shabd-logo

ग्रामदान

28 June 2023

9 पाहिले 9
२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना नेहरूंची भूमिका पटली आणि ते शांत राहिले व म्हणाले, जर चीनशी असणारा आपला झगडा राष्ट्रीय सन्मान आणि प्रतिष्ठा सांभाळून सुटला तर त्याच मार्गाने पाकिस्तान आणि काश्मीरचा झगडा सोडण्यात यश मिळू शकेल.

४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी १९६३ या तीन दिवसात भारतातील सर्व खादी कार्यकर्त्यांचा मेळावा नवद्वीप येथे होता. विनोबांनी आपेल चिंतन त्यांच्या समोर मांडीत म्हटले की, "आतापर्यंत खादी सरकारभिमुख होती, ती आता ग्रामभिमुख करावयाची आहे. प्रत्येक माणसाला काही वार खादी मोफत विणून द्यावी. खादीच्या वीणकामात केलेली मदत गावकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल. त्याबरोबर डिफेन्स मेझर म्हणून गावाला कापडाबद्दल स्वावलंबी होता येईल. अशा प्रकारच्या खादी प्रचारावर तुम्ही युद्ध पातळीवरून कामाला लागा. राबर्ट ब्राउनींगच्या कवितेप्रमाणे । have everbeen a fighter so one fitght more. The last and the best.. खादीसाठी अखेरचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर खादी राणी बनेल अथवा संपुष्टात येईल.

१८ एप्रिल १९९३ रोजी भूदान यात्रेला एक तप होणार होते. त्या दिवशी विनोबा गंगासागरच्या पदयात्रेला निघाले. गंगासागर हे एक महत्त्वाचे तिर्थस्थळ, तेथे गंगानदी अरबी सागराला मिळते. गंगासागर हे तीसरे टोक कन्याकुमारी एक टोक, हिमालय दुसरे टोक गाठले. त्यांनी ग्रामस्वराज्याचा त्रिवार जय केला. सुलभ ग्रामदान- २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर रायपूर येथे विनोबा सर्वोदय संमेलनात हजर राहिले. या संमेलनात विनोबांनी त्रिवीध कार्यक्रमाची घोषणा केली.

१) जोवर ग्रामदानाची संख्या वाढणार नाही तोपर्यंत नव्या युगाची पात्रता येणार नाही. २) शांतीसेना व्यापक झाल्याशिवाय अहिंसक शक्तीचा विकास होणार नाही.

३) खादीचा प्रसार गावागावातून झाला पाहिजे. याच संमेलनात विनोबांनी सुलभ ग्रामदानाची कल्पना मांडली. विनोबा म्हणतात, "सौम्य सौम्यतर- सौम्यतम ही अहिंसक क्रांतीची दिशा आहे. ह्या दिशेने पुढे जाताना दात्यांनी जमीन वाटप करावे हे पुढचे पाऊल पडले व प. बंगालात सुलभं ग्रामैदान हे त्याहून पुढचे पाऊल पडले. विनोबा म्हणतात, "ग्रामदानाचा विचार समाज मेरणेला पूर्णपणे अनुकूल असा आहे पण स्वार्थ प्रेरणेला तो तितकासा अनुकूल नाही. या दोन्हीचा मेळ घालण्याच्या विचारातून सुलभ ग्रामदानाची कल्पना ध्यानात आली. 

" सुलभ ग्रामदानात खालील गोष्टीचा समावेश होतो- 

१) ग्रामदानात खेड्यातील निदान ८० टक्क्यां पेक्षा अधिक लोकांनी आपल्या जमीनीची मालकी सोडावी.

 २) ग्रामदानात गावची कमीत कमी ५१ टक्के जमीन यावी.

 ३) प्रत्येकाने आपल्या जमीनीचा २० वा हिस्सा गावच्या भूमीहीनासाठी द्यावा.

 ४) उरलेली जमीन पूर्वीप्रमाणेच मालकाजवळ राहील व तो ती जमीन कसेल.
 
  ५) लहान गाव असल्यास गावच्या सर्व प्रौढांची मिळून एक ग्रामसभा बनेल. मोठे गाव असल्यास प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती ग्रामसभेची सभासद राहिल. गावचा सर्व कारभार ग्रामसभा पाहिल.

६) प्रत्येक व्यक्ती दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा १ टक्के हिस्सा ग्रामकोष निर्माण
• करण्याकरिता म्हणून ग्रामसभेला देत राहिल. ग्रामसभा यातून बेकारांना काम देण्याकरीता, उद्योग सुरू करण्याकरीता, अनाथ अपंगाच्या व्यवस्थेसाठी शिक्षण, आरोग्य इत्यादी कामेकेली जातील. याच यात्रेत कलकत्यात विनोबांनी 'कुराणसार' ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले. कलकत्यात विनोबांनी चीनी लोकांची वस्ती असलेल्या 'चायना टाऊन' या भागाला भेट दिली. ... या देशात तुम्हाला प्रेम आत्मियताच मिळेल असे भारतीय जनतेतर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो. परस्पर स्नेहभाव वाढविण्यासाठी परस्पराची भाषा शिकणे आवश्यक आहे." असे मार्गदर्शनपर दोन शब्द विनोबांनी सांगितले. शांतीनिकेतन मधील एका शिक्षकाच्या मदतीने चीनी भाषेचा अभ्यास केला होता.
ते म्हणतात, "चीनी व जपानी या चित्रलिपी फार कठीण असल्यामुळे त्यांना नवी सोपी व शास्त्रीय लिपी असावी. भारताच्या सर्व भाषांनी देवनागरी लिपीचा स्वीकार
केला तर पुढे मागे चीन जपानही देवनागरी लिपीचा स्वीकार करतील अशी मात्र आशा आहे. 

पुन्हा पवनार : रामपूर संमेलन आटोपून विनोबा ६ एप्रिलला सेवाग्रामला पोहोचले. तेथून ते १० एप्रिलला म्हणजे १३ वर्षानंतर पवनारला पोहोचले. या १३ वर्षाच्या काळात विनोबांनी ८० हजार मैल पायी प्रवास केला, लाखो एकर जमीनीचे भूदान मिळविले, काही हजार ग्रामदाने जाहीर केली. या बरोबरच अनेक ग्रंथाचे संकलनही केले. पवनारला १० दिवस मुक्काम करून २१ एप्रिल १९६४ रोजी विनोबा वर्धा जिल्ह्याच्या पदयात्रेला निघाले. या पदयात्रेत असतानाच त्यांना २७ मे १९६४ रोजी पं. नेहरूंच्या निधनाची बातमी समजली. 'पं. नेहरू महान नेते होते ते अखेरचे नेते आता नेतृत्वाचे युग संपले आहे, गणसेवकाचे युग आले. सर्वांनी मिळून काम करण्याचे, सर्वांनी मिळून निर्णय घेण्याचे युग आले आहे' याच पदयात्रेत असताना त्यांना लॅबरथाईन व्हींगो (कानाची शीर निकामी होणे) मुळे चक्कर आली. त्यांमुळे ते पवनारला परत आले. ब्रह्म विद्यामंदिरात त्यांनी विश्रांती घ्यायचे ठरविले. वैद्यनाथ धामच्या मंदिरात झालेल्या मारहाणीमुळे त्यांना कानाजवळ आणि मान व पाठीवर मार लागला होता. त्यातूनच हा आजार बळावला होता. सर्व प्रकारच्या औषधोपचार पद्धतीचा (पॅथीचा) उपयोग करूनही रोग कायमच राहिला. शेवटी विनोबा गमतीने म्हणाले, "मी एकच पॅथी सर्वोत्तम मानतो. नॅचरोपॅथी, अॅलोपॅथी ह्या सर्वात श्रेष्ठ आहे सिम्पथी. "

पवनार येथे विनोबांनी ब्रह्मविद्या मंदिरात नोव्हेंबर १९६४ ते जुलै ६४ या काळात विश्रांती घेतली. या कालखंडास विनोबांनी 'अकर्मयोग' असे संबोधले. वेदांतसुधा, अनुशासनम्, विनयांजली, गुरुबोधसार आदी ग्रंथाचे संकलनही या काळात झाले. विनोबा म्हणत मी माझ्या आयुष्यात तीनच संस्था सुरू केल्या १) बडोद्याचे विद्यार्थी मंडळ २) नाळवाडीचे ग्रामसेवा मंडळ ३) पवनारचे ब्रह्म विद्यामंदिर. या तिन्हीना विनोबा महत्त्व देत. यालाच ते आपले जीवितकार्यही मानीत.

पं. नेहरूनंतर शास्त्री पंतप्रधान झाले. विनोबांना भेटण्यासाठी शास्त्रीजी नागपूरहून जामनी या गावी पोहोचले. एका लहानशा झोपडीत विनोबा आणि शास्त्री यांची चर्चा झाली. ऑगस्ट १९६४ मध्ये विनोबा विषमज्वराने आजारी पडले. आजारामुळे आलेल्या अशक्तपणामुळे त्यांना पायी चालण्याचा त्रास होऊ लागला तेव्हा पायी चालण्याचा आग्रह सोडून मोटार वापरण्यास त्यांनी संमती दिली. ६ डिसेंबर १९६४ रोजी जमनालाल बजाजांनी स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाची सुवर्ण जयंतीसाठी राष्ट्रपती राधाकृष्णन वर्ध्यास आले असता त्यांनीही पवनारला येऊन विनोबांची भेट घेतली. त्यावेळी विनोबा राधाकृष्णनाला म्हणाले, "आजकाल माझे मौन आणि अश्रवण आहे अधिक भाषणापुढे प्राथमिक रुपात मौन आणि अश्रवण 'रपट पडे की हरगंगात' आहे. द. भारत हिंदी विरोध : फेब्रुवारी १९६५ ला दक्षिण भारतात हिंदी विरोधी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. हे आंदोलन म्हणजे केंद्र सरकारच्या हिंदीसंबंधी धोरणाच्या विरोधी रोष होता. १२ फेब्रुवारीपासून विनोबांनी उपोषण सुरू केले. दक्षिण भारतावर हिंदी लादणे वा उत्तर भारतावर इंग्रजी लादणे या दोन्ही गोष्टी विनोबांना मान्य नव्हत्या. विनोबांच्या मते दक्षिण भारतीयांनी राष्ट्रभाषेच्या स्वरूपात हिंदी शिकावी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी उत्तर भारतीयांना कोणत्याही एका दक्षिण भारतीय भाषेचा अभ्यास करावा.

तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा वर्ध्यास आले असता त्यांनी विनोबांना आश्वासन दिले की, “भारत सरकार दक्षिण भारतीयांच्या इच्छेविरुद्ध तेथे हिंदीचा आग्रह धरणार नाही." दक्षिण भारतीय नेत्यांनीही विनोबांनी कळविले की, हिंदी विरोधी आंदोलनामुळे आम्हालाही दुःख झाले असून राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचणारे कोणतेही कृत्य यापुढे केले जाणार नाही. त्यानंतर पाचव्या दिवशी विनोबांनी आपले उपोषण मागे घेतले.

प्रदेशदान: मे १९६५ मध्ये गोपुरी वर्धा येथे सर्व सेवा संघाच्या अधिवेशनात 'संपूर्ण बिहारात ग्रामदान घडवून आणण्यासाठी वादळी आंदोलन उभे करा' असा ठराव घेण्यात आला. बिहारच्या कार्यकर्त्यांनी या दृष्टीने सुरुवात केली. त्यांना मदत करण्यासाठी १९ मे १९६५ रोजी विनोबा बिहारला जायला निघाले. यावेळी त्यांचा प्रवास मोटारने होता. या आंदोलनाच्या वेळी जमशेदपूर येथे विनोबा आजारी पडले. तीन महिने त्यांनी जमशेदपूर येथेच मुक्काम केला. प्रकृतीस आराम पडताच विनोबा दरभंग्याकडे रवाना झाले. १९६६ च्या शेवटपर्यंत दरभंग्यातील बहुतेक गावाचे ग्रामदान झाले होते. बिहारात ग्रामदानाचे लक्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच बिहारात 'प्रदेशदान'ची कल्पना पुढे आली. राज्याचे दान कडून आल्यास ग्रामदानी संकल्पना अधिक मजबूत होऊन इतरासाठी तरी मार्गदर्शक ठरेल. अशी चर्चा होऊ लागली. २ ऑक्टो. १९६९ मध्ये म. गांधीच्या जन्मशताब्दी पर्यंत प्रदेशदान घडावे अशीही इच्छा विनोबांनी व्यक्त केली.

७ जून १९६६ रोजी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात राणीपतरा आश्रमात विनोबांनी सूक्ष्म कर्मयोगाची घोषणा केली. ५० वर्षांपूर्वी याच दिवशी विनोबा कोचरब आश्रम गांधीजीकडे पोहचले होते. विनोबा म्हणतात, "तेव्हापासूनची ५० वर्षे गांधीजींच्या • आश्रमात राहून त्यांच्या जीवनाचा त्यांच्या जीवनदर्शनाचा अंगीकार करीत. मी कार्य करीत होतो. आतापर्यंत केलेले कार्य गांधींना अर्पण करून मी मुक्त होण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे मी फक्त असेल, देशाला फक्त इतकेच कळेल की मी कोणत्या प्रदेशात पदयात्रेवर आहे. राज्याला फक्त की मी कोणत्या प्रदेशात पदयात्रेवर आहे. राज्याला फक्त याची माहिती राहील की मी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे. आणि जिल्ह्यातील संबंधीताना फक्त काहीदिवस आधी कळविले जाईल की मी जिल्ह्यातील कोणत्या गावी केव्हा येणार आहे. यापुढे लेखन, पत्रव्यवहार इ. कर्म थांबवून सहकाऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणेही थांबवणार आहे." सहकाऱ्यांनी आता सर्व निर्णय सर्व संमतीने घ्यावयाचे आहे. सहकाऱ्यांनी आता माझ्यावर मार्गदर्शनासाठी अवलंबून राहू नये."

पुढे विनोबा म्हणतात, "जरी मी सूक्ष्मात प्रवेश केला असला तरी दम, दान, दया याचा जो कार्य कर्मआहे त्याच्याशी हृदयाने जोडलेला राहीन. तूफान 'चाललेलेच होते. यापुढेही मी सहकाऱ्याशी आंतरिक अनुसंधान राखीन. भारतीय सर्व कार्यकर्त्यांचे मनात मी ध्यान करून त्यांचे नाव घेईन, त्यांची आठवण करीन, त्याच्या कार्याची दखल घेईन. यालाच आंतरिक अनुसंधान म्हणतात. यात फार मोठी शक्ती असते, त्यासाठी स्वतःला विसरून जावे लागते."

पुढील चार वर्षे विनोबा संपूर्ण बिहारात वादळी पदयात्रा करीत होते. दरभंगा येथील काम सर्वोदयी कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहावे यासाठीप्रयत्न चालू होता. दौऱ्यातच २२ सप्टेंबर १९६७ रोजी 'ख्रिस्त धर्मसार' हे पुस्तक लिहून पुन्हा सामान्य माणसाच्या मनात असणाऱ्या ख्रिस्ती धर्माविषयीचे गैरसमज दूर करण्यास मदत केली.

संगीती : ७ व ८ डिसेंबर १९६७ ला पुसा रोड येथे विद्वतजनाची परिषद बोलावण्यात आली. प्राचीन काळी बिहारमध्ये अशा सभा बोलावल्या जात. त्यांना 'संगीती' असे म्हणत. या संगीतीत विनोबांनी जाहीर केले की, . कार्यक्रमाने " शिक्षणात अहिंसक क्रांती घडून येईल. आचार्याच्या हातात संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याची शक्ती असायला हवी. न्यायाधिशाला सरकारकडून पगार मिळतो तरी न्यायविभाग सरकारच्या हाताखाली नाही. त्याच प्रमाणे शिक्षकाला जरी पगार जास्त असला तरी शिक्षकाला स्वतंत्र अस्तित्व असलेच पाहिजे. म्हणून शिक्षकाने सत्तेच्या राजकारणामागे न जाता स्वतःच्या शक्तीचा विकास करावा. कलुषीत राजकारणापासून मुक्त होऊन विश्वव्यापक अशा मानवतेच्या राजकारणाचा व लोकनीतीचा पुरस्कार करावा." अशाच वेळी शिक्षक देशाचे नेतृत्व करू शकतील.

या दृष्टीनेच ८ मार्च १९६८ रोजी विक्रमशीलेच्या जवळ भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव मुक्कामी 'आचार्यकुल' स्थापनेची घोषणा करण्यात आली. 'संगीती'च्या • वेळी असलेल्या विचाराचे फळ म्हणजे 'आचार्य कुल' होय. कारण संगीतीच्या वेळी बिहारचे शिक्षणमंत्री कर्पूरी ठाकूर यांनीच "बिहारच्या समस्या सोडवण्यासाठी.. जमले तर आपण वेळ द्याल का?" असा प्रश्न विनोबांना केला होता. त्यातूनच विनोबांचे आचार्य कुलाचा विचार पुढे आला. या शिक्षण तज्ज्ञाच्या परिषदेत विनोबा म्हणाले, “आजचे शिक्षण ही एक मोठी समस्या बनली आहे. याचे कारण शिक्षण राज्याच्या हातात गेले आहे. त्यामुळे जो अधिकार आपण शंकराचार्य, तुलसीदास यांना दिला नाही तो अधिकार एका शिक्षण संचालकाला मिळाला. तो फक्त पाठ्यपुस्तके तयार करील व राज्यभर चालवील. त्याचा अभ्यास न करणाऱ्यास नापास केले जाईल. तुलसीदासाने रामायण वाचायला सांगितले नाही.

लोक स्वेच्छेने रामायण वाचतात. पुस्तकाचे वाचन इच्छेने झाले पाहिजे तसे पाठ्यपुस्तकाचे होत नाही म्हणून शिक्षण शासनमुक्त हवे. " याच परिषदेत धर्म आणि राजकारणाऐवजी अध्यात्म व विज्ञान आले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनोबा म्हणतात, "ह्या आचार्यकुल परिषदेत काही ईश्वरी संकेत आढळतात ते म्हणजे परिवर्तन घडवून आणता येईल." यातून अहिंसक शेवटी आचार्य कुलाच्या स्थापने मागचा हेतू सांगत विनोबांनी म्हटले की, "आचार्य कुल ही संस्था कर्तव्यजागृती आणि प्रयत्नशीलता या गुणाच्या वाढीसाठी निर्माण होत आहे, यामुळे शिक्षकांचा गमावलेला दर्जा पूर्ववत त्यांना प्राप्त होईल. महाभारतातील धर्मराजाप्रमाणेच शिक्षकाचा धर्मरथ जमीनीपासून वर हवेतच चालला पाहिजे.. यासाठी निश्चयात्मक बुद्धीवर जोर दिला पाहिजे.

११ सप्टेंबर १९६८चा वाढदिवस विनोबांनी 'अभंगवते' लिहून साजरा केला. ५ ते ७ ऑक्टोबर १९६८ बोधगयेच्या संत संमेलनाच्यावेळी विनोबांनी आपला 'ऋग्वेदसार' हा ग्रंथ पूर्ण केला. ते म्हणतात, "५० वर्षे मी वेदाचा अभ्यास केला. साडेचार हजार मंत्रे तोंडपाठ केली त्यातील १३१९ मंत्र म्हणजेच 'ऋग्वेदसार' होय. ऋग्वेदातील १/८ मंत्र निवडून त्याची 'अष्टादशी' हा ग्रंथ जुलै ६९ साली प्रसिद्ध केला.

विनोबा-सरहदगांधी भेट: २० ते २५ ऑक्टोबर १९६९ गांधी जन्मशताब्दी वर्षाचे निमीत्य साधून राजगृह येथे सर्वोदय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात खान अब्दुल गफार खान बादशाहखान किंवा सरहद्द गांधी गुजराथमधील सांप्रदायीक संघर्षामुळे येऊ शकले नव्हते परंतु नोव्हेंबर १९६९ मध्ये गफारखानानी सेवाग्रामला भेट देण्याचे जाहीर करताच विनोबांनी सेवाग्रामला जाऊन त्यांचे स्वागत करण्याचे ठरवले. ऑक्टोबरच्या शेवटी विनोबा पवनारात पोहचले आणि मुख्य म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत विनोबा पवनारातच राहिले.

४ नोव्हेंबर १९६९ बादशाहखान व विनोबांची चिरस्मरणीय भेट घडून आली. २७ वर्षानंतर दोघांची भेट होत होती. सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी दोघांची देशातील हिंसेवर चर्चा झाली. यावेळी जयप्रकाश नारायण हेही हजर होते. याच वेळी विनोबांनी ए. बी. सी. महासंघाची (Confederation) संकल्पना स्पष्ट केली. अफगाणिस्तान, ब्रह्मदेश आणि सिलोन (ABC) या त्रिकोणात जितके देश येतील त्या सर्व देशाचा एक महासंघ बनवून त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट या सर्वांचा समावेश करावा. ज्यामुळे या प्रदेशातील समस्या सुटण्यास मदत होईल. दलाई लामाच्या भेटीच्या वेळी ए. बी. सी. त्रिकोण निर्मितीची जबाबदारी दलाईलामावर टाकावी व दलाई लामानी त्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले होते.

हिंदी भाषेची सेवा केल्याबद्दल म. गांधी पुरस्कार व सामाजिक सेवेचा रॅमन मॅगसिसे पुरस्कार विनोबांना जाहीर झाले. पायी चालणारा, दानात जमीन मिळवून जनतेला वाटणाऱ्या संताबद्दल परदेशात बरेच कुतुहल निर्माण झाले होते. ब्रिटनचे शांततावादी कार्यकर्ते डेव्हीड ग्रुम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनोबां बरोबर पदयात्रेत सामील होऊन प्रत्यक्ष कार्याची पद्धत पाहिली. "तुमचा जय जगत हा एक शब्द पुरे" असे ग्रुम यांनी विनोबांना सांगितले.


Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा