहेब, अस रागावून काय होणार? थांबा, आपण बाईंना नीट विचारून पंचनामा करू.

पद्माकर: ताई, ताई, सिंधुताई-

रामलाल: भाऊ, थांब जरा असा हातघाईवर येऊ नकोस! तिला जरा ग्लानी आली आहे!

पद्माकर: ही ग्लानी ही ताई हे सारे सार या दारुड्या राक्षसाच अघोर कर्म आहे! दादासाहेब काय वाटेल ते करा, पण या काळतोंडयाला- तार्हच्या पंचप्राणांवर दरोडा घालणाऱ्या या दारुड्याला काही तरी भयंकर शिक्षा भोगायला लावा!

रामलाल : भाऊ, व्हायचं ते झाल; आता यांच्यावर राग धरून झाली गोष्ट पुन्हा येणार आहे का?

पद्माकर: भाई, माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नकोस! या चांडाळान माझी सोन्यासारखी ताई अन्नावाचून झिजवून झिजवून मारली- काठ्या दगडांनी ठेचून मारली- कोळयामाळ्याच्या तोडी येणार नाहीत अशा शब्दांनी या मात्रागमनी नीचान तिच्या काळजाला घरे पाडून मारली! दादासाहेब, तुमच्या पाया पडतो, काही झाल तरी याला मोकळा सोडू नका हो! बुध्दिपुरस्सर गुन्हा केला म्हणून तुरुंगात नेऊन घाला किंवा दारूने माथ फिरलं आहे म्हणून वेडयाच्या दवाखान्यात नेऊन लोटा, अक्कलवान गुन्हेगार म्हणा, किंवा निर्बुध्द पशू म्हणा, पण याला कुठल्या तरी कोंडवाड्यात घाला! याच्या मोहाला गुंतूनच माझी ताई म्हणजे देवी आहे हो- नवरा म्हणून ठरलेल्या या जनावराच्या नावाची
पंचप्राणांच्या पुष्पांनी पूजा करण्यासाठी ही हथ गुंतून राहिली आहे. देवमूर्ती म्हणून मानिलेला हा दगड एखाद्या नरककुंडात रिचवून हिच्या नजरेआड केला म्हणजे हिला घरी नेऊन हिच्या औषधपाण्याची तरी व्यवस्था करता येईल हो!

फौजदार: भाऊसाहेब, जरा शांत व्हा आपण असे बोलू लागला-


पद्माकर: दादासाहेब, माफ करा. दगडाचा पुतळा असतो तरीसुध्दा सव्वा हात जीभ बाहेर काढून बोलायला लागलो असतो! मग आता तर चांगला रक्तामांसाचा- हिच्याच रक्तामांसाचा तिचाच भाऊ आहे काय सांगू हो. बोट करून दाखवायला तिच्या अंगावर रक्तमांससुध्दा राहिल नाही, तेसुध्दा या राक्षसान गिळून टाकल दारूच्या घोटाबरोबर हिच्या रक्ताचा घोट घेऊन जित्या अंगातील मासाचे लचके तोडून या पिशाच्चाने आहारून टाकले चार गिरण्यांच्या मालकाची ही मुलगी, या शिकलेल्या दारूबाजाने आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता तिला जात्यावर दळायला लावलं. आमच्या घरी कुत्र्याच्या पिलांना जे दूध मिळत मिळत कसल, त्यांना पाजताना हलगर्जीने खाली सोड तितकसुध्दा या गोजिरवाण्या बाळाला कधी लाभलं नाही! आमच्या घरी मोलकरणीन उष्टखरकटं टाकले असेल, तितक अन कधी हिला मिळालं नाही! याच्याकडे पाहिलं म्हणजे दयामाया पार जळून जातात! दगड असतो तर मनुष्य झालो असतो, आणि मनुष्य आहे, तरी दगड झालो आहे. याच्या गळ्याला फास घालताना, ताईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं तरी चालेल! ताई, सिंधूताई, ऊठ बरं, बाळ!

(तिला किंचित उठवून बसवतो.)

सिंधू : दादा, केव्हा आलास तू? भाई, तूही आलास? तिकडे कुणीकडे असायचं? दादा ऊठ बरं, चुलीवर थोडा भात आहे; दोन तांबे अंगावर घालून चार घास खायला घाल! तिकडे कालपासून पोटात काही नाही!

पद्माकर: याच्या तोंडात चार घास घालण्यापेक्षा याच्या पिढब्रह्मांडाचा एकच घास करून काळाच्या पोटात कोबण्यासाठी मी आलो आहे! ताई, हे पाहा फौजदारसाहेब तुझा जबाब घेण्यासाठी आलेले आहेत. या खुनी दारूबाजान काय काय केल ते सगळ यांना नीटपणे सांगा! दादासाहेब, विचारा तिला काय विचारायचं ते

फौजदार: बाई, यांनी काय काय केलं ते सांगा बरे!

सिंधू: यांनी काही केलं नाही कुणी सांगितलं आपल्याला हे?

फौजदार : मग मुलाला काय झाल? तुम्हाला हे कपाळावर लागलं कस ?

सिंधू : मी दोन दिवसांची उपाशी होते मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळ्यावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळे मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरल! इकडचा काही संबंध नाही त्यात!

पद्माकर: ताई, अगदी खोट सांगितलंस! मग या काठीला रक्त कसे लागल?

सिंधू : काठी टेकीत रक्त भरल्या हाती मी इथपर्यंत आले. तिकडचा काही संबंध नाही त्यात!

फौजदार: बाई, हे सारे खरे आहे का?

सिंधू : खरं अगदी खरं आहे! माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा!

पद्माकर: नाही हो; दादासाहेब, उघड उघड हे खोट आहे! ताई, तुला माझी, बाबांची, तुझ्या नवऱ्याची शपथ आहे. खर सांग,

सिंधू: दादा, असा का अंत पाहतोस? मी सांगितल ते खरं आहे अगदी!

पद्माकर: दादासाहेब, हे खोट आहे हो! काय कराव आता?

फौजदार : भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं आमचं काय चालणार? न्यायाच शस्त्र कितीही तीक्ष्ण असल तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची बाल आड आल्यावर ते काय करणार?

पद्माकर : दादासाहेब! हिच्या खोटया बोलण्यामुळे या हरामखोराला मोकळा सोडता काय?

फौजदार : भाऊसाहेब, प्रत्यक्ष गंगाप्रवाहात पोहणारावर उगीच आग पाखडून काय होणार!

रामलाल: शाबास, सिंधूताई, शाबास! भाऊसाहेब, देवब्राह्मणांच्या सत्यतेपेक्षाही अशा पुण्यरूप सतीच्या असत्यालाच परमेश्वराच्या आशीर्वादाचं अधिक बळ असतं! भाऊ, जाऊ देता झालं ते झाल! सिंधुताई, तू मात्र धन्य आहेस! तुझ्यासारख्या आर्या अजून आहेत. म्हणूनच या पुण्यभूमीला आर्यावर्त नाव शोभत! भारतवर्ष साध्वीसतीच माहेरघर आहे! सरकारने सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवऱ्याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत! भाऊसाहेब, सिंधूताईच्या इच्छेसाठी तरी सुधाकरावरचा राग सोडून द्या!

सिंधू : दादा, इकडे ये, माझ्या शेजारी बैस असा! दादा, आपल्या माणसावर असा राग करून चालेल का? माझी जातीघडी सरत आली! बाबाच्याखेरीज आणि तुम्हा दोघांखेरीज तिकडे आपलं म्हणायला कोणी आहे का आता? असे रत्न मी मागे टाकून जाते. ती तुझ्या धीरावर ना? तूच आता त्यांच्या उन्हात तापल्या जिवावर पदर घालायला नको का? तुझ्या ताईच सौभाग्य तूच आता जपून ठेवलं पाहिजेस. लहानपणी माझ्या कुकवाला तजेला यावा म्हणून तू माझ्या करंड्यात मृगाची इवलाली पाखर आणून ठेवीत होतास, आठवत का? मग आताच ती माया कुठे गेली? माझ्या सौभाग्याचं कुंकू तुझ्याच ठेवणीला देऊन मी जात आहे!


पद्माकर: छाकटया सैताना, ऐक ऐक माझ्या लाडक्या ताईचा एक एक बोल! पण तुझे डोळे कुठले उघडायला? ताई, ताई, काय म्हणतेस है।

रामलाल : भाऊ, फौजदारसाहेबांना जायला वेळ होत नाही का?

फौजदार : चला, भाऊसाहेब पण केव्हा तरी तेवढी फिर्याद काढून घ्या म्हणजे झाला

(फोजदाराना पोहोचविण्यासाठी रामलाल व पद्माकर जातात.)

सुधाकर : (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे. कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) है. हेच ते विषारी औषध कुठे आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्माची वैरीण?

(एका पेल्यात दारू व विष ओततो.)

सिंधू: ऐकलं का? जरा माझ्याजवळ यायचं होतं-

सुधाकर: तुझ्याजवळ येऊ? (तिच्याजवळ बसून) काय काम आहे?

सिधू : माझे डोके आपल्या मांडीवर ठेवावी आपला हात माझ्या हातात द्यावा-

सुधाकर : (तसे करून सिंधू, सिंधू, देवतास्वरूप सिधू काय तुझी दुर्दशा झाली ही सिंधू, या दारूबाज नवयाच्या पायी तू बुडालीस! अपशब्दांनी तुझा अपमान केला! कधी तुला गोळाभर अन्न मिळाल नाही! पोटासाठी तुला दळायला लावला तुझे हालहाल केले! तुझ्या पोटचा गोळा तुझ्या डोळ्यादेखत चेचून टाकला! देवी, संसाराच्या वनवासात फाटक धोतर आड करून तुला वणवणायला लावली सिंधु, सिंधु, उदारहृदये सिंधू, शापाच्या एका शब्दानं मला जिता जाळून टाक! पदरीचे पुण्य खर्चून, खोटं बोलून या सुधाकराला कशाला वाचवीत बसलीस? तुझ्या पुण्याईन स्वर्गाचा संसार सजवून साजरा करण्याची तुझी योग्यताः चौऱ्याऐशी लक्ष जन्माची सचित या जन्मी उभी राहिली आणि विधात्यान 'सुधाकर' हे दारून ओयबलेल नाव तुझ्या फाटक्या कपाळी कोरला सिंधू, देवी, मला क्षमा कर या अनंत अपराधी पातक्याला क्षमा करा

सिंधू: आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवान, आपल्या माडीवर मला मरण आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे! आधीच प्रकृती अशी झालेली! उन्हाच्या वेळी सतापानं डोकं तापलं तर सुंठ उगाळून द्यायलासुध्दा कोणी नाही. जाणखी माझ अखेरच हात जोडून सांगणं आहे. आता आपल्या जिवाला जपणारं कुणी नाही. लोक सारी ज्याची त्याला असतात. माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती. आपण आता एकटे राहिला आता पुढं तरी माझ्या रक्ताची शपथ आहे आपण यापुढं कधी घेऊ नये! ऐकायच ना माझे एवढा एका थेंबालासुध्दा शिवायचं नाही-

सुधाकर: नाही, सिंधू उभा जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडण्यात घालविला! तुझी शेवटची आज्ञा तरी पाळण्याइतका हा पातकी सुधाकर भाग्यशाली नाही! हा शेवटचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे नको, दुर्दैवी जीवा, आता माझ्याकडे पाहू नकोस! या विजत चाललेल्या डोळयात अनाथ आशा अजून कशाला तळावते आहे. सिंधु, सिंधु, काय रामलाल, धाव-

सिंधु: नाथ, जिवाला साभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा-

(सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)

सुधाकर: थोडाळा, ऐन वेळी असा घात करू नकोस!

रामलाल: सुधा, काय प्यालास हे?

सुधाकर: दारू एकच प्याला!-

रामलाल: अजून दारू जिन एवढा अनर्थ केला तीच दारू?

सुधाकर: होय, रामलाल, तीच दास्त जिन माझ्या घरात एवढा अनर्थ केला तीच दारू जिन चारी खंडात अनर्थाचे साम्राज्य चालविले आहे ती दारूए कुबेराला भीक मागायला लावते ती दारू! भीमासारख्या वज्रदेही शरीराला बहात्तर रोगाचा दवाखाना बनविते ती दारू शिकलेल्या शहाण्याच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिव्याशेणानी शोभा आणते ती दारू महापतिव्रताना नवऱ्याच्या हातानं बाजारात आणून बसवते ती दारुा जिवलग नात्याचे धागे कुजवून तडातड तोडते ती दारूस बापाला मुलाकडून, मुलाला बापाकडून ठार मारविते ती दाशा डुकराच नावसुध्दा न घेणाऱ्या पाक मुसलमानाला डुकरासारख खातेऱ्यात लोळविते ती दारू गायत्रीमंत्रान पवित्र झालेल्या ब्राह्मणांच्या जिभेला गायत्रीच्या मांसाची चटक लावते ती दारूत एखाद्या पशूप्रमाण पुत्राला मात्रागमन्याप्रमाण प्रत्यक्ष जन्मस्थानी- अरेरे! बोलू नये ते बोलणं आलं! पण सुधाकराच्या ज्या जिभेन दारुचा विटाळ मानला नाही, त्या जिभेला एक किळसवाण्या शब्दानं काय वाट लागणार! आणि समाजात ठिकठिकाणी शिकलेल्या संभावित गळ्यातून जी दारूची गटार वाहताहेत त्यात एका शब्दाची घाण वाहून जायला किती वेळ लागणारा- रामलाल, कान फोडून स्पष्ट ऐक पुत्राला मात्रागमन्याप्रमाण प्रत्यक्ष जन्मस्थानी लघुशंका करायला लावते ती दारू! ती दारू मी प्यावी अ आता तोड वाईट करू नकोस! रागावू नकोस तुला एकदा सांगितल, आज शेवटच सांगून ठेवतो, की दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वी काय तो असतो! पहिला एकच प्याला घेण्यापूर्वी भावी मद्यण्याचा हात धरला तरच फायदा होईल! ज्यान एकदा पहिला एकच प्याला घेतला त्याला हा शेवटचा असा एकच प्याला घ्यावाच लागतो! दारुबाज दारुतच मरायचा, हे ब्रह्मवाक्यच आहे! आणि माझ्यासारख्या एखाद्याला पश्चात्ताप झाला तरी हा एकच प्याला काही टळत नाही! मात्र जळफळीत औषधाला मारण्यासाठी त्यात जस पुष्कळस पाणी ओतावं लागतं, त्याप्रमाण हा अखेरचा एकच प्याला घेताना, त्यातली दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापरासारखं एखादं विष बरंच घालावे लागती.


रामलाल : काय? यात रसकापूर? आत्यंतिक घातक रसकापूर घातला आहेस? भयंकर विष प्यालास?

सुधाकर: विष पिऊ नको तर काय करू? ही पाहा ही देवता मला सोडून गेल्यावर जगात माझ काय राहिल आहे?

रामलाल : काय, ताई गेली?

(सिंधूजवळ जाऊन बसतो.)

सुधाकर: हो, रामलाल, ती गेली! माझी सिंधू गेली! माझी पुण्याईची सिंधू आटली! माझी दयेची सिंधु करुणरसाची सिंधू, काळ-सागराला मिळाली नाही, या पातकी सुधाकरान निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली या सुधाकराचं जग दारूच्या एकच प्याल्यात बुडून गेला!

(राम-भैरवी ताल- दादरा चाल- पिया सोने दे.)
त्यजी देवा हतदेवा जगी राही काय ॥ ध्रु ॥ सिंधू सुखाचा पुण्याशाचा सकळ आटे तापे मम । विशाल जरी हाय ॥ 1॥

वामन अवतारी देवाला त्रिभुवनाचं माप घेण्यासाठी अवाढव्य त्रिविक्रमरूपान तीन पावलं टाकावी लागली, पण या सुधाकराच उभ त्रिभूवन या देवीच्या दोन पावलापुरतंच होतं! त्याच पायावर मस्तक ठेवलं असता मला मरण यायला पाहिजे या देवतेचे पाय धरून असा हिच्याबरोबर मी गेलो तरच हिच्या पुण्यबलान माझी पातकं जळून मला स्वर्गद्वारात प्रवेश करता येईला गेली! दिव्यतपस्विनी मंगलनिधान पूण्यमूर्ती सिधू गेली! रामलाल, तुझी ताई गेली आणि माझी मानलेली आई गेली: रामलाल, रामलाल, हा सारा अनर्थपात होण्याच कारण मी पहिल्यानं घेतलेला दारूचा एकच प्याला! त्या दिवशी केलेल्या पातकान भ्रष्ट झालेलं तोंड या देवीच्या रक्तान या मूर्तिमंत अमृतानं धुऊन टाकतो. (तिच्या रक्ताचे चुंबन घेतो.) म्हणजे माझा पवित्र देह स्वर्गाला पात्र होईल! रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून साऱ्या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला अडाण्याला, राजाला रेकाला ब्राह्मणाला-महाराजाला-म्हाताऱ्याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्माच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीन सांग, की साऱ्या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठान प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस!
(सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो )

रामलाल: अरेरे, काय हा अनर्थ! एकदम तीन जिवाच्या तीन परी झाल्या! मूल गेल, सिंधू गेली, सुधाकर गेला! घर बुडालं आणि वंश बुडाला! या जगात सुधाकराचं आता काय राहिलं आहे? सर्वस्वासह हे तीन जीव ज्याच्यात बुडाले तो तेवढा दारूचा हा एकच प्याला!!-

ब्रह्मार्पण ब्रह्महविर्ब्रह्माग्रा ब्रह्मणा हुतम्। 
ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्मसमाधिना ॥article-image
 
 

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा