shabd-logo

परिशिष्ट

6 June 2023

21 पाहिले 21
१. काळाची कल्पना

भारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या कल्पनेत मोठे स्वारस्य आहे. मनुष्य जितका विशाल दृष्टीचा, तितकी त्याची काळाची कल्पनाही विशाल असते. महात्माजी म्हणाले, “मी सहा महिन्यांतच स्वराज्य देतो.” परंतु हे महात्माजींचे सहा महिने. पन्नास वर्षांत राष्ट्राला स्वराज्य मिळाले, तरी ते सहा महिन्यांतच मिळाल्यासारखे आहे. राष्ट्राच्या आयुष्यात शतके म्हणजे क्षण असतात. व विश्वाच्या इतिहासात युगे म्हणजे क्षण असतात.

महापुरुष या दृष्टीने पाहात असल्यामुळे ते निराश होत नसतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की जातो तो क्षण महत्त्वाचा मानावयाचा नाही. याच क्षणी कार्य झाले पाहिजे असा तर निश्चय हवा. परंतु त्याबरोबरच, एकनिष्ठ प्रयत्नाबरोबर काळ अनंत आहे ही कल्पना जवळ असावी. जगात काही फुकट जाणार नाही. प्रयत्नवाद व आशावाद या दोहांचा समन्वय भारतीय संस्कृती करते.

२. श्राद्ध

पूर्वजांबद्दल अत्यंत आदर पौर्वात्यांत आहे. चीन व जपान या देशांत वृद्धपूजा हा धर्मच झाला आहे. भारतीय संस्कृती वृद्धांबद्दल आदर शिकविते. तुम्ही भारतात कोठेही जा, तेथे वृद्धांबद्दलची पूज्यबुद्धी दिसेल. खेड्यांत तुम्ही जा. म्हाताऱ्या मंडळींस मोठ्या आदराने तेथे वागवितात. म्हातारा मनुष्य भेटताच “या दाजी” असे म्हणून घोंगडी पसरतात.

घरातही वृद्धांना फार मान. काही समारंभ असो, आधी त्यांना नमस्कार. त्यांना लोडाशी बसवितील, त्यांचा आशीर्वाद घेतील. त्यांचे पाय चेपतील, त्यांच्या गोष्टी ऐकतील.

वृद्धपूजा म्हणजे ज्ञानपूजा. ज्ञानपूजा म्हणजे अनुभव. अनुभव

म्हणजे ज्ञान.

त्या शुभ्र केसांत अनुभवाचे शुद्ध ज्ञान असते. त्या वाकलेल्या पाठीवर अनुभवांचे मौल्यवान गाठोडे असते. त्या सुरकुतलेल्या शरीरावर कित्येक वर्षांचा इतिहास असतो. पूर्वीची परंपरा वृद्धांना माहीत असते. त्यांनी तो परंपरेचा दीप स्वतः पाजळून नवीनांच्या हातांत दिलेला असतो.

भारतीय संस्कृतीत श्राद्धदिन आहे. श्राद्ध म्हणजे पूर्वजांबद्दल आदर. महात्म्यांचे श्राद्ध सर्वांनी करावयाचे. श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण यांचे आपण श्राद्ध करीत नसतो, परंतु त्यांची जयंती करीत असतो. ज्यांना आपण अवतार मानिले, त्यांची जयंती करावयाची. कारण जन्मच मंगलासाठी असतो.

भवोहि लोकाभ्युदयाय तादृशाम् । ते जन्मताच दिशा प्रसन्न होतात, वारे मधुर वाहतात. परंतु इतर लोकांचे तसे नाही. इतर लोक कसे होते हे ते मेल्यावर कळते. त्यांची सारी आयुर्मर्यादा पाहून मग त्यांचे मोल ठरवावयाचे असते. श्रीज्ञानदेव, श्रीतुकाराम, श्रीशिव छत्रपती यांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. कारण जन्मतःच त्यांचा मोठेपणा ज्ञात नव्हता तो पुढे ज्ञात झाला. श्रीशिवछत्रपतीही पुढे अवतार समजले जाऊ लागले व त्यांची जयंती करण्यात येऊ लागली.

थोर महात्मे हे कोण्या जातीचे, कोण्या गावाचे नसतात. ते सर्वांचे असतात. म्हणून त्यांच्या श्राद्धांत सर्वांनी गोळा व्हावयाचे. काही महात्मे जगाचे असतात. काही देशाचे असतात. काही प्रांताचे असतात. काही गावाचे असतात. त्यांचे त्यांचे उत्सव त्या त्या मानाने साजरे होतात.

परंतु आपले आई-बाप आपल्याला मोठेच आहेत. आपले पूर्वज आपणांस पूज्यच आहेत. ते जगाला माहीत नाहीत, परंतु आपणांस माहीत असतात. त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. कृतज्ञतेसारखी मधुर वस्तू क्वचितच असेल.

भारतीय संस्कृती रोज पितृतर्पण व ऋषितर्पण करीत असते. ऋषींचे स्मरण व पूर्वजांचे स्मरण. ज्यांनी ज्ञान दिले त्यांचे स्मरण. ज्यांनी देह दिला त्यांचे स्मरण. सर्वांची नावे आपण कशी घेणार? त्या तर्पणात काही नावे असतात. परंतु ती नावे सर्व ज्ञात-अज्ञात ऋषींची व पितरांची प्रतिनिधिभूत असतात.

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले स्मरण. ज्या दिवशी आई - बाप वारले, त्या दिवशी त्यांचे स्मरण करावयाचे. आपण तीन पिढ्यांचे स्मरण करतो. परंतु तीन पिढ्यांचे स्मरण म्हणजे जणू सर्वांचेच स्मरण असते. श्राद्धाच्या दिवशी घर सारवून स्वच्छ ठेवावयाचे. एक प्रकारे गंभीर वातावरण घरात असते. पिंडांना नमस्कार करण्यासाठी घरातील लहानथोर जमतात. आप्तेष्ट येतात. श्राद्धाच्या दिवशी तीनच पिढ्यांचे स्मरण. परंतु सर्व पूर्वजांबद्दल एक दिवस वर्षांतून ठेविलेला आहे. भाद्रपद महिन्यातील अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून मानलेली आहे. त्या दिवशी सर्व पितरांचे स्मरण करावयाचे.

श्राद्ध म्हणजे कृतज्ञता. रोज आपण आपल्या व्यवहारात दंग असतो. परंतु वर्षातून एक दिवस तरी आई-बापांचे स्मरण हवे. भारतीय संस्कृतीत श्राद्धाला फार महत्त्व आहे. पाणी देण्यास कोणी तरी हवे, नाही तर मरणोत्तर गती नाही असे समजण्यात येई. नरकापासून तारतो तो पुत्र, अशी पुत्र शब्दाची व्युत्पत्तीही देण्यात येई. ज्याला पुत्र नाही, त्याचे घर अमंगल मानण्यात येई. पुत्राशिवाय घराला शोभा येत नाही.

याचा अर्थ एवढाच की परंपरा चालावी. आपण आपली कुलपरंपरा कोणाच्या तरी हातात देऊन निघून जावे. जो वंशतंतू आपल्या हातात आला, तो आपण तोडणे म्हणजे पाप आहे. तो तंतू अखंड ठेविला पाहिजे. अशा रीतीने आपण अमर होत असतो. पुत्र असला म्हणजे पितरांना स्वर्ग मिळतो. पितर अमर होतात. पुत्रांच्या रूपाने ते अमर होतात. सर्व पूर्वजांचे पुंजीभूत स्वरूप पुढील वंशतंतूंस असते; म्हणजेच ते सारे अमर होतात हा अर्थ.

प्रत्येक देशात ही श्राद्ध-कल्पना आहे. पाश्चिमात्य देशांत

पुण्यतिथींच्या दिवशी समाधीवर फुले वाहतात.

श्राद्धाच्या दिवशी दोन हेतू प्रधान असतात. एक पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण आणि दुसरे आपणासही असे मरावयाचे आहे, याचेही स्मरण. श्राद्धाच्या दिवशी दान करावे. एक दिवस सारे सोडून जावयाचे आहे, त्याची तयारी करावयाची. थोडे थोडे देऊन टाकावयास शिकावयाचे. श्राद्धदिन म्हणजे नम्रता शिकण्याचा दिन, अनासक्ती शिकण्याचा दिन, “कर्तव्य नीट कर, केव्हा जावे लागेल याचा नेम नाही” अशा चेतवणीचा दिन.

श्राद्धाच्या दिवशी आपण ब्राह्मण बोलावतो. त्यांना भोजन देतो. श्राद्धाचे स्वरूप कालाप्रमाणे बदलेलही. समजा, आज कोणी असे जेवण वगैरे न दिले, तरी तो अधर्म आहे असे नाही. दुसऱ्या स्वरूपात दान दे. खादी घेऊन ती वाट. एखाद्या संस्थेला साहाय्य कर. परंतु श्राद्ध केलेच पाहिजे. श्रद्धेने, कृतज्ञतेने पूर्वजांचे स्मरण व आपल्या मरणाचे स्मरण ताजे राहावे म्हणून त्या निमित्ताने त्याग, असा श्राद्धविधी आहे.

३. एकान्त एकाग्रता

भारतीय संस्कृतीत एकान्त ही एक महत्त्वाची वस्तू आहे. संसाराच्या रामरगाड्यातून मन जरा अलिप्त करावयाचे. मन शांत करावयाचे. मनावरची सारी सुखदुःखाची गाठोडी क्षणभर काढून फेकून द्यावयाची. मनाला मुक्त करावयाचे.

एकान्त म्हणजे विश्रांती. त्या वेळेस आपण आपल्या खोल स्वरूपाशी जणू मिळून जावयाचे. आत आत जावयाचे. आकाशात शेकडो ढग येतात, हजारो वारे सुटतात, धुळीचे लोट उठतात, पाखरे उडतात. परंतु या सर्वांच्या पाठीमागे आकाश निळे निळे असते. त्या आकाशाला या गोष्टींचा स्पर्श नाही. आपले हृदयाकाश असेच करावयाचे. रिकामे करावयाचे. स्वच्छ करावयाचे. यासाठी एकान्ताचा आश्रय करावयाचा.

जरा सायंकाळी टेकडीवर जाऊन बस. नदीकाठी जाऊन बस. उचंबळणाऱ्या सागराला पाहा. रमणीय बागेत जा. जरा संसारातील त्रास, चिंता विसर. परंतु मनुष्याला संसाराचा इतका हव्यास आहे, की तो फिरावयासही एकटा जाणार नाही. चार जणांना हाक मारून फिरावयास जाईल. तोच संसार बरोबर. त्याच गप्पा. कचेरी- कोर्टाच्या गप्पा, शाळा-कॉलेजातील गप्पा, आपापल्या कर्मक्षेत्रातील गप्पा. सर्वांची निंदास्तुती चालावयाची.

आपले मन म्हणजे जणू उकिरडा ! साऱ्या जगाची घाण जणू तेथे येऊन पडलेली असते. आपले मन म्हणजे जणू चावडी किंवा चव्हाटा. सर्वांची चर्चा या मनात सदैव चाललेली. अमेरिकेतील निसर्गप्रेमी थोरो याने एके ठिकाणी असे म्हटले आहे: “Our mind is like a bar-room !” वकिलांच्या बैठकीत साऱ्या जगाच्या उठाठेवी चालतात, तसे आपल्या मनाचे आहे.

