shabd-logo

एकवीस

20 June 2023

2 पाहिले 2
प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान वादळात बुडणार? अशी धास्ती वाटू लागली होती. प्रयोगपतीच्या श्रद्धेची परीक्षा होती. त्याने प्रयत्न सुरू ठेवले. श्रद्धेस यश आले. पहिले पाऊल टाकण्यात आले.

प्रयोगपतीने परमेश्वरास मंगल गीतांनी जागे केले. प्रभू चिंतनातून उठला. प्रयोगपतींचे आनंदी मुख पाहून त्याला समाधान वाटले.

“पहिला प्रयोग पार पडला ना?” प्रभूने विचारले. “होय. देवा!” प्रयोगपती नम्रपणे म्हणाला.

प्रभू म्हणाला, “प्रयोग पुढे चालू दे. आणखी अन्य मानवी प्रवाह या भरतभूमीत आणा. ऐक्याचे पाऊल आणखी पुढे पडू दे. नाना धर्म, नाना संस्कृती येऊ देत हळूहळू एकत्र. प्रथम प्रथम स्पर्धा होईल. झगडे होतील. परंतु त्यातून शेवटी परमैक्य प्रकट होईल. माझ्या दृष्टीने ते सर्व संस्कृतीचे ऐक्य दिसत आहे. भरतभूमीत ती माझी इच्छा तृप्त झालेली मला दिसत आहे. आर्य व नाग यांच्या ऐक्यात किती अडचणी आल्या! परंतु त्या काहीच नव्हत्या. पुढे याहून मोठ्या अडचणी येतील. ज्या नागांची व आर्यांची आज एकी झाली त्यातूनही पुढे निराळे प्रश्न उत्पन्न होतील. आर्य लोक नागांची संस्कृती आत्मसात करतील. परंतु नागांना खाली खाली लटकतील. त्यांना एक प्रकारे ठिकठिकाणी अस्पृश्य करतील. त्यांच्या शेत्याभात्या जप्त करतील. त्यांना केवळ परावलंबी करतील. त्यामुळे आर्य व नाग यांच्या झगड्याऐवजी स्पृश्य व अस्पृश्य या नावाने झगडा सुरू होईल. परंतु त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. काही उदार स्पृश्य ह्या अस्पृश्यांना पुन्हा प्रेमाने जवळ घेऊ पाहतील. परंतु मग अस्पृश्यच रागावून दूर राहू लागतील. ते म्हणतील, 'आम्ही अलगच राहू' परंतु त्यांचा हा राग हळूहळू दूर होईल. प्रथम आई रडणाऱ्या मुलाला घेत नाही. मग ती त्याला घेऊ गेली तर चिडलेले मूल आईजवळ जात नाही. तसेच हे आहे. परंतु शेवटी मायलेकरे एकत्र येतीलच. तसे हे प्रवाह पुन्हा जवळ येतील. तसेच हिंदू व मुसलमान असे झगडे होती. हिंदू-मुसलमान प्रथम लढतील, भांडतील. परंतु मागून ते एकमेकांची संस्कृती अभ्यासू लागतील, एकमेकांच्या सुंदर चालीरीती घेतील. एकेमकांच्या निरुपद्रवी धार्मिक आचारांविचारांस मान्यता देतील. एकमेकांच्या साधुसंतांस भजतील. परंतु पुन्हाही कोणी मध्येच व्यत्यय आणतील. पुरी होत येणारी इमारत ढासळू लागेल. या देशाची शकले करण्याचे विचार उत्पन्न होतील. प्रयोगपते, तुझे हजारो वर्षांचे प्रयत्न मातीत मिळणार, असे तुला वाटेल. सर्वांना अंधार घेरील. कसे पाऊल टाकावे असा विचार पडेल. परंतु ह्या देशाचे तुकडे करा असे म्हटले जाताच झोपलेलेही जागे होतील. न बोलणारेही बोलू लागतील. सर्व सत्प्रवृत्तीचे लोक पांगलेले होते ते एक होतील. म्हणतील, नाही होऊ देणार तुकडे. आम्ही एकत्र राहू. परस्परांचे मांगल्य पाहू, तडजोड करू. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्नच सारे उठतील व ऐक्याचे प्रयत्न करू लागतील.

प्रयोगपते, मधूनमधून असे कसोटी घेणारे प्रसंग येतीलच. त्या त्या काळी निरनिराळ्या वेषांत निरनिराळ्या मिषांनी काही वक्रतुंड नेहमी राहतीलच तुझ्या प्रयोगाला विरोध करण्यासाठी उभे. ते आपापल्या समूहास दुसऱ्यांपासून सर्वस्वी अलग राहावयास शिकवतील. लहान लहान मुलांची मने द्वेषाने भरू पाहतील. रात्रंदिवस सर्वांच्या कानीकपाळी 'द्वेष द्वेष', 'सूड सूड' म्हणून ओरडत राहतील. आणि शेवटी सर्वांना सांभाळू पाहणाऱ्या ऐक्याचा विजय होईल. जीवनाचे स्वरूप शेवटी संहार हे नसून सहकार्य हे आहे ही गोष्ट सर्वांना पटेल. द्वेष सदैव विजयी होऊ शकत नाही. आत्म्याला सर्वांना भेटण्याची इच्छा असते. कोंडी फोडून उड्डाण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. कवची फोडून, अंडे फोडून पक्षी बाहेर पडतो व अनंत आकाशात नाचू गाऊ लागतो, त्याप्रमाणे मानवी आत्माही सर्व कृत्रिम बंधने तोडून पंख फडफडवून बाहेर पडेल. द्वेषाचीच उपनिषदे पसरवणारे वक्रतुंड सरळ होतील.

उच्च ध्येयासाठी ज्या वेळेस आस्तिकांसारखी एखादी महान विभूती शांतपणे प्राणयज्ञ करावयास उभी राहते, त्या वेळेस सर्व लोक गंभीरपणे, उत्कटपणे विचार करू लागतात आणि त्या विभूतीभोवती गोळा होतात. उदात्त त्याग शेवटी विजयी होतो. सकळ चराचरासाठी रात्रंदिवस जळणाऱ्या सूर्याभोवती इतर ग्रहोपग्रह शेवटी प्रदक्षिणा घालू लागतात व त्याच्यापासून प्रकाश घेऊन प्रकाशमान होतात. सर्वोदयासाठी निरपेक्षपणे सर्वस्वाचा होम करणाऱ्यांच्या भोवती मानवी समाज शेवटी प्रदक्षिणा घालील. अशा रीतीने विरोधातून शेवटी विकासच विजयी होऊन बाहेर पडेल. म्हणून तू कधीही निराश होऊ नकोस. घाबरु नकोस. सत्प्रवृत्तीवर विश्वास ठेवून काम कर. शेवटी सत्याचा जय होईल, यावर श्रद्धा ठेव. सत्कर्मासाठी धडपडत राहा. मानवांना प्रेमाने जवळ आणण्यासाठी झट. एकमेकांचा चांगुलपणा पाहावयास शिकव. या सुंदर व विशाल भारतदेशात मानवैक्याचा प्रयोग संपूर्णपणे यशस्वी होईल. तो यशस्वी झालेला माझ्या डोळ्यांस दिसतही आहे!”

“प्रभो, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशक्य वाटणारे शक्य करू. मानव शेवटी अंतर्यामी एक आहे हे सर्वांना कळून पराकोटीचा आनंद होईल. देवदेवा, तू चिंतनात रमून जा. आम्ही तुझे पाईक काळजीपूर्वक श्रद्धापूर्वक प्रयोग परिपूर्णतेस नेल्याशिवाय राहणार नाही. या भव्य व सुंदर भारतदेशात तो प्रयोग शेवटच्या परिणत दशेला आला की आम्ही तुला हाक मारू. प्रयोगाचे हे फळ पिकून गोड झाले की ते तुझ्या मंगल चरणी वाहू व कृतार्थ होऊ." प्रयोगपती म्हणाला.

प्रभूने चिंतनसिंधूत पुन्हा बुडी घेतली प्रयोगपती पुन्हा पुढील कार्याला लागला. महान देवदत्त कार्य! देवाचा महान भारतीय प्रयोग !
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा