कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.
देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. देव होय, दगडापेक्षा, खडकापेक्षा कठीण अशी वस्तू आहे. लोखंड हे खडकापेक्षा बलवान आहे. कारण लोखंडी घण खडकास फोडू शकतो.
देवदूत लोखंडाहून प्रबळ अशी कोणती वस्तू आहे ? देव लोखंडाहून अग्री प्रबळ आहे; कारण अग्री लोखंडाचा रस करू शकतो,
देवदूत: अग्निपेक्षा प्रबळ काय आहे ?
देव : पाणी हे अग्निहून प्रबळ आहे. कारण पाणी आग विझवू शकते
देवदूत: पाण्याहून प्रबळ कोण ?
देव पाण्याहून प्रबळ बारा आहे. पाण्यास वारा हलवू शकतो.
देवदूत वायूहून प्रबळ काय आहे?
देव : पर्वत वायूस अडवू शकतात, म्हणून पर्वत हे वायूपेक्षा प्रबळ आहेत. देवदूत: प्रत्येक वस्तू हून दुसरे काही तरी प्रबळ आहेच. सर्वांत प्रबळ असे काय आहे ?
देव : उजवा हात काय देत आहे हे डाव्या हातासही माहीत नाही. अशा 'रीतीने परोपकार करणारे, दान करणारे सदय अंतःकरण हे सर्वांत श्रेष्ठ गुप्त होय.
चतुर राजा
सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात बसला होता. मोठमोठे अमीर, उमराव, सरदार आपापल्या ठिकाणी बसले होते. इतक्यात दरबारात एक स्त्री आली. तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. सालोमनने विचारले, "बाई, आपले काय काम आहे ? आपणास कोणी दुष्टाने त्रास दिला आहे का ? बोला, परंतु तुमच्या चर्चेवरून तर तसे काही दिसत नाही. मग आपण का आल्या आहात ?” ती स्त्री म्हणाली, “राजा, तुझ्या चातुर्याची कीर्ती ऐकून त्या चातुर्याची परीक्षा घेण्यासाठी मी आले आहे. हे पाहा, माझ्या हातात दोन हार आहेत. या दोन हारांपैकी कृत्रिम फुलांचा हार कोणता व खऱ्या फुलांचा कोणता हे आपण दूरूनच सांगा, जर आपण ओळखले तर आपण माझ्या परीक्षेस उतरला असे मी समजेन."
ती सभा तटस्थ राहिली. राजास वामाने ओळखता आले असते. परंतु ती वाई दूर बसली होती. आपल्या राजाची एक बाई फजिती करून जाणार की काय असे सभासदांस वाटू लागले. राजा विचारात पडला. इतक्यात त्याला उत्कृष्ट युक्ती सुचली. ज्या खिडकीजवळ ती बाई बसली होती त्या खिडकीबाहेर मधमाश्या घोंघावत होत्या, राजाने आपल्या नोक -रास ती खिडकी सताड उघडण्यास सांगितले. खिडकी उघडताच काही मधमाश्या आत आल्या व नेमक्या एकदम खऱ्या फुलांच्या हारावर बसल्या. झाले. ती बाई सर्व उमजली. ती राजास म्हणाली, “ आपला शहाण पणाचा लौकिक एकंदरीत खरा आहे. "
मुलांनो, मधमाशी क्षुद्र प्राणी, परंतु तीसही कृत्रिमता आवडत नाही; खरी वस्त त्या प्राण्यास आवडते. तुम्ही पण ढोंगीपणास भुळू नका, खऱ्या कामाची पारख करून ते आपलेसे करीत जा.