परंतु या मनाला स्वतःच्या आत्म्याची ओळख नसते. त्याला स्वतःच्या जीवनात काही आनंदच नाही. आनंदाचा झरा आत आहे याची जाणीव त्याला नाही. त्याचा आनंद परवश आहे. वर्तमानपत्र वाचले नाही की चुकल्यासारखे होते. कोणाचे पत्र आले नाही म्हणजे वाईट वाटते. ज्याचे टपाल रोज पुष्कळ येते, त्याला वाटते आपण केवढे मोठे! जगाशी किती संबंध!

परंतु हा मोठा मनुष्य दरिद्री असतो ! त्याला त्याच्या आत्म्याचे एकही पत्र मिळत नसते. त्या आत्म्याची एकही हाक त्याला ऐकू येत नसते. या आत्म्याची पत्रे ज्याला येऊ लागली, त्याच्याहून भाग्यवान कोण? या आत्म्याची नेहमी उपेक्षा होत असते. तुरुंगात ज्याप्रमाणे कैद्याची उपेक्षा होते, परंतु तुरुंगाच्या भिंतीची प्रत्येक क्षणी पाहणी होते, लिंपालिंपी होते, त्याप्रमाणे या देहातील कैदी जो आत्मा त्याची उपेक्षा होते. परंतु या देहाची मात्र कोण काळजी! तो कैदी आत मरत आहे! अरे, त्याची जरा गाठ घे.

एकान्ताची ज्याला सवय आहे, त्याची पटकन एकाग्रताही होते. एकाग्रतेची आपणांस फार आवश्यकता असते. कोणताही प्रश्न सोडविताना मन एकाग्र करता आले पाहिजे. संसार वा परमार्थ, त्या त्या वेळच्या महत्त्वाच्या गोष्टी उलगडताना जर मनाची, बुद्धीची एकाग्रता करता आली नाही, तर प्रश्न सुटत नाही. आपण गोंधळून जातो. महात्माजींच्यासारखे महापुरुष पटकन चित्त एकाग्र करून सर्व परिस्थितीचे आकलन करून घेऊ शकतात.

एकान्तात आपणांस सामर्थ्य मिळते, आशा मिळते. जणू देवाघरी जाऊन ताजेतवाने होऊन येतो. एकान्त म्हणजे एक प्रकारे मरण. मरणानंतर जसा पुन्हा नवीन जन्म, त्याप्रमाणे एकान्तातून जणू पुनर्जन्म होऊन आपण बाहेर पडतो.

आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते. ती एकान्ताची जागा. तेथे जाऊन सारे काही विसरावयाचे. देवाजवळ उघडे व्हावयाचे. त्याचा हात सर्वांगावरून फिरवून घ्यावयाचा. केवढे समाधान ते असते! केवढी शांती!

देवाजवळ क्षणभर बसून आलेला मग दानवांना भारी होतो. अपार चैतन्य त्याच्याजवळ असते. दुर्दम्य आशावाद तो घेऊन येतो. श्रद्धेचे सामर्थ्य घेऊन येतो. एकान्त म्हणजे संजीवनसिंधू घेऊन मिळविण्याची जागा. एकान्तात हसण्यासाठी रडणे असते. उड्डाण करण्यासाठी संकोच असतो. कर्माचा जोरदार वेग निर्माण करण्यासाठी कर्मशून्यच असते. एकान्त म्हणजे सर्व सामर्थ्याचा साक्षात्कार !

एकान्त म्हणजे माणूसघाणेपणा नव्हे. जगाला तुच्छ लेखणे नव्हे. जगाला विटणे नव्हे. एकान्त म्हणजे स्वतःचे बरबटलेले जीवन धुऊन टाकण्याची जागा. चिखलाने अत्यंत भरलेले वस्त्र ज्याप्रमाणे एका बाजूला जाऊन आपण धुतो, त्याप्रमाणे अत्यंत मलिन झालेले जीवन एकान्तात जाऊन धुवावयाचे. समाजाची सेवा अधिक उत्कटतेने व आशेने, अधिक सामर्थ्याने व श्रद्धेने करता यावी म्हणूनच एकान्त सेवावयाचा. मरण म्हणजे सर्वांत मोठा एकान्त !
24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा