shabd-logo

एका वर्षाची रजा

27 June 2023

13 पाहिले 13


फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपलीतयारी आहे का?" अशा प्रश्न विचारला. पं. नारायणशास्त्रांनी होकार दिल्यानंतर पाठशाळेच्या नियमानुसार विनोबांचे संस्कृत अध्ययन सुरू झाले. याच काळात वाईच्या पाठशाळेत पुढे तर्कतीर्थ म्हणून प्रसिद्धी मिळालेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीही होते. त्यांनी विनोबांच्या त्या काळातील संस्कृत अभ्यास, व्रतपालन इत्यादी बाबत आठवणी सांगताना, 'योगशास्त्रात उत्तम मध्यम व मंद असे तीन अधिकारी असतात उत्तम अधिकारी सहा महिन्यातच तयार होतो" त्याचे प्रत्यतर विनोबांच्या ठिकाणी आले. सहा महिन्यातच शांकर प्रस्थानत्रयीवर विनोबांनी अधिकार मिळविला, असे गुरुवर्यांना आढळून आले.' असे म्हटले आहे. याशिवाय गीता, उपनिषद, पांतजलयोगसूत्र आणि मनुस्मृतीवरील चिकित्सक अभ्यासही सहा महिन्याच्या काळात विनोबांनी केला.

अध्ययनाची सुरुवात : विनोबांच्या अभ्यासाविषयी आपले मत देताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, 'विनोबांच्या परिचयानंतर त्यांच्या वाणीचे वैभव लक्षात येते. अध्यात्मविद्या आणि विविध भाषा हे विनोबांच्या अभ्यासाचे विषय होते. वाईस येण्याच्या अगोदरच त्यांची ज्ञानेश्वरीची आठ पारायणे, गीतारहस्याचे पाच वेळा वाचन, तुकाराम गाथा, दासबोध, मोरोपंत इत्यादीचा अभ्यास झालेला होता. एकीकडे संस्कृतचा अभ्यास आणि त्याचवेळी विनोबांची पुणे, कऱ्हाड, सांगली, मिरज, इत्यादी ठिकाणी पायी प्रवासही करताना जनतेच्या आर्थिक, सामाजिक स्थितीचे अवलोकन करीत. गीतेवर अनेक भाषणेही दिली... आपल्या पन्नासाव्या भाषणात विनोबा म्हणाले, "गीतेपेक्षा श्रेष्ठ वाचनीय कोणताही ग्रंथ नाही, तरी परंतु मला असा एक श्रेष्ठ पुरुष सापडला, जो गीतेतील तत्त्वज्ञानाप्रमाणे भाषणेही देतो त्याप्रमाणे वागतो ते माझे गुरू साबरमती आश्रमात राहतात." या दरम्यान तर्कतीर्थ विनोबांच्या घरी बडोद्याला मुक्कामाला होते. विनोबांनी पुन्हा प्रपंच करावा अशी त्यांच्या आईवडीलांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा तर्कतीर्थ म्हणाले, "ते आता अशक्य आहे, ती स्वयंसिद्ध प्रेरणा आहे, तिचा उलटा परिणाम होणार नाही, विकासच होणार. गांधींचा प्रभाव त्याचेवर पडला याचे कारण समानधार्मित्व होय."

बापूंना पत्र : विनोबांनी एक वर्षासाठी आश्रम सोडला असला तरी त्याच्या आश्रमातील आपल्या सहकाऱ्यांशी आणि बापूजींशी पत्र व्यवहार चालूच होता. आपले मित्र मोघे, धोत्रे, काळे यांना लिहीलेल्या एका पत्रात विनोबा म्हणतात, 'आपल्या आयुष्याचे धोरण, आयुष्य संपविण्याआधी ठरवले पाहिजे. आपल्या " कार्याकडे आपली दृष्टी असावी. तुमच्या आमच्यासारखे तरूण तपश्चर्या करु लागल्यास भारतमातेचा उद्धार लवकर होईल, भारतमातेच्या हाकेला प्रतिसाद द्या ही विनंती." या पत्रव्यवहाराबरोबरच १०-२-१९१८ रोजी विनोबांनी गांधींना लिहिलेले सविस्तरपत्र म्हणजे त्यांनी आपल्या एका वर्षाच्या सुट्टीत केलेल्या कार्याचा अहवालच आहे. या पत्रात विनोबा लिहीतात, परमपूज्य बापूजी,

वर्षापूर्वी स्वास्थाअभावी आश्रमातून सुट्टी घेऊन मी बाहेर आलो, दोन तीन महिन्यात आश्रमात परतेन असे त्यावेळी वाटत होते. मात्र जवळ जवळ एक वर्ष उलटले तरी मी आश्रमात परतू शकलो नाही. त्यामुळे मी आश्रमात परतेन किंवा नाही, मी जिवंत आहे वा नाही अशी शंकाही आपणास आली असेल. पण यात सारा दोष माझाच आहे. कारण मामा फडके यांना एक दोन पत्रे लिहिली, त्यात 'सत्याग्रह' सुरू करण्याविषयी काही ठरत असल्यास कळवावे, मी सर्व काही सोडून आश्रमात परतेन अन्यथा ज्यासाठी मी आश्रमाबाहेर राहत आहे ते पूर्ण झाल्यावरच आश्रमात येईन असे लिहिले होते. माझा जन्मच आश्रमासाठी आहे अशी माझी श्रद्धा आहे. तर पुन्हा प्रश्न असा पडतो मी वर्षभर आश्रमाबाहेर का राहिलो?

वयाच्या सहाव्या वर्षी मी ब्रह्मचर्य पाळून देशसेवा करण्याचे ठरवले आहे. हायस्कूलात मात्र गीतेची आवड निर्माण झाली. माझे गीतेवरील प्रेम अजूनही कायम आहे. त्यामुळेच मी वेदांत आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. वाईचे नारायणशास्त्री मराठे हे आजन्म ब्रह्मचारी नामांकित विद्वान असून वेदांत आणि इतर शास्त्रे शिकवितात. त्यांचेकडेच उपनिषदांचा अभ्यास करण्याच्या मोहामुळे मी वाईत अधिक राहिलो. संस्कृतच्या अभ्यासाशिवाय याकाळात मी आणखी काम केले हे आपणस कळवितो. याकाळात उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्र आणि शांकरभाष्य, मनुस्मृती, पांतजलयोगसूत्र यांचा अभ्यास केला. त्याशिवाय याज्ञवल्क्य स्मृती, विशेषिक सूत्र, न्यायसूत्र या. ग्रंथाचे वाचन केले. आणखी काही शिकावे अशा मोह नसून जे सहज वाचन होईल त्याचेच वाचन करण्याची इच्छा राहिली आहे. आश्रम सोडण्याचे दुसरे कारण प्रकृती सुधारणे. त्यासाठी दररोज १० ते १२ मैल पायी चालणे, आठ ते दहा शेर दळणे, तीनशे सूर्यनमस्कार अशा व्यायामामुळे माझी प्रकृती आता सुधारली आहे.

सुट्टीतील आहार व कार्यक्रमः दैनंदिन आहारात पहिल्या सहा महिन्यानंतर मीठ, मसाला बंद केला असून मीठ मसाला आजन्म न घेण्याचा मी निश्चय केला आहे. फक्त दूध घेत असून, दूध न घेण्यासाठी अनेक प्रयोग करूनही दूधाशिवाय जमत नाही हे सिद्ध झाले. तरी पण भविष्यात दूध सोडण्याबाबत शक्यता निर्माण झाल्यास तेही घेणे सोडण्याची माझी तयारी आहे. तसेच या काळात महिनाभर फक्त लिंबू पाणी घेत राहिलो, त्यामुळे अशक्तपणा जाणवला. आज मी खालीलप्रमाणे आहार घेत आहे. दूध साठ तोळे, दोन भाकरी (वीस तोळे ज्वारीची) केळी चार किंवा पाच, एक लिंबू उपलब्ध असल्यास. आश्रमातील भोजनांबाबत मी आपल्या सल्ल्यानुसार आहार घेईन. चवीसाठी म्हणून कोणताही पदार्थ घेण्याची इच्छा होत नाही. तरीपण वर नमूद केलेला माझा आहार बराच खर्चीक आहे. माझ्या आहारावरचा दररोजचा खर्च पुढीलप्रमाणे केळी आणि लिंबू एक आणा, ज्वारी अर्धाआणा, दूध सव्वा आणा, एकूण खर्च पाऊणे तीन आणे यातील फेरफाराबाबत मला आपले मार्गदर्शन हवे आहे. कृपया पत्राने कळवावे.

१) आतापर्यंत मी खालील प्रमाणे कार्य केले आहे. गीता वर्ग  
    चालवला. सहा विद्यर्थ्यांना फी न घेता अर्थासहीत गीता    
    शिकविली.

२) दोघांना नऊ उपनिषदे शिकविले.

३) चौघांना ज्ञानेश्वरीचे सहा अध्याय शिकवले.

४) हिंदी प्रचारासाठीविद्यार्थ्यांसाठी हिंदी वर्तमानपत्राचे वाचन
    केले.

५) दोघांना इंग्रजी शिकवले.

६) ४०० मैल पायी प्रवास करून रायगड, सिंहगड इत्यादी किल्ले
    पाहिले.

७) सत्याग्रहाश्रम तत्त्वाचा प्रसार करण्यासाठी विविध प्रयोग केले.

८)वाईत मित्रमंडळ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे
   वाचनालय सुरू केले. वाचनालयाच्या मदतीसाठी दळण दळून   
   देण्याचा वर्ग सुरू केला.
   दळणाचे आलेल्या पैशातून दोन महिन्यात ४०० पुस्तके जमा    
   केली.
   
९) प्रवासात गीतेवर एकूण ५० प्रवचने दिली. आश्रमात परत येताना मुंबईपर्यंत पायी नंतर रेल्वेने येईन. माझ्यासोबत २५ वर्षाचा एक विद्यार्थीही असेल. मी उशारीरात उशीरा चैत्र प्रतिपदेपर्यंत आश्रमात पोहोचेन.

१०) बडोद्यातील १०-१५ मित्रांनी लोकसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी आम्ही जी संस्था स्थापन केली होती, त्या संस्थेच्या वार्षिकोत्सवात मी सामील झालो होतो. त्यात हिंदी प्रचाराचा आपला विचार मांडला आणि त्यासाठी काम करण्यास ही संस्था व त्याचे सर्व सभासद तयार आहेत.

सुट्टीतील आचरण: शेवटी सत्याग्रह आश्रमाचा निवासी या नात्याने माझे आचरण काय आहे हे सांगणे आवश्यक वाटते.

१) अस्वाद या संबंधी वर लिहिलेले आहे.

२) अपरिग्रह लाकडी ताट, लाकडी वाटी, आश्रमातील एक तांब्या, धोतर,कांबळे आणि पुस्तके इतकाच परिग्रह, संचय आहे. बंडी, कोट, टोपी न वापरण्याचे व्रत घेतले असून अंगावर धोतरच पांघरीत असतो.

३) माझ्या मते सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्याचे पालन मी काटेकोरपणे केले..
या पेक्षा अधिक काय लिहू? स्वप्नातही ईश्वर माझ्याकडून आपली काय सेवा घेणार आहे! ती खात्रीपूर्वक सांगू शकेन की एक सोडून माझ्या स्वयंपाक, माझा अभ्यास आश्रम नियमानुसारच आहे. म्हणजे मी आश्रमाला आणि आश्रम हेच माझ्ये साध्य आहे.
सत्याग्रह किंवा दुसरी समस्या निर्माण झाल्यास मी लगेचच परतेन नसता वर लिहिलेल्या वेळी ही आवश्य येईन. आश्रमातील बदल काय? तेथे विद्यार्थी किती आहेत? राष्ट्रीय शिक्षणाची कोणती योजना आहे? आपणच मला पत्र लिहावे. असा आपणास पितृतुल्य समाजणाऱ्या विनोबाचा आग्रह आहे.

दोन चार दिवसात वाईहून मी इतरत्र जाईन.

विनोबांचा प्रणाम

ह्या पत्रानंतर मात्र बापू सद्गतीत झाले. 'हा तर भीम आहे भीम. गोरक्षाने ''मच्छिद्राला हरवले' शिष्याने गुरुचा पराभव केला-बापूचे चार शब्द या सविस्तर पत्राच्या उत्तरात बापूंनी विनोबाला कळवले.
"तुझ्यासाठी कोणते विशेषण वापरू हे सूचतच नाही. तुझे प्रेम आणि चारित्र्यामुळे मी तुझ्या मोहात गुंतत चाललो आहे. तुझी परीक्षा घेण्यास मी असमर्थ ठरलो आहे. तू स्वतःच करू घेतलेल्या परीक्षेला मी स्वीकारीत असून तू मान्य केलेले तुझे पितृत्व मी स्वीकारीत आहे. माझी कामना तू पूर्ण केली आहेस. माझ्या मते तोच खरा पिता जो आपल्याही पेक्षा चारित्रवान पूत्रास घडवतो आणि खरा पूत्र तोच जो पित्याचे कार्यास वृद्धींगत करतो. पिता सामवादी, दयामय, दृढ असल्यास मुलाने या गुणांचा अंगिकार करावा आणि हे सर्व काही तू करून दाखविले आहेस. अर्थात तु जे काही केले त्यासाठी मी काही प्रयत्न केले असे मला नाही वाटत. तू मला जे पितृपद दिले आहेस ते तुझी भेट म्हणून स्वीकारीली आहे. त्या योग्य बनण्याचा मी प्रयत्न करीन. पण जर मी हिरण्यकश्यपूप्रमाणे वागू लागल्यास तू प्रल्हाद बनून माझा सादर निरादर करावा.

आश्रमाबाहेर राहूनही तू आश्रमनियमाचे पालन केले ही गोष्ट खरी ठरली असून तुझ्या आश्रमात परतण्याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. मामा फडक्यांनी पाठविलेले पत्र मामांनी मला वाचून दाखविले होते. ईश्वर तुला दीर्घायुष्य बहाल करो, भारताच्या उन्नतीसाठी तुझी सेवा घडो हीच माझी इच्छा.

तुझ्या दैनंदिन आहारात सध्या काही बदल करावयाची गरज नाही. दूध घेणे आता सोडू नको. गरज भासल्यास दूध घेणे थोडे वाढविल्यास हरकत नाही.. रेल्वे सत्याग्रहाची तूर्त आवश्यकता नसली तरी त्याच्या प्रचाराची मात्र गरज आहे. खेडा जिल्ह्यात सत्याग्रहाची गरज भासेल. सध्या मी रमता राम आहे एक दोन दिवसात दिल्लीस जाईन,

प्रत्यक्ष भेटीत सर्व विशेष, सर्वांना तुझ्या भेटीची उत्सुकता आहे. आश्रम सोडून वर्ष झाले त्याच दिवशी आरतीच्या वेळी उघड्या डोक्याने, अनवाणी जाताना ज्या वेषात होते त्या वेषातच विनोबा आश्रमात पुन्हा दाखल झाले. ते परतणार आहे हेही कुणाच्या लक्षात नव्हते. त्या दिवशी सोमवार म्हणजे गांधींच्या मौनाचा दिवस होता, त्यामुळे बापूंना त्रास देऊ नये असा विचार विनोबांनी केला आणि तडक स्वयंपाक घरात जाऊन भाजी चिरण्याचे काम सुरू केले.

दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी विनोबांना पाहून गांधींजी खूष झाले. त्यांच्या वेळेच्या बंधनाच्या पालनाने प्रसन्न होत, आश्रमात त्यांचे स्वागत करीत म्हटले, "तुमची सत्य निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली," यावर विनोबा उद्गारले, "ही माझी गणितनिष्ठा आहे." त्यावर हसत बापूंनी उत्तर दिले, "गणितात कधी

सत्याचा अपलाप असू शकतो का?" सत्याग्रह आश्रमात विनोबा सतत सत्य आणि ब्रह्मांची अभिलाषा बाळगून स्वतःला शून्यवत मानीत. याच काळात विनोबांनी गांधींच्या मंगल प्रभातचे मराठीत
रुपांतर करून त्याच्या प्रस्तावनेत काही कवितेच्या काही ओळी लिहिल्या त्यातील शेवटच्या दोन ओळी होत्या-अद्वितीय चि एकत्व गुरुचे गौरवूनि जे विन्या शून्य विना -भूत फावला गणितापरी ।।

गुरुचे एकत्व अद्वितीयच आहे. ज्याच्या गौरवाने विन्या- विनोबा आणि शून्य गणिता समान सफल झाला आहे.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा