shabd-logo

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023

20 पाहिले 20
अंक तिसरा

प्रवेश पहिला

(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )

सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बाळ, गाणं म्हणून

(चाल- विडा घ्या हो नारायणा )

तुला घास भरवते ही ऐक नीटा गडबड केलीस तर नाही म्हणायची बरं का? आणखी घासाबरोबर दुधाचा एकएक घोटही घ्यावा लागेल.
घेई कोंडा-कणी त्रैलोक्याचा चणी
घास घेरे तान्ह्या बाळा गोविंदा गोपाळा । भरवी यशोदामाई सावळा नंदबाळ घेई ॥ ध्रु. ॥ विदुरावरीचा पहिलावहिला घास ॥ 1 ॥ पोहे मूठभरी क्षीराब्धीच्या हरी मैत्र सुदामजीचा आला दुसरा घास ॥ 2॥ थाली एक्या देठी घ्यावी जगजेठी। द्रोपदीमाईचा आला तिसरा घास ॥ ३॥ शबरीभिल्लिणीचा घ्या हो चवथा घास ॥ 4 ॥ टाकू ओवाळून मुखचंद्रावरून ।
उरल्या उष्टावळी फळांच्या वनमाळी ।
गोविंदाग्रजाचा उरलासुरला घास ॥ 5॥
है, चला, झालं बरं आता! झाली पुन्हा दांडगाईला सुरुवात? वन्सं, सांभाळा बाई तुमचे रत्न है! तुमची माणसंच भारी अचपळ ! नाही तर थांबा हे बघा गीताबाई, बाळाला पाळण्यात नेऊन निजवा बरी (गीता येते) है, गीताबाईंना बघितल्याबरोबर लागला हसायला! गीताबाईंच्याबरोबर भटकायला सापडतंना इकडे तिकडे! (गीता मुलाला घेऊन जाते) वन्स, भाईला सकाळपासून दोन-तीन बोलावणी झाली येतो येतो म्हणून म्हणतो, अजून का बरं येईना? वन्स, मला आपले भलतंच स्वप्न पडायला लागले आहे.

शरद : वहिनी, तुम्ही उगीच काळजी करता, झाला कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसल म्हणजे खाल्लेले अन्नसुध्दा अंगी लागायचं नाही.

(राग भीमपलास, ताल- त्रिवट चाल रे बलमा बलमा) छळिती या हृदया अदया भ्रांत मनोरचना कालगुणा ॥ ध्रु. ॥
मातृजीवना झिजवुनि जगती अंती घेती तयासह त्या निधना ॥ 1॥

सिधू : काही म्हणा, काही सांगा माझ्या मनाचा आपला धीरच सुटल्यासारखा झाला आहे. भाईची तार मिळाल्या दिवसापासून उरात धडकी बसून जिवाला काळजी लागली आहे.

(राग काफी जिल्हा, ताल त्रिवट चाल इतना संदेश वा.) दहती बहू मना नाना कुराका ॥ धुः ॥
विपदा विकट घोर निकटी विलोकी। मन कंप घेत गणिते ना विवेका ॥ 1॥

(स्थळ : सुधाकराचे घर पात्रे सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )

सिंधू : हे काय हे असं? दुधाशीसुध्दा दांडगाई अशी? झाल, लाथाडलस गोकर्ण धरू का चिमुकला कान एकदा? थांब बाळ, गाणे म्हणून
तुला घास भरवते हं! ऐक नीटा गडबड केलीस तर नाही म्हणायची बर का? आणखी घासाबरोबर दुधाचा एकएक घोटही घ्यावा लागेल.
(चाल- विडा घ्या हो नारायणा )
घास घेरे तान्ह्या बाळा गोविंदा गोपाळा । भरवी यशोदामाई सावळा नंदबाळ घेई ॥ ॥
घेई कोंडा-कणी त्रैलोक्याचा धणी ।
विदुरावरीचा पहिलावहिला घास ॥ 1 ॥
पोहे मूठभरी क्षीराब्धीच्या हरी
मैत्र सुदामजीचा आला दुसरा घास ॥ 2॥ थाली एक्या देठी घ्यावी जगजेठी। उरल्या उष्टावळी फळांच्या वनमाळी । शबरीभिल्लिणीचा घ्या हो चवथा घास ॥ 4॥
द्रौपदीमाईचा आला तिसरा घास ॥ 3॥
टाकू ओवाळून मुखचंद्रावरून गोविंदाग्रजाचा उरलासुरला घास ॥ 5॥
है, चला, झालं बरं आता ! झाली पुन्हा दांडगाईला सुरुवात? वन्स, सांभाळा बाई तुमच रत्न है! तुमची माणसंच भारी अचपळ नाही तर थांबा. हे बघा गीताबाई, बाळाला पाळण्यात नेऊन निजवा बरं! (गीता येते) हं, गीताबाईंना बघितल्याबरोबर लागला हसायला! गीताबाईंच्याबरोबर भटकायला सापडतंना इकडे तिकडे (गीता मुलाला घेऊन जाते.) चन्स, भाईला सकाळपासून दोन-तीन बोलावणी झाली. येतो येतो म्हणून म्हणतो, अजून का बर येईना? वन्स, मला आपल भलतंच स्वप्न पडायला लागल आहे.

शरद: वहिनी, तुम्ही उगीच काळजी करता, झाल! कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेल अन्नसुध्दा अंगी लागायचं नाही.

(राग भीमपलास, ताल- त्रिवट, चाल- रे बलमा बलमा )
छळिती या हृदया अदया भ्रांत मनोरचना कालगुणा ॥ ध्रु ॥ मातृजीवना झिजवुनि जगती अंती घेती तयासह त्या निधना ॥ 1॥

सिंधू : काही म्हणा, काही सांगा. माझ्या मनाचा आपला धीरच सुटल्यासारखा झाला आहे. भाईची तार मिळाल्या दिवसापासून उरात धडकी
बसून जिवाला काळजी लागली आहे (राग काफी जिल्हा, ताल- त्रिवट, चाल- इतना संदेश वा.)
दहती बहू मना नाना कुशंका ॥ ध्रु ॥ विपदा विकट घोर निकटी विलोकी।
मन कंप घेत गणिते ना विवेका॥ 1॥

शरद् : पण अशी काळजी लावून घ्यायला तसं काही झालं आहे का? नुसत्या तर्कानं तर्कच वाढवायचे का? सगळं जिथल्या तिथं आहे, मग उगीच का असे आडरान प्यायचं?

सिंधू : वन्स, आपदा चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून का येत असतात. बरं व्हायचं ते जपातपान होतं आणि वाईट मात्र झाल्यावर कळायला लागतं. फळपिकण्यापूर्वी पाडानं रंगून जात; पण पुस्तेपणी कुजल्याखेरीज त्याला कधी घाण सुटली आहे का? एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जिवाला अगदी कसा चरका बसतो!

(राग खमाज जिल्हा ताल पंजाबी चाल मे तोसे नाही बोलोरे शंकाही नाही काली ज्या दुर्गती जवे ये तदा ॥ भु.॥
धूर्त कपटी अरी जैसा रण
 करी तेवि विधा ही सदा ॥ 1॥

शरद् : मन चिंती ते वैरी चितीना, तशातलं चालल आहे तुमचा वहिनी है पाहा भाईसाहेब आलेचा (रामलाल येतो.) भाईसाहेब, या पाहा, वहिनी कशा एकसारख्या रडताहेत! त्यांना चार धीराच्या गोष्टी सांगून त्यांची समजूत करा पाहू

रामलाल : (स्वगत) काल रात्री पाहिलेला प्रकार सिंधूला आता कोणत्या तोंडाने सांगू? कितीही टाळाटाळ केली तरी हे मरण काही टळत नाही!

सिंधू : भाई, कळल नाही का तुला? काही भिण्यासारखं नाही ना? असा मुकाटयान का उभा आहेस? काय झाल? सांग लौकर मला!

रामलाल : ताई, अशी घाई करू नकोस. लहान मुल साखळीचा एक खेळ खेळतात. तो तू पाहिला आहेस ना? जसजसा खेळ वाढत जातो, तसतसा मुलाला मूल जोडून त्यांच्या साखळीला जलदीची चाल करता येत नाही तसंच या संसाराचंही आहे. संसार वाढू लागला म्हणजे अडचणींमागून अडचणी वाढून जबाबदारीमुळे मन जडावत जातं, आणि बालपणीचा चंचलपणा टाकून देऊन मनुष्याला प्रत्येक बाबतीत धिम्या पावलान चालावं लागतं. सिधू भाई, अस का बोलायला लागलास? माझ्या अदृष्टात काय काय लिहिल आहे. ते मला एकदम सांगून टाक...

रामलाल : सिंधूताई, उद्या काय होणार आहे हे आज कळलं तर संसार नीरस होईल. म्हणून विधात्यानं प्राणिमात्राच अदृष्ट डोळ्याला न दिसणाऱ्या कपाळपट्टीवर लिहून ठेवल आहे. सर्व विश्वाचा संहार ज्याला रुद्रशक्तीच्या जाणिवेन करायचा आहे, त्या माहेश्वराला मात्र आपल्या ललाटीचा लेख वाचता यावा, म्हणून कपाळावर असलेल्या तृतीय नेत्राचा लाभ झाला आहे. हा त्रिकालज्ञ तृतीय नेत्र आम्हा मर्त्य
जिवाच्या कपाळी नाही!

(राग खमाज ताल पंजाबी चाल- पिया तोरी ) गमे सारी। शुभदा प्रभूची मज योजना ।। ध्रु ।
हे मनुजा जाणुनि तयाला।
गरल या न दिले प्रभुने ज्ञाना ॥ 1॥

सिंधू : भाई, माझे प्राण आता कठाशी आले आहेत रे! काय ऐकायच असेल ते जितेपणी मला ऐकून तरी घेऊ दे !

(राग - जिल्हा पिलु ताल- कवाली चाल- कनैया खेले होरी) करि दया साग वेगे। खसा ही पदी लागे ।। ध्रु ।।
क्षण एक अती । विलंबी फुका जाता। दुर्बल हृदय हे भंगे।। 1।।

रामलाल : ताई, तुला काय सांगू? आपल्या सुधाकरला एक व्यसन- एक फारच भयंकर व्यसन- (स्वगत) निष्ठुर दैव, काय सांगायचं हे माझ्या कपाळी आणलंस? दारू हा अमंगल शब्द या मंगलदेवतेपुढं मी कोणत्या तोंडानं उच्चारू? व्यसनी चांडाळांनो, तुम्ही आपल्या जिवलग मित्रांना कसल्या संकटात पाडता, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, दारून भिजलेला हा वाग्बाण हिच्या हृदयावर रोखण्यापेक्षा एखाद्या विषारी बाणान हिचा एकदम हृदयभेद करण्याचं काम माझ्याकडे का दिल नाहीस? (उघड) सिंधू, सुधाकराला दारूचं व्यसन लागली!

सिंधू : देवा, काय ऐकल मी हे ?
(बेभान पडू लागते, शरद् व रामलाल तिला धरतात.)

रामलाल : ताई, सिंधूताई, सावध हो!

सिंधू : भाई, भाई-
(घाईघाईने भगीरथ प्रवेश करतो.)

भगीरथ : भाईसाहेब, अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करूनच कचेरीत गेला, वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागला व मुन्सफान त्याची सनद कायमची रद्द केली.

रामलाल : अनयांच्या परंपरेला आता तुम्ही तयार असलच पाहिजे ताई, सिंधुताई- (तळीराम सुधाकरला घेऊन येतो.)
मोडून टाक.

सुधाकर : काय रडारड आहे घरात? सनद गेली म्हणून कोण रडत आहे? नामर्द बायको आहे. तळीराम, एकेकाला लाथ मारून ही गर्दी (खाली बसतो.)

रामलाल : शरद्, तळीराम, सुधाकरला आत नेऊन निजवा

सुधाकर : सनद गेली तरी हरकत नाही, मी नामर्द नाही- हा रामलाल नामर्द आहे- सिंधु नामर्द आहे- सनद नामर्द आहे!
(ते त्याला घेऊन जातात.)

रामलाल : ताई, अभागी मुली! चल. तुझ रडण्याचेसुध्दा समाधान येथून नाहीस झालं (तिला जवळ घेऊन) बेटा, ही परमेश्वराची कृपा आहे. (तळीराम येतो.) तळीराम, असाच्या असा चालता हो. इतःपर या घरात पाऊल टाकशील तर खबरदारा सिंधुताई चल.

(राग-ललत, ताल- त्रिवट, चाल- पिया पिया)
गमसि खरी हतभागिनी । जीवनमंगलहेतु तव जरी स्वकरि लोटी तुज दुर्गतिदहनी || रोदन हेचि जगी हतभागा। विश्रातिसी चित्ताते जागा । तीसह पति करि तव हृद्भगा मंदभाग्य तू तुजसम भुवनी ॥

(जातात)

प्रवेश दुसरा

(स्थळ तळीरामाचे घर पात्रे तळीराम आणि गीता)

तळीराम : घरात असेल ते सामान पुढे आण! मंडळाची वर्गणी द्यायची आहे आज काय जे असेल ते आण.

गीता : आणायला आहे काय घरात कपाळ तुमचं? झाडून सारून घर स्वच्छ आरशासारख करून ठेवले आहे! साऱ्या घरात जिकडे तिकडे
पाहाल तिकडे तुमच्या रुपाची अवकळाच दिसेल.

तळीराम : खोट बोलते आहेस तू! दागदागिना काही काही नाही अगदी घरात!

गीता: अहो! नाही, नाही, नाही! आता काय कपाळ फोडून घेऊ तुमच्यापुढे!

तळीराम : पाहा, खोटे बोलू नकोस काही नाही तुझ्याजवळ?

गीता : हे एवढं कुकू कपाळावर तुमच्या नावाचं बाकी राहिलं आहे. (कुकु पुशीत) हे एकदाचं घ्या त्या कलालाच्या कपाळाला लावा, आणि घ्या शेवटचा घोट बायकोच्या आणखी संसाराच्या नावाना म्हणजे तुम्ही सुटलात आणि मी पण सुटले !

तळीराम : काय बायकोची जात आहे पाहा! गीते, माझी अमर्यादा होते आहे ही!

गीता : अहाहाहा! मर्यादा ठेवायला काय गुणांचे दिग्विजयी लागून गेलात! स्वतःच्या संसाराचं वाटोळ केलत, दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळ केलंत! घरात चुलखंड थंडावले आहे. तिथं माझी हाडं लावू की तुमची?

तळीराम : काय बेमुर्वत बाजारबसवी आहे! घेऊ का नरड दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? था, अशी पालथी पाडून तुलाही दारू पाजतो! चल, दारू तरी पी. नाहीतर घरातून चालती तरी हो! नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आडगि-हाइकाला फुकून टाकीन!

गीता : है! तोडाच्या गोष्टी असतील अगदी! वरूनच उतरले पाहिजेत तुमचे स्वतः खातेऱ्यात लोळता आहात ते थोड नाही का झाल?

तळीराम : जातेस का पितेस? दादासाहेबाच्या तिथ लावालावी करून मला त्याच्या घरी जायला बंदी करवलीस? चल, घे हा दारूचा घोट का घेऊ नरडीचा घोट ? (तिला धरतो. दोघांची झटापट होते. ती त्याला ढकलून देते.)

गीता : देवा, नकीरे नको या घरात राहणं आता! H

(जाते.)

तळीराम : बेहत्तर आहे गेलीस तर! तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन! आता पुन्हा घरात ये- जर उभी ठार केली नाही तर नावाचा तळीराम नव्हे.

(जातो. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(स्थळः रामलालचे घर पात्रे भगीरथ व शरद् )

भगीरथ : अगदी बरोबर आहे. हा लोकभ्रम निबंध, निबंधमालेतील एक अत्युत्कृष्ट म्हणून मानलेला निबंध आहे. ऐक पु... (स्वगत) वाचण्याच्या भरात मी काय वाचतो आहे आणि कोणापुढं वाचतो आहे, याच मला भानच नाही! शास्त्रीबुवांचे कळकळीचे आणि प्रामाणिक हृदयाचे विधवांच्या स्थितीबद्दलचे हे करुणोद्वार मी वेड्यासारखा या बालविधवेपुढं वाचीत सुटलो आहे (उघड) शरद्, भाईसाहेब परत येण्याची वेळ झाली. आज आपण फार वेळ वाचीत बसलो, नाही? पुरे करावं नाही, मला वाटतं आता?

शरद् : (किंचित हसून) बरं, राहू द्या आता इतकंच आज. भगीरथ : (स्वगत) हिन हसून आम्हा पुरुषवर्गाचा चांगलाच उपहास केला म्हणायचा! या चतुर आणखी प्रेमळ मुलीपुढे मनाचे डावपेच मुळी चालतच नाहीत. ( उघड) शरद्, तुझ्या हसण्याचा अर्थ मी समजलो माझ्या मनातले विचार तू बरोबर ओळखलेस शरद्, धर्मामुळे म्हण रूबीमुळे म्हण, पुरुषांच्या स्वार्थबुध्दीमुळे म्हण, पण तुम्हा विधवाची हिंदू समाजात मोठी विटबना चालली आहे, अस कोणत्याही प्रामाणिक मनुष्याला कबूल कराव लागेल.

शरद् : भगीरथ, संसारहानीच्या दुःखाबरोबरच या अपशकुनासारख्या गोष्टीच्या अपमानाचंही तीव्र दुःख आम्हाला भोगाव लागत-

मानभग दाही मृतशा हृदया ।। ध्रु ।।
(राग बागेसरी ताल- त्रिवट चाल - गोरा गोरा मुख.) दग्ध वल्लरी जाळी चंचला अदया ।। 1।। गतपतितांचे जीवन जगती वाया ॥ 2॥

भगीरथ : अगदी खरं आहे हे आम्ही पुरुष विधवांच्या बाबतीत अगदी विचारशून्य होऊन त्यांच्याबद्दलच्या वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होतो, आणि तू सांगितलेल्या दुहेरी दुःखात लोकनिंदेची आणखी भर घालतो. एखादी विधवा सदाचरणी आहे या अगदी सहज रीतीन शक्य असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना आम्हाला आमच्यावर मोठे संकट पडल्यासारख वाटत. एखाद्या बालविधवेन एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणाऱ्याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगाव, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे! आणि बालविधवानी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणान म्हणतील, की आप्तइष्टांची मुल खेळवीत बसल्यान विधवांना जे सात्त्वि समाधान होत, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असे जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजाऱ्याचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचे सोडून परक्याच्या पोटात चार घास कोबून आपल समाधान हे का करून घेत नाहीत?

(राग काफी ताल त्रिवट चाल मोरे नाटके प्रिया) सगुणा वधोनि हा! दंभ विजय मिरवी महा॥ धुः । मोहपाशमेदना ज्यासि अल्पही शक्ती ना विरतीसी भोगी स्तविती । तोचि काय विस्मय न हा ॥ 1॥
(स्थळ : रामलालचे घर पात्रे भगीरथ व शरद्)

भगीरथ : अगदी बरोबर आहे. हा लोकभ्रम निबंध, निबंधमालेतील एक अत्युत्कृष्ट म्हणून मानलेला निबंध आहे. ऐक पुढं (स्वगत) वाचण्याच्या भरात मी काय वाचतो आहे आणि कोणापुढं वाचतो आहे, याच मला भानच नाही। शास्त्रीबुवांचे कळकळीचे आणि प्रामाणिक हृदयाचे विधवांच्या स्थितीबद्दलचे हे करुणोद्वार मी वेड्यासारखा या बालविधवेपुढं वाचीत सुटलो आहे (उघड) शरद्, भाईसाहेब परत येण्याची वेळ झाली. आज आपण फार वेळ वाचीत बसलो नाही? पूरे कराव नाही, मला वाटत आता?

शरद् : (किंचित हसून) बर राहू द्या जाता इतकंच आज

भगीरथ : (स्वगत) हिन हसून आम्हा पुरुषवर्गाचा चांगलाच उपहास केला म्हणायचा! या चतुर आणखी प्रेमळ मुलीपुढं मनाचे डावपेच मुळी चालतच नाहीत. ( उघड) शरद्, तुझ्या हसण्याचा अर्थ मी समजलो. माझ्या मनातले विचार तू बरोबर ओळखलेस शरद्, धर्मामुळे म्हण रूढीमुळे म्हण, पुरुषांच्या स्वार्थबुध्दीमुळे म्हण, पण तुम्हा विधवाची हिंदू समाजात मोठी विटंबना चालली आहे. अस कोणत्याही प्रामाणिक मनुष्याला कबूल कराव लागेल.

शरद् : भगीरथ, संसारहानीच्या दुःखाबरोबरच या अपशकुनासारख्या गोष्टीच्या अपमानाचही तीव्र दुःख आम्हाला भोगाव लागत-

(राम- बागेसरी: ताल- त्रिवट चाल - गोरा गोरा मुख.)
मानभंग दाही मृतशा हृदया ।। ध्रु ।
दग्ध वल्लरी जाळी चंचला अदया ॥ 1॥ गतपतितांचे जीवन जगती वाया ॥ 2 ॥

भगीरथ : अगदी खर आहे हे. आम्ही पुरुष विधवांच्या बाबतीत अगदी विचारशून्य होऊन त्याच्याबद्दलच्या वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होतो, आणि तू सांगितलेल्या दुहेरी दुःखात लोकनिंदेची आणखी भर घालतो. एखादी विधवा सदाचरणी आहे या अगदी सहज रीतीन शक्य असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना आम्हाला आमच्यावर मोठे संकट पडल्यासारखं वाटतं. एखाद्या बालविधवेन एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणाऱ्याला असच वाटत की. ती पापाचाच मार्ग विचारीत आहे फार काय सांगाव, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे. इतक मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे! आणि बालविधवानी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं. तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुल खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्वि समाधान होत. त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असे जर असेल तर मी म्हणती, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजाऱ्यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?

(राग काफी ताल- त्रिवट चाल- मोरे नाटके प्रिया.) सगुणा वघोनि हा! दभ विजय मिरवी महा ॥ घुः ॥ मोहपाशमेदना ज्यासि अल्पही शक्ती ना। विरतीसी भोगी स्तविती तोचि काय विस्मय न हा ॥ 1॥

शरद् : जाऊ द्या- भगीरथ, आपल्या मनःक्षोभानं काय होणार? भगीरथ, आपला बरेच दिवसाचा परिचय आहे, म्हणून तुम्हाला मोकळ्या मनान विचारते, आणि तेसुध्दा अलीकडे दादाची स्थिती पाहून माझी आशा सुटत चालली आहे म्हणून विचारते- या मद्यपानाचा मोह सुटण शक्य असतं का?

भगीरथ : शरद्, या प्रश्नाचं अस्तिपक्षान उत्तर देण्यासाठी, स्वतः माझेच उदाहरण देताना माझ्या मागच्या वर्तनामुळे जो मनाला ओशाळेपणा वाटतो, त्यापेक्षा आत्मस्तुतीच्या कल्पनेचा ओशाळेपणा जास्त वाटतो..

शरद : तुम्हाला पुन्हा कधीही संकोच कशाला ठेवू? मद्यपानाची पुन्हा आठवणसुध्दा झाली नाही?

भगीरथ : अगदी चुकूनसुध्दा नाही! आणि होणार तरी केव्हा? हल्ली माझा काळ इतका सुखात जातो आहे. एकीकडे भाईसाहेबांच्या सदुपदेशाचा दिनप्रकाश आणि एकीकडे तुझ्या सहवासाची शीतल चंद्रिका-

शरद : शीतल चंद्रिका म्हणजे?
(भगीरथ खाली पाहतो.)

भगीरथ : बोलण्याच्या भरात मी एखादा शब्द-

शरद्: खर बोलण्याच्या प्रतिज्ञेवर शपथ घेऊन माझ्यापुढे तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाही आहात! मीसुध्दा सहज विचारलं, रागान नव्हे-

(रामलाल येतो.)

रामलाल : शरद् आताशा दोन-तीन दिवस सुधाकरने तुमच्या घरात मद्यपानाचा अड्डा घातला आहे, हे तू मला सांगितल नाहीस? आता गीता मला भेटली तिन मला हा प्रकार सांगितला. याबद्दल सुधाकरजवळ गोष्ट काढायला मी गेलो, पण माझ्या सांगण्याचा काहीएक परिणाम झाला नाही. भगीरथ, पद्माकराला आणि बाबासाहेबांना आताच्या आता एक तार कर की असाल तसे निघून या म्हणून त्यांच्या सांगण्याचा तरी सुधाकरावर काही परिणाम होऊन या भयंकर प्रकाराला आळा बसतो की काय, एवढीच आशा जाता उरली आहे. आणखी शरद याच पावली तू घरी जा आणि गीता तुमच्या घरी गेली आहे. तिला आपल्या घरी ठेवून घे! तळीरामान आपल्या घरातून तिला हाकलून दिली आहे. तुमच्या इथं तिला राहायच नसेल तर माझ्याकडे पाठवून दे। जा वर लवकर ती बिचारी गरीब उगीच विवचनेत पडली असेल.

शरद् : हो, ही मी निघालेच.

(जाते.)

भगीरथ : तार आताच करून येऊ का?

रामलाल : इतकी काही घाई नाही. आणखी थोडया वेळान केलीस तरी चालेल.

भगीरथ : मग भाईसाहेब, तितक्या वेळात कालचा विषय पुरा करून टाकानात? काल आपल बोलण मध्यतरीच थांबल, तेव्हापासून माझ्या मनाला सारखी उत्कंठा लागून राहिली आहे. लोककल्याणाचा मार्ग कोणता ते सांगितल नाहीत.

रामलाल : भगीरथ, लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविण्याइतक हिंदुस्थानच भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सुधारणा आहेत, एकीकडे सामाजिक सुधारणा आहेत. इकडे धर्म आहे. इकडे उद्योग आहे. इकडे शिक्षण आहे. इकडे स्त्रियाचा प्रश्न आहे. इकडे अस्पृश्यांची बाबत आहे, तर तिकडे जातिभेदाचा गोधळ आहे. अशा या चमत्कारिक प्रसंगी अमूक एकच मार्ग इतरांच्यापेक्षा चांगला आहे, असे सांगण मोठं धाडसाच आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाण या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निरनिराळे झालेले आहेत. हजारो वर्षांच्या ओझ्याखाली तेहतीस कोटी जिवांच्या जडपणानं खालावत चाललेल्या आमच्या भरतभूमीला उचलून धरण्यासाठी जितक्या भिन्नभिन्न प्रकृतीच्या मूर्ती आम्हाला लाभतील तितक्या हव्याच आहेत. लोकहितात पडू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला कायावाचामनसा आधी हा घडा हस्तगत नाही अगदी जिवाशी नेऊन भिडविला पाहिजे. आपल्याहून भिन्न रीतीन लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविण, दुसऱ्याच्या प्रयत्नाबद्दल अनादर दाखविण, देशहिताच्या बुध्दीतच स्पर्धा वाढवून एकमेकाना खाली पाडणं, या कारणांमुळे आज आमची जितकी अवनती होत आहे, तितकी दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे होत नसेल, भगीरथ, मी लोकोत्तरबुध्दीचा एखादा महात्मा नाही; पण शक्य तितक्या शांतपणान आणि समतोल मनान सरळ गोष्टी पाहात असल्यामुळे माझे विचार असे होऊ लागले आहेत. राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गाने जाताना विधवांच्या दुबळ्या हृदयाच्या पायघडया तुडवीत जायला मागपुढे पाहात नाहीत, केवळ सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते विधवाच्या कपाळी कुंकु लावण्यातच इतके रंगून गेलेले आहेत की, आपल्या भारतमातेच्या वैधव्याचा त्यांना विचारच करता येत नाही! आर्यधर्माचा भलता अभिमान धरणारे, आर्यधर्माची विजयपताका अधिकाधिक उंच दिसावी म्हणून धर्माभिमानाच्या भरात तिच्या उभारणीसाठी सहा कोटी माहारामांगांच्या हाडांच्या सांगाडयाची योजना करीत आहेत. नामशुद्रांचे आणि अतिशुद्रांचे वाली म्हणविणारे त्या वर्गाला उच्चपदी नेण्याऐवजी बिचाऱ्या ब्राह्मणवर्गाला रसातळी गाडण्याचा अधम प्रयत्न करीत आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मत, आणखी मत तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार आणि बेजबाबदार लोकाना सर्वांनाच चारा वाटा मोकळ्या होऊन बसल्या आहेत. "त्रिसप्तकोटिकठकृतनिनादकराले जननि" इतक्या हाका आरोळ्याच्या कल्लोळात तुझ्या नेमक्या हिताचा संदेश आम्हा पामर बाळाना कसा ऐकू जाणार? भगीरथ, व्यापक लोकशिक्षण, सार्वजनिक लोकशिक्षण हा तरी सध्या असा एक मार्ग दिसतो आहे की, जो एकटाच आम्हाला आत्यंतिक हिताला नेऊन पोहोचविणारा नसला, तरी इतर सर्व मागाँवर आपला प्रकाश पाडणारा आहे खास भगीरथ आर्यवर्ताच्या उदयोन्मुख भाग्याचा अचूक मार्ग सांगणाऱ्या मंत्रद्रष्टा महात्मा अजून अवतरावयाचा आहे. मनुष्यस्वभावाला शोभणाऱ्या आतुर आशेन त्याच्या आगमनाची वाट पाहात बसणं हेच आज तुझ्या माझ्यासारख्या पतिताच कर्तव्य आहे. सर्वच मार्ग स्वच्छ करून ठेवले म्हणजे त्या महात्म्याचा यांपैकी वाटेल त्या मार्गाने होणारा प्रवास तितका तरी सुखकर होईल भगीरथ, आज आपल्याला खासगी काम बरीच पडली आहेत. आणखी ती जरुरीची आहेत. पुढं केव्हा तरी या सार्वजनिक शिक्षणाचा माझ्या दृष्टीने जी व्यापकतम प्रयत्न वाटतो तो तुला यथाशक्त्या सांगेन चल भगीरथ, सध्या आपले दुर्दैव सुधाकराच्या व्यसनाशी सलग्न झाल आहे. मी लिहून देतो तेवढी तार पद्माकराला पाठीव चल लवकर!

प्रवेश चवथा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद् )

तळीराम : अस आम्ही बोलू नये; पण दादासाहेब, जाता बोलायची वेळ आली! अहो, या घरात तुमची काय किंमत जाहे? तुम्ही कोण आहात? अहो दादासाहेब

सुधाकर : नळीराम, तू मला अजून दादासाहेब म्हणतोस? दोस्त, मी तुझा साहेब का? अशा परकेपणान मला का हाका मारतोस? मला

सुधाकर : म्हण- दादासाहेब म्हणू नकोस सुधा म्हण

तळीराम : दादासाहेब, तुम्हाला सुधा म्हणणारी माणस निराळी आहेत आम्ही काय दरिद्री माणस फार झाल तर तुमच्या जिवाला जीव देऊ एवढंच! आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणावं? तुमची लायकी आम्हाला कळते तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत.

सुधाकर : कोण आहेत ते थोर लोक? मला सुधा म्हणणारा कोण आहे? माझ्या घरात मला अरेतुरे? प्रत्यक्ष माझ्या घरात?

तळीराम : तुमचं घर? दादासाहेब हे घर तुमचं नाही. हे घर रामलालच आहे!

सुधाकर : रामलालची काय किंमत आहे?

तळीराम : किंमत आहे. म्हणून तर त्याने मला घरात यायची बंदी केली आम्ही तुमचे जिवलग दोस्त- आम्हाला घरात यायची बंदी!
रामलालन बंदी केली मला!

सुधाकर : मी रामलालला बंदी करतो. घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगतो. घर माझं आहे!

तळीराम : तुमचं ऐकतो कोण? बाईसाहेब त्यांना अनुकूल, शरदिनीबाई त्यांना अनुकूल! सगळ्यांनी संगनमत करून आज पद्माकराला तार केली आहे. तो येऊन तुमचा बंदोबस्त करणार! आता आम्हाला धक्का मारून घराबाहेर घालविणार

सुधाकर: सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद सिंधू एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर! तळीराम ते लोक बरे जातील बाहेर? पद्माकर तर आता खर्च चालवितो तुमचा! तो कसा जाईल? घर त्याचं आहे. पैसा त्याचा आणि घरही त्याची

सुधाकर : मला कुणाची कवडी नको आहे मी लाथ मारीन तिथं पाणी काढीना मला कुणाचा पैसा नको आहे! मला थोडीशी दारू पाहिजे !
आण थोडीशी!

तळीराम : या घरात तुम्हाला घेताना पाहिले तर बाईसाहेब काय म्हणतील मला?

सुधाकर : काठ पेला! सिंधूच्या, शरद्च्या देखत भरून दे! कुणी एक अक्षर बोललं तर पाहतो! सिंधू, शरद्, सिंधु, चलाव! सगळे इकडे या चलावा सिंधू, शरद् ! तळीराम, भर पेला! (सिंधू व शरद येतात; तळीराम पेला भरू लागतो.)

सिधू : तळीराम, तळीराम, काय करता है?

सुधाकर : एक अक्षर बोलू नकोस! मुकाटयान दोघी उभ्या राहा आणखी पाहा! तळीराम, आण इकडे तो पेला!

शरद : तळीराम, तू अगदी नरपशू आहेस! दोन्ही डोळयाची भीडमुखत, लाजलज्जा काहीतरी आहे का तुला?

(राग सोहनी: ताल- त्रिवट चाल- काहे अब तुम)
दुष्टपति सर्पा सदर्पा, कालकूटा वमसि भुवनासि अखिलाही तये जाळितोसि ॥ध्रु.॥ पितृमातृरुचिरी तृषित गमसि अति । कृतान्तासि भय निकट बघुनि तुजसि ॥ 1॥ तळीराम दादासाहेब तुमच्या बायका आम्हाला शिव्या देतात ऐका! (पितो.) +

सुधाकर : सिंधू, शरद्, लाथ मारीन एकेकीला!

(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद् )

तळीराम : अस आम्ही बोलू नये; पण दादासाहेब, आता बोलायची वेळ आली! अहो, या घरात तुमची काय किंमत आहे? तुम्ही कोण आहात? अहो दादासाहेब-

सुधाकर : तळीराम, तू मला अजून दादासाहेब म्हणतोस? दोस्त, मी तुझा साहेब का? अशा परकेपणानं मला का हाका मारतोस? मला सुधाकर म्हण- दादासाहेब म्हणू नकोस सुधा म्हण

तळीराम : दादासाहेब, तुम्हाला सुधा म्हणणारी माणसं निराळी आहेत. आम्ही काय दरिद्री माणस! फार झालं तर तुमच्या जिवाला जीव देऊ एवढंच! आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणावं? तुमची लायकी आम्हाला कळते तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत.

सुधाकर : कोण आहेत ते थोर लोक? मला सुधा म्हणणारा कोण आहे? माझ्या घरात मला अरेतुरे? प्रत्यक्ष माझ्या घरात?

तळीराम : तुमचं घर दादासाहेब हे घर तुमच नाही. हे घर रामलालच आहे।।

सुधाकर : रामलालची काय किंमत आहे?

तळीराम : किंमत आहे, म्हणून तर त्याने मला घरात यायची बंदी केली. आम्ही तुमचे जिवलग दोस्त- आम्हाला घरात यायची बंदी! रामलालन बंदी केली मला!

सुधाकर : मी रामलालला बंदी करतो. घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगतो. घर माझ आहे!

तळीराम : तुमचं ऐकतो कोण? बाईसाहेब त्यांना अनुकूल, शरदिनीबाई त्यांना अनुकूल! सगळ्यांनी संगनमत करून आज पद्माकराला तार केली आहे. तो येऊन तुमचा बंदोबस्त करणारा आता आम्हाला धक्का मारून घराबाहेर घालविणार!

सुधाकर: सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद्, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!

तळीराम : ते लोक बरे जातील बाहेर? पद्माकर तर आता खर्च चालवितो तुमचा! तो कसा जाईल? घर त्याचं आहे. पैसा त्याचा आणि घरही त्याची

सुधाकर : मला कुणाची कवडी नको आहे! मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन! मला कुणाचा पैसा नको आहे! मला थोडीशी दारू पाहिजे ! आण थोडीशी!

तळीराम : या घरात तुम्हाला घेताना पाहिलं तर बाईसाहेब काय म्हणतील मला? सुधाकर : काढ पेला! सिंधूच्या, शरदच्या देखत भरून दे! कुणी एक अक्षर बोललं तर पाहतो! सिंधु, शरद्, सिंधू, चलावा सगळे इकडे या चलावा सिंधू, शरद तळीराम, भर पेला!

(सिंधू व शरद येतात तळीराम पेला भरू लागतो.)

सिंधू : तळीराम, तळीराम, काय करता है?

सुधाकर : एक अक्षर बोलू नकोस! मुकाटयान दोघी उभ्या राहा आणखी पाहा! तळीराम, आण इकडे तो पेला!

शरद : तळीराम, तू अगदी नरपशू आहेस! दोन्ही डोळयांची भीडमुक्त, लाजलज्जा काहीतरी आहे का तुला?

(राग सोहनी ताल- त्रिवट चाल- काहे अब तुम )
दुष्टपति सर्पा सदर्पा, कालकूटा वमसि भुवनासि अखिलाही तये जाळितोसि ॥ घ्रः ।।
पितृमातृरुधिरी तृषित गमसि अति । कृतान्तासि भय निकट बघुनि तुजसि ॥ 1 ॥

तळीराम : दादासाहेब, तुमच्या बायका आम्हाला शिव्या देतात; ऐका! (पितो.)

सुधाकर : सिंधु, शरद्, लाथ मारीन एकेकीला!

तळीराम : माझ्या बायकोच्या गळ्यातलं मी मंगळसूत्रसुध्दा तोडला पण दादासाहेब, तुमच्या बायकांनी आम्हाला खेटर दिली, शिव्या दिल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द मी!

सुधाकर : सिंधूच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडा ऊठ तळीराम माझी तुला शपथ आहे! तू माझा दोस्त आहेस! जिवाचा कलिजा आहेस! माझा भाऊ आहेस! बाप आहेस! माझा देव आहेस! ऊठ, सिधुच्या गळ्यातले मंगळसूत्र तोड! शरदच्या गळ्यातल असेल ते तोड! ऊठ, मंगळसूत्र तोड आणि मग माझ जानवही तोड!

(तळीराम उठतो आणि सिंधू व शरद यांच्याजवळ येऊन मंगळसूत्र ओढू लागतो)

शरद :दादा दादा, काय हा अविचार? अरे हे तू-

सिंधू : देवा, भाई-

सुधाकर : हं, खबरदार, हलू नका जागच्या नाहीतर मान कापीन! भाईचं नाव घ्यायचं नाही! हलू नका- तळीराम बघतोस मंगळसूत्र
काय? तोड

(तळीराम मंगळसूत्राला हात घालतो, तोच रामलाल, पद्माकर व बाबासाहेब येतात. पद्माकर तळीरामला लाथेने उडवितो. तळीराम रडू लागतो व पिऊ लागतो.)

तळीराम : दादासाहेब, आम्हाला लाथ मारली! पद्माकरान लाथ मारली! रामलाल आहे! आम्ही पीत बसतो!

पद्माकर : बेशरम, निर्लज्ज जनावरा, तुला उभा चिरून टाकतो!

रामलाल : सिंधूताई, हा तळीराम कसा आला घरात?

सुधाकर : तू कसा आलास घरात? चल, माझ्या घरातून चालता हो! पद्माकर, तू पण चालता हो! त्या थेरड्याला एक लाथ मारा चले जाव! तळीराम, लगाव लाथ एकेकाला पाजी लोक!

पद्माकर : दादासाहेब, आपण हे माडल आहे तरी काय?

सुधाकर : चल जाव! पद्माकर, रामलाल, आधी तू नीघा सिंधूशी संगनमत करतो माझ्या घरात?

तळीराम : तुमची सनद गेली त्या वेळी यानं बाईसाहेबांना मिठी मारली!

पद्माकर: हरामखोर! जिव्हा छाटून टाकीन एक अक्षर बोललास तर!

तळीराम : दादासाहेब म्हणून यान मला परत घरात यायची बंदी केली?

सुधाकर : रामलाल, माझ्यासमोर उभा राहू नकोस! पद्माकर आधी घरातून बाहेर निघ! ए थेरडया चलाव

पद्माकर : छे छे. हा तर बेताल अनर्थ आहे भाई, चल, इथं उभं राहण्यात अर्थ नाही! सिंधूताई, चल, याउप्पर तू या घरात राहणं योग्य नाही.
हा शुध्द नरकवास आहे! तळीराम दादासाहेब, पैसा बोलतो आहे हा!

सुधाकर : चल जाव, सिंधू, तू पण चालती हो! शरद्, तू पण जा! मला कोणाची जरूर नाही !

पद्माकर : ठीक आहे. ऊठ सिंधू, या घरात पाणी प्यायलासुध्दा राहू नकोस! चल-

सिंधू : दादा, या घरातून कुठे जाऊ म्हणतोस?

पद्माकर : कुठेही! या नरकाबाहेर अगदी कुठेही

सिंधू : हा नरक? हे पाय जिथं आहेत तिथं नरक? दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग,
तिथंच माझ वैकुठ, आणि तिथंच माझा कैलास!
(राग पहाडी- गज्जल ताल घुमाळी, चाल- दिल बेकरार तुने.)
कशी या त्यजू पदाला मम सुभगशुभपदाला । वसे पादयुग जिथे है मम स्वर्ग तेथ राहे ॥
स्वलोकी चरण हे नसती तरी मजसी निरयवस्ती ती ॥ नरकही घोर सहकान्ता हो स्वर्ग मला आता ॥ 1॥
या पावलाविरहित मात्र मला देवादारीसुध्दा नरकवास घडेल! तुमच्या चौदाचौकडयाच्या राज्यात राहून रौरवाची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस कंठीत मी या पायाजवळ अशी अष्टौप्रहर बसून राहीन.

(सुधाकराच्या पायावर मस्तक ठेवते; तो तिला लाथ मारतो.)

सुधाकर : अशी लाथ मारून तुला झुगारून देईना

पद्माकर : पाहा, ताई, पाहा अजून तरी या पायांचा मोह सोड!

सिंधू : दादा, मोह का सोडू? हेच पाय माझ्या कपाळी आहेत. अरे, देवान पाठ पुरविली तर ज्या पायाच्या आश्रयाने उभं राहायचं, त्या पायांनी झुगारून दिलं तर कुठं जायचं? (सुधाकराला) का मला दूर लोटण झाल? वैकुंठेश्वरा माझ्या कपाळीच्या कुंकवासाठी या पायधुळीत मला राहायला नको का? आपल्या पायापासून देवाच्या दैवतापासून या दीन दासीला दूर लोटू नका!

(राग पहाडी जिल्हा ताल- केरवा चाल मान नाही सैय्या.) लोटू नका कान्ता अशी दूर कान्ता
केवि जगे दीना मीना जललवरहिता ।। ध्रु ।।
हेचि चरण माझे जीवन जगती।
मृतचि गणा मज हे दूरी होता ।। 1 ।।

सुधाकर : सिंधू, तुला इथं राहायचं असेल तर या हरामखोराचं नावसुध्दा घेऊ नकोस! या चोरांच्या घरातला एक पैसादेखील माझ्या घरात आणायचा नाही. असे असेल तर या घरात राहा!

तळीराम : शाबास, दादासाहेब! अशी शपथ घ्यायला लावा आणि मग या घरात राहायला परवानगी द्या! शपथ घ्यायला लावा!

सुधाकर : सिंधू, कबूल आहे तुला हे? नुसत्या तुझ्या गंगायमुना मला नकोत!

तळीराम : नुसते कबूल नाही! दादासाहेब वाहत्या गंगेत हात धुवून घ्या! शपथ घ्यायला लावा- हॅम्लेटच्या बापासारखा तुम्हाला इशारा देतो आहे! बाईसाहेब, शपथ घ्या!

सुधाकर : (मोठ्याने ओरडून) त्रस्त समधा, शीत राहा' सिंधू, आत्ताच्या आता शपथ घे, नाही तर घरातून चालती हो! कोणाचा पैसा, कोणाचे काही काही घरात आणायचं नाही!

सिंधू : आपल्या पायावर हात ठेवून सांगते, आजन्म हाल सोशीन, काबाडकष्ट करीन, पण दुसऱ्याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही! आपल्या दोघांच्या कष्टाविरहित सगळया जगातील धनदौलत आजपासून मला शिवनिर्माल्य आहे!
(राग काफी जिल्हा ताल- कवाली. चताल- कल्ल मुझे कर.) सत्य वदे वचनाला नाथा । स्मरुनि पदाला या सुरविमला ॥ . ॥ वित्त पराजित मानि विषसम स्पर्शिन ना कधी मी त्याला ॥ 1॥ बाबासाहेब सिंधु, काय भलतीच शपथ घेतलीस ही?

पद्माकर : ताई, तु शुध्दीवर तरी आहेस का? या रौरवात राबून, अन्नाला मोताद होऊन, याच्या शिव्याशापात जळून उभ्या आयुष्याची राखरांगोळी का करायची आहे तुला?

सिंधू : राखरांगोळी काय म्हणून? माझ्या देवासाठी जळून गेले तर माझी राखरांगोळी होईल? देवाकारणी मातीची लका जळाली. तिचसुध्दा सोन झाल! मग भी तर माणसासारखी माणूस आहे! दादा, बाबा, तुम्हाला वेड तर लागली नाहीत? सुखाच्या संसारातसुध्दा चार दिवस माहेरी राहायचं आम्हा बायकांच्या जिवावर येत आणि तुम्ही मला आता घर सोडायला सांगता? इकडची अशी अवस्था झालेली, घरात हा प्रकार आता तर डोळ्यात तेलवात घालून मला बसायला पाहिजे! मला काही वेडवाकडं झालं असतं, तर इकडून मला टाकणं झाल असत का? माझ्याकरता आकाशपाताळ एक करायचं झालं नसतं का? मग मला इकडच्या जिवासाठी पडतील ते काबाडकष्ट उपसायला नकोत का? आमच्या गरिबीसाठी मोलमजुरी करायला नको का?

पद्माकरता : काबाडकष्ट उपसायचे आणि तेसुध्दा या महारवाडयात राहून?

बाबासाहेब : सिंधु, ज्या ठिकाणी तुला पोटापाण्याची पंचाईत पडावी, तिथे टाकून-

पद्माकर : ताई, तुला झालं तरी काय? तू काबाडकष्ट करणार? कुबेराला कर्ज देण्याइतका घनंतर हा तुझा बाप, कोसळत्या आकाशाला थोपवून धरणारा मी तुझा डोंगराएवढा भाऊ आणि तू एखाद्या दिवाण्या दास्वाजासाठी-

सिंधू : हा दादा, या घरात, या पायासमोर माझ्यासमोर अस अमंगल मी तुला बोलू देणार नाही! पतिव्रतेच्या कानाची ही अमर्यादा आहे! जा-बाप, भाऊ, माझं या जगात कोणी नाही? पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते. भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते! देवाब्राह्मणांनी दिलेल्या नक्याची ती बायको असते! बाबा, ज्या दिवशी माझ लग्न झाल त्याच दिवशी तुमची मुलगी तुमच्या घराला मेली आणि नव्या नावाने मी या घरात जन्माला आले. मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटतो; पण मुलीच लग्न म्हणजे तिची उत्तरक्रिया हे त्या बापडयांच्या ध्यानीमनीसुध्दा येत नाही बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्ही जे उदक सोडलंत, त्यानेच माझ्या
माहेरच्या नावाला तिलांजली दिलीत!

सुधाकर : सिंधु, हे हरामखोर इथं कशाला उभे राहिले आहेत? तुला राहायचं असेल तर या सगळ्यांना हाकलून दे!

सिंधू : दादा, बाबा, भाई, ऐकलत ना हे? माझ्याबद्दलची माया ममता सोडून आल्या पावली आता बाहेर चला! वन्सं, हात जोडून, पदर पसरून तुमच्याजवळ मात्र एवढं मागणं आहे की, तुम्ही मात्र आता या घरात राहू नका नाही म्हणू नका- माझ्या गळयाची शपथ आहे. तुम्हाला! तुम्हाला इकडल्याप्रमाणेच आपला भाई आहे! घरात असा प्रकार सुरू झाल्यावर तुमच्यासारख्यांना अनून दिवस निभावून नेण मोठ कठीण आहे!

शरद : वहिनी, माझ्या अब्रूच बोलतेस आणि तुझ्या अब्रूच मात्र

सिंधू : या पायांच्या छायेत असले, म्हणजे माझ्या अबूला कळिकाळाचीसुध्दा भीती नाही..

सुधाकर : सिंधू, अजून खोटी शपथ घेतलीस तू. :

सिधू : आता जर कुणी इथ थाबाल तर माझ्या गळ्याची शपथ आहे! पंचप्राणाच्या परमेश्वरा, मी खोटी शपथ घेतली नाही. सिंधूचा सगळ्या जगाशी संबंध सुटला! आपल्या दोघांच्या कष्टाविरहितची एक कपर्दिकादेखील घरात आणीन तर आपल्या पायाचीच शपथ आहे-

(राग - पिलु ताल- केरवा, चाल- डगमग हाले)
सकल जगाचा संसृतीचा पाश तोडी झणि।। ध्रु ।। पदि या सारा वसत पसारा त्रिभूवना संसाराचा मम साचा॥ 1॥
(त्याच्या पायावर डोके ठेवते.)

सुधाकर : तळीराम भर आता पेला राजरोस आणि दे मला!

तळीराम : आता कुठे आहे शिल्लक ? (ओतून) हा एवढा एकच प्याला!

सुधाकर : किती का असेना? पण सिंधूच्या देखत घेणार! बस्स झाला तेवढा एकच प्याला (पेला पिऊ लागतो. पडदा पडतो.)





Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा