प्रश्नकर्ता: व्यापारी नफा जास्त करतात, एखादा उद्योगपती किंवा व्यापारी मेहनतीच्या तुलनेने कमी मजुरी देतात किंवा विना मेहनतीची जी काही कमाई होत असेल, तर ती हिंसाखोरी म्हटली जाते का ?
दादाश्री ती सर्व हिंसाखोरीच आहे.
प्रश्नकर्ता आता जर का तो फुकटची कमाई करेल आणि धन धर्मासाठी खर्च करेल तर ती कोणत्या प्रकारची हिंसा म्हटली जाते ?
दादाश्री : जितका पैसा धर्मकार्यासाठी खर्च केला, जितका त्याग केला, तितका कमी दोष लागतो. जितके पैसे तो कमवतो, समजा लाख रुपये कमवले व त्यातील ऐंशी हजाराचा दवाखाना बनवला तर तितक्या रुपयांची जबाबदारी त्याला राहिली नाही. वीस हजाराचीच जबाबदारी राहिली. म्हणजे ते चांगले आहे, चुकीचे नाही.
प्रश्नकर्ता: लोक लक्ष्मी जमा करुन ठेवतात, ती हिंसा म्हटली
जाईल की नाही ? दादाश्री हिंसाच झाली ती जमा करुन ठेवणे ती हिंसा आहे. दुसऱ्यांच्या कामी लागत नाही ना!
जसे येतात तसे जातात
हे तर देवाच्या नावावर धर्माच्या नावावर सगळे चालत आहे.
प्रश्नकर्ता: दान करणारा मनुष्य तर असे मानतो की मी तर श्रद्धेने
दिले आहे. पण ज्याला खर्च करायचे आहे तो कसे खर्च करतो, ते
आम्हाला कसे कळेल ?
दादाश्री : पण हे तर आमचे पैसे खोटे असतील तर चुकीच्या मार्गाने जातील. जितके धन खोटे तितके वाईट मार्गाने जाते आणि धन जितके चांगले असेल तितके चांगल्या मार्गाने जाते.