एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशाचा म्हणून उपद्रच नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आखाडाचा महिना आला. झिमझिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गायीगुरांना चारा झाला; दूधदुभत्याची चंगळ झाली. शेतातील कामे संपली; सासुरवाशिणी माहेरपणाला माहेरी आल्या. आईबापांना आनंद झाला. माझी नव्या नवसाची, भरल्या चुड्याची बाबी आली, तिला कोठे ठेवू असे झाले. रोज नवी नवी पकान्ने होऊ लागली. नगरात आनंदीआनंद होता. खाण्यापिण्यात ताळतंत्र राहिले नाही.
इकडे काय झाले? मरीआई देवीने हे सारे पाहिले. तिने मनात विचार केला, राजाच्या राज्यात जावे. लगबगा उठली. तिने कुंकवाचा मळवट भरला, केस मोकळे सोडले नि अनवाणी चालत निघाली. नगराच्या वेशीपाशी आली आणि तिने आत डोकावून पाहिले. तिला मोठा आनंद झाला. नगरात ती शिरली. तिचे रूप कसे होते ? गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, तोंड पांढरे फटफटीत व हाडांचा सांगाडा, फाटकेतुटके वस्त्र नेसलेली अशी ती होती.
मरीआई रस्तोरस्ती फिरू लागली. प्रत्येक घरात डोकावून पाही. घाण दिसली, की शिरली तेथे. मरीआईची कृपा पुष्कळांवर होऊ लागली. लोक पटापट मरू लागले. मोठा कहर गुदरला. रोज पाचपन्नास माणसे मरू लागली. वार्ता राजाच्या कानी गेली. राजाला फार वाईट वाटले; माझी प्रजा कोण का मारते ? मी कधी कुणाचे वाईट केले नाही. देवाच्या सेवेत अंतर केले नाही; गोरगरिबांना नाडले नाही; कर वाटेल तसे घेतले नाहीत. मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का ? राजा दु:खी झाला, त्याला खाणेपिणे रुचेना, सुखविलास सुचेना. अनन्य भावाने देवाला शरण गेला व म्हणाला, “देवा नारायणा, शेषशायी भगवाना, चुकले-माकले क्षमा कर. माझी प्रजा सुखी कर. "
राजाच्या स्वप्नात देवाने दृष्टान्त दिला. “राजा, राजा, ऊठ, अरे, निजतोस काय ? तुझ्या नगरात मरीआईचा फेरा आला ना? तिला नगराच्या बाहेर घालव, ती उद्या तुझ्या राजवाड्याकडे येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी ठेव. ?"
राजा उठला. मरीआईच्या स्वागताची त्याने तयारी केली. सर्व राजवाडा झाडूनझुडून स्वच्छ केला होता; कण्या रांगोळ्या घातल्या होत्या; धूपदीप लावले होते; चंदनाचे सडे घातले होते. घाणीचे कोठे नाव नव्हते. उंची उंची आसने मांडून राजा मरीआईची वाट पाहात बसला.
मरीआई त्या दिवशी लवकर उठली व राजवाड्याकडे जाऊ लागली. परंतु राजवाड्यातील स्वच्छता पाहून ती दुःखीकष्टी झाली. राजाने मोठ्या मानाने तिला सिंहासनावर बसविले. राजा म्हणाला, “आई, आपण दुःखीकष्टी का ? सेवेत काय न्यून आहे ? ” मरीआई म्हणाली, “काय सांगू? राजा, मला तुझ्या राज्यात फारसे खायला मिळाले नाही." राजा म्हणाला, “आई, इतकी प्रजा बळी पडली तरी तू सुखी नाहीस ?” मरीआई म्हणाली, “राजा, माझी भूक तुला माहीत नाही. मी जाते तेथे गावची पांढर [ स्मशानातील राख] मात्र शिल्लक ठेवते. तुझ्या नगरात मला पोटभर खायले मिळाले नाही. मी उपाशी आहे.?"
राजाने विचाले, “आई, माझे राज्य तुला आवडले नाही का ?" "नाही रे, तितकेसे काही आवडले नाही. तुझे लोक फार स्वच्छतेने वागतात. घर स्वच्छ दिसले की माझे कपाळ उठते. त्या घरात मी शिरत नाही. या नगरात शिरले नि काय पाहिले ? लेकीसुना घरी आलेल्या, घरेदारे स्वच्छ केलेली, रंगरंगोटी दिलेली; खाणेपिणे बेताने चालले होते. शिळेपाके कोणी खाईना. पाणी गाळीत व तापवून पीत. अशी घरी शिरावेसे मला वाटेना !” राजा बोलला, “ मग, मरीआई, माझी इतकी माणसे कशी मेली ?" मरीआई म्हणाली, “राजा, थोडी घरे माझ्या आवडीची सापडली, त्या घरांत मी गेले. दारातच उकिरडे होते. तेथे घाणीची रास साचलेली, माश्यांचे घोंघावणे चाललेच आहे. राजा, ह्या जागा मला फार आवडल्या. काही लोकांनी खाण्यात धरबंध ठेवला नव्हता. कृपा केली. " वाटेल तेव्हा, वाटेल तितके हवेतसे खात होते. त्यांच्यावर मी
राजा बोलला, “मरीआई, तुझी कृपा आणखी कोणावर होते? " मरीआई म्हणाली, “तरणीताठी मुले मला फार आवडतात. म्हातारीकोतारी, अशक्त दुबळी मला आवडत नाहीत. नियमित वागणारी व स्वच्छतेची भोक्ती माणसे, त्यांना भेटावयास मी मेल्ये तरी जाणार नाही. राजा, स्वच्छता मला आवडत नाही, लिंबाचा वास खपत नाही; जेवताना कोणी लिंबे खात असेल तर मी तेथून पळ काढते."
राजाने मनात विचार केला- मरीआईला स्वच्छता का आवडत नाही? ठीक आहे. राजाने नगरात दवंडी पिटविली, “घरेदारे स्वच्छ टेवाः दारात उकिरडे करू नका; शिळेपाके खाऊ नका; माश्या अन्नावर बसू देऊ नका; पाणी गाळून तापवून घ्या; जेवताना लिंबाचा सढळ हाताने उपयोग करा." दवंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले. मरीआई संतापली. रागाने खवळली, जशी नागीण. ती राजाकडे गेली व म्हणाली, “राजा, मोठा रे कपटी आहेस तू.; मला भुकेने मारतोस. मी तुझ्यावर कोपले आहे. तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही. "
राजाला आनंद झाला. लोक सुखी झाले. तुम्ही आम्ही पण सुखी होऊ या. अशी ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.