भाजपा आणि संघाला उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का, म्हणाले 'यासाठी मर्दानगी लागते'
आम्ही गर्वाने हिंदू आहोत असं सांगत असताना काही नालायक लोक मात्र हिंदू, हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानीमाता या सर्वांचा भगवा आहे. पण त्यातही काहीजण भेदभाव करत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
"आज तुम्ही सर्वांनी मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या. 'मन की बात' तर विचार करुन केली जाते. पण आज या सर्वांनी 'दिल की बात' सांगितली आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. "आम्ही काय केलं, कोणाला मदत केली याची मला आठवण करुन द्यायची नाही. 1992 नंतर मुंबईला शिवसेना आणि शिवसैनिकांनीच वाचवलं," याची आठवण त्यांनी करुन दिली.