प्रश्नकर्ता: एकीकडे तर मनात भाव होतो की मला दानमध्ये सर्वकाही देऊन टाकायचे आहे, पण रुपकात तेही होत नाही.
दादाश्री : ते दिले जात नाही ना! देणे काही सोपे आहे ? दान करणे ही तर कठीण वस्तू आहे! तरी पण भाव केला पाहिजे. धन चांगल्या मार्गाने देणे ते आमच्या सत्तेत नाही. भावना करु शकतो, पण देऊ शकत नाही आणि त्या केलेल्या भावनेचे फळ पुढच्या जन्मी मिळते. दान तर हे भोवरे (मनुष्य) कसे देणार? आणि जे देतात ते तर 'व्यवस्थित शक्ति' त्यांना देण्यास भाग पाडते, म्हणून देतात. 'व्यवस्थित शक्ति' करवते, म्हणून मनुष्य दान देतो. आणि 'व्यवस्थित शक्ति' नाही करवंत, म्हणून मनुष्य दान देत नाही. 'वीतरागांना' दान देण्याचा किंवा घेण्याचा मोह नसतो. ते तर शुद्ध उपयोगी असतात.
दान देतांना 'मी दान देतो' असा भाव होतो. त्यावेळी पुण्याचे
परमाणु खेचले जातात आणि वाईट काम करतो तेव्हा पापाचे परमाणु खेचले जातात. ते मग फळ देताना शाता फळ देतात, किंवा आशाता फळ देतात. जोपर्यंत अज्ञानी असतात, तोपर्यंत फळ भोगातात, सुख-दुःख भोगातात. जेव्हा की ज्ञानी त्यास भोगत नाहीत, फक्त त्यास जाणतात.