shabd-logo

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023

3 पाहिले 3

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपासनेपुरतें हजर रहावें असा विचार होता. पण थोडेसे बोलावें असें ऐकणारांचे मत पडल्यामुळे नाइलाजानें बोलत आहे. आणि तें हि माझ्या दृष्टीने खादीयात्रेत मुख्य वस्तु कोणती ह्यावर.

पुष्कळदां मनुष्याला वरवरचें अनुकरण करण्याची संवय लागते. आकाशांतील नक्षत्रे पाहून आपण देवळांत हंड्या झुंबरें लावतों. आकाशांतली नक्षत्रे आनंद देतात. पण इंडया झुंबरें घरांतली चांगली वरच अनुकरण हवा जाळतात. चार महिन्यांच्या पावसाळ्यानंतर धुऊन निघालेल्या आकाशांतील असंख्य तारा पाहून आपण दिवाळी सुरू केली. आम्ही लहानपणीं कोरांटीच्या फळांत खोबरेलाचे दिवे लावीत असूं. हल्लीं खेडयांतून सुद्धा मातीच्या तेलाचे भयानक धूर काढणारे दिवे लावण्यांत येतात. मोठ्या काँग्रेसचे अनुकरण म्हणून आम्ही सुरवातीला संगीत ठेवतों. तें समजत हि नाहीं. अमुक गेट म्हणून दरवाजे करतो. पण अनुकरण आंतून झालें पाहिजे, काँग्रेसच्या ठिकाण राष्ट्राचे वैभव दिसो. पण खादीयात्रेत राष्ट्राचे वैराग्य प्रगट झालें पाहिजे. हिमालयांतून निघालेली गंगा गंगोत्रीजवळ लहान वैभव आणि पण स्वच्छ आहे. प्रयागच्या गंगेत अनेक नद्या, नाले, मोऱ्या मिळून ती वैभवशाली झालेली आहे. दोन्ही ठिकाणीं एक च पवित्र गंगा. पण गंगोत्रीची गंगा जर प्रयागर्चे अनुकरण करूं लागेल, तर प्रयागची विशालता तर तिला येणार च नाहीं, पण ती अस्वच्छ होऊन बसेल. काँग्रेससारख्या मोठ्या परिषदात राष्ट्रांचे वैभव व सिद्धि प्रगट होतात. छोटया खादी-यात्रेत वैराग्य व शुद्धे दिसावयास पाहिजे. काँग्रेसचें वैभव केवढा हि प्रयत्न केला तरी खेड्यांत आपण आणूं शकणार नाहीं. तेथें खेड्यांतल्या लोकांचा कस आणि ताकद प्रगट झाली पाहिजे.

खादी यात्रेत आपण कशासाठी जमतो ? व्याख्यानें, खेळ, पोवाडे ह्यांसाठी जमत नाहीं. कोणा हि यात्रेकरूस विचारा. यात्रेच्या ठिकाणीं मुख्य वस्तु बाजार असतो, गमती असतात, दुसन्या हजार वस्तु देवता-दर्शन असतात. पण तो तेथें कां जातो ? तर देवतेच्या दर्शना- साठी. कोणी म्हणतात, दगडांत काय ठेवलें आहे हो ? पण यात्रेला जाणाऱ्या मनुष्यास तो दगड नसतो. उभरेडजवळच्या गांवच्या महाराचा मुलगा पंढरपूरला जातो. त्याला आंत प्रवेश हि मिळत नाहीं. पण देवतेचें दर्शन व्हावें म्हणून तो गेला. त्याला आपण वेडा म्हणू. पण त्याच्या दृष्टीने तो वेडा नसतो. त्याला विचारले, "इतक्या दूर पार्यो पार्थी धंदा टाकून कशाला जाऊन आलास ? " तो उत्तर देतो, "घरीं जरा वैताग आला. वाटलें देवाला भेटून येऊं ! " उलट आम्हांला पंढरपूरच्या देवाशी कांहीं कर्तव्य नसते. पण आम्ही तेथे यात्रेला जमणाऱ्या लोकांचा फायदा घेण्यासाठीं खादी ग्रामोद्योगाचें प्रदर्शन ठेवत. पण उद्देश सफल होत नाहीं. चांगल्या कां हेतूने होईना, पण जनता गांठायची असेल तर मी सरळ सरळ माझ्या मुद्दयावर तिला गांठीन. आम्हांला खादी ग्रामोद्योग ह्याचें स्वतंत्र मंदीर कां करतां येऊ नये ? दुसऱ्या यात्रांचा फायदा कशासाठीं घ्यावा लागतो ? 

खादी यात्रेत खादी ग्रामोद्योग आणि अहिंसा ह्यांविषय प्रेम राख- गारे आपण कशासाठीं जमतों ? कोणाला माझ्याप्रमाणे दोन दिवस राहण्यास फुरसत नसते, त्यांनी कोणच्या मुख्य वस्तूसाठ येथे यावयाचें ? तर सर्वांनी मिळून एकत्र सूत कातण्या- ही देवता

परिश्रम

साठीं परिश्रम ही आमची देवता आहे तिच्या दर्शना- साठी. गांधीसेवासंघाच्या सभेला मी बहुतेक जात नाहीं, पण मनातून जाण्याची इच्छा होते, ती एकाच कारणासाठीं कीं तेथें सामुदायिक शरीरपरिभ्रमाचा कार्यक्रम चालतो. खादी-यात्रेत ही गादी कशाला १ खादी आणि गादीचा तर लढा आहे. त्यांत गादी जिंकणार असेल तर खादी आपण सोडून देऊं. अशक्त आणि म्हातारे ह्याच्यासाठी गादी राहो बिचारी. येथें जमीन स्वच्छ सारवून आपला मुख्य कार्यक्रम झाला पाहिजे. दुसरे च कार्यक्रम मुख्य व्हावयाला लागले तर एखादा शेतकरी घरी यावा, सुंदर रांगोळी घातलेले ताट मांडलें असावें, ताटांत चटण्या कोशिंबिरीचे ढग असावे. पण भाकरी मात्र २ तोळे असावी तसा प्रकार व्हावयाचा. तो शेतकरी म्हणेल माझी काय चेष्टा केली ? आम्ही मजुरीच्या कामासाठीं येथें येतो. आमच्या खेड्यांतल्या लोकांची चेष्टा करतां काय ?

दुसरे लोक आम्हांला म्हणतात, काय तुमचा धर्म ? श्रीकृष्णाच्या नांवाचा लोक जयजयकार करतात. पण शेंकडा ९० लोकांना गीता सुद्धा माहीत नाहीं. मला ही तितकी दुःखाची गोष्ट वाटत नाहीं.

श्रीकृष्ण- प्रतिनिधि गोपाळकृष्णाचें नांव सर्वांना परिचित आहे कीं नाहीं, त्याचें जीवन सर्वोना माहीत आहे की नाहीं ? कृष्णाचे - महत्त्व त्यानें गीता सांगितली म्हणून नाहीं. कृष्णाच्या जीवनावर तें अवलं बून आहे. द्वारकेचा राणा झाल्यानंतर सुद्धां श्रीकृष्ण सर्व कामें संभाळून 1. मधून मधून गवळ्यांत येऊन राही. गाई चारी, शेण काढी. ह्या कामाचा - त्याला इतका जिन्हाळा वाटत होता, म्हणून लोकांना हि त्याचा जिव्हाळ अजून वाटतो, व त्याचें स्मरण चाललें आहे. भगवान् श्रीकृष्ण मजुरांच . प्रतिनिधि म्हणून जें करीत होता, तें आपणांस मुख्यतः करावयाचें आहे 'बाकी काय करावयाचें तें करा. पण त्यांत अनुकरणाचे नाटक नको.

गांधीजी अगर्दी टेकीला आले आहेत. अहिंसेच्या बळावर आपण येथ- पर्यंत येऊन पोचलो. पण आतां आमच्या सरकारला हिंदूमुसलमान-दंग्यांत वीरांची अहिंसा पोलीस आणि मिलिटरी बोलवावी लागतात. अहिंसेच्या बळावर दंगा मिटवितां येत नाहींत हा एकप्रकारें अहिंसेचा पराजयच आहे. दुर्बळांची अहिंसा काय करूं शकणार ? कोणी म्हणतात, दिवाणांचा काय दोष ? मी म्हणतों काडीचा हि दोष नाहीं. पण आम्हीं आज दिवाण होऊन जर इंग्रज लष्कराचे आवाहन करायचे तर मागें इतिहासांत हेंच करून आम्हीं इंग्रजांचें राज्य इथें कायम केलें आहे. तोच उद्योग पुन्हां कशाला? गांधींचे देशभक्त अनुयायी आपले लष्कर बोलावतात ह्याचा इंग्रजांना केवढा आनंद वाटून राहिला असेल ! लष्कराशिवाय जर तुमचें चालत नसेल तर तुमचें लष्कर उभारा. हल्ली लष्करांत अगदीं गाळीव तामस लोक दाखल करतात. तसें तरी तुम्ही करणार नाहीं. देश- स्थिति जाणणारे चांगले लोक तुम्ही लष्करांत घ्याल.

गांधीजींनीं आपल्या दोन लेखांत ही गोष्ट स्पष्ट केली आहे की ह्यापुढे आपल्याला वीरांची आहिंसा पाहिजे. दुबळयांची नको. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे 'जे वेळीं लोह मांसातें घाटे ' त्या वेळीं वीराची परीक्षा होते. अहिंसेचें नांव घेऊं आणि मरायला तयार होणार नाहीं, तर अगद शेवटच्या प्रसंगी आपण भित्रे आहोंत असें आपणांस दिसून येईल.

काँग्रेसचे ३१ लाख सभासद झाले. पण संख्येला काय करायचे 'आहे ? रोज १ वेळ जेवणाराला काँग्रेसचा सभासद करून घेतलें तर ३५ कोटी सभासद होतील. दोन वेळ म्हटले तर मात्र ४१५ कोटी तरी कमी करावे लागतील ? शिंद्यांजवळ साठ हजार लष्कर, होळकरां जवळ चाळीस 'हजार. पण वेलस्लीनें आपल्या पांच हजराने त्यांचा धुव्वा उडवला. वेलस्ली आला त्या वेळी शिंद्यांचे दहा हजार परसाकडे गेले होते. तर दहा हजार निजून होते. आणि दहा हजार डोळे चोळीत होते. अशा बाजारबुणग्यांनी काय होणार ? अहिंसेनें जेथें लढावयाचे आहे, तेथें तर बाजारबुणगे मुळींच चालणार नाहींत. वडाच्या झाडाखालीं जमलले लोक त्याच्या छायेचा फायदा घेतील. पण त्याच्या कोणी उपयोगी पडणार नाहींत. दिवाणगिय घेण्याने काय फायदा झालेला असेल तो असो. पण एक अत्यंत वाईट गोष्ट झालेली दिसते. लोकांची स्वावलंबनाची उमेद कमी झाल्यासारखी दिसते. जनतेची स्वावलंबनाची उमेद कमी होणे, प्रत्येक बाब - तीत सरकारच्या मदतीची आणि रक्षणाची अपेक्षा राहणे, म्हणजे अहिंसेचा आधार च तुटला. मग लष्कराचा आणि हिंसेचा च मार्ग ठरला. पण आम्हांला हिंसेचा च मार्ग पतकरायचा असता तर गेलीं अठरा वर्षे आम्ही आमच्या उत्तमांतल्या उत्तम लोकांना अहिंसेचें शिक्षण देण्याचा मूर्खपणा कशाला केला असता ? क्या तरुणांना जर्मनी - इटलीप्रमाणे उत्तम लष्करी शिक्षण दिलें नसतें काय ? म्हणून गांधी सांगतात-मार्ग शूराचा म्हणून पटत असेल तर घ्या, नाहींतर सोडून द्या.

'पवनारला मजुरांबरोबर मी बसतो, बोलतों. मी मजुरांना सुचविलें, तुमची सर्वांची मजुरी एकत्र करून सारखी वांटून घ्या. तुम्हांला आश्चर्य वाटेल. पण मजूर म्हणाले, 'कांही हरकत नाहीं.' पण
गरिबांच्या हा ठराव अमलांत कसा यायचा ? मी अलग राहून ?

हातांत सत्ता मी त्यांच्यांत दाखल होईन तेव्हां त्यांच्या-माझ्यासकट तो अमलांत येईल. तुमच्या लाख चळवळी सोडून ह्या खऱ्या - राजकारणाकडे तुमचें लक्ष पाहिजे. मजुरांच्या मजुरीची ताकद प्रगट झाली पाहिजे. तुम्हांला गरिबांच्या हातांत सत्ता पाहिजे ना ? मग त्यांचे हात वापरले गेले पाहिजेत. लहानपणीं आम्हीं श्लोक म्हणत असूं "कराग्रे वसते लक्ष्मीः” बोटांच्या अग्रभागी लक्ष्मी राहते. मग हीं चोटें चांगलीं वापरली जावयास नकोत ? त्यांच्यांत उत्तम कलाकौशल्य यायला नको ? आम्ही विदेशी-वस्त्र- बहिष्कार कमिटी काढतों. तिच्या कचेरीत हजार वस्तु असतात. पण चरखा- पिंजण नसतें. गांधीसेवासंघांत महिन्याला हजार वार कांतण्याचा नियम आहे. पण तो हि नीट पाळला जात नाहीं, अशी तक्रार आहे. स्वराज्य मिळविण्याचे हे ढंग नव्हेत. तुमचे स्वराज्य स्वप्नांतलें स्वराज्य आहे.. आम्ही मजुरांबरोबर परिश्रम करण्यास तयार होत नाहीं तोंपर्यंत त्यांचा-आमचा गोपाळ-काला कसा होईल ? त्यांच्यासारखे बनेपर्यंत आमच्या अहिंसेची शक्ति प्रगट होणार नाहीं. कांतण्याच्या मजुरीचे दर वाढविण्यांत येणार आहेत, त्याबद्दल कांह मंडळींची तक्रार आहे. मजुरीचे दर पाहिजे तर वाढवा. पण खादी स्वस्त कांतण्याचे भाव राहू द्या, असें कांहीं लोक म्हणतात. ह्या पुढे अर्थ- शास्त्रज्ञांनी काय रडावें ? कांतण्याचे भाव वाढवून खादी स्वस्त कशी करायची ? ह्याचा हि मेळ घालतां येईल. पण यंत्रे, तोफा, विमानें ह्यांचें साहाय्य घ्यावें लागेल. शहरचे लोक म्हणतील खादी स्वस्त रहावी तर म्हणोत. पण खेड्यातली मंडळी तेंच म्हणतात हें आश्चर्य आहे.. कांतण्याच्या जुन्या दरांत हि मजुरांना जगायची सोय आहे असें तुम्ही म्हणतां. पण नुसतें जगलें म्हणजे झाले का ? इंग्रज सुद्धां मनापासून इच्छितात कीं आम्ही हिंदुस्थानच्या लोकांनीं जगावें आणि जन्मभर त्यांची मजुरी करावी !

खादीकामाचा व्यवस्थापक ३०रु पगार घेत असला तर त्यागी समजला जातो. तें योग्यच आहे. पण त्याच्या हाताखाली काम करणाराला मजुरी दीड आणा ! कामानिमित्त किंवा आजारानिमित्त. सुट्टया नाहींत. मजुरी न घेतां वाटेल तितक्या सुट्टया व्यवस्थापक मजूर आणि घेण्याची मात्र सोय आहे. ह्या मजुरांना खादी यात्रेत यावयाचे तर आपले रोजचें उत्पन्न बुडवून यावें लागतें आणि शिवाय येथचा खर्च द्यावा लागतो. ही तुलना कडू आहे. पण कडूगोडाचा प्रश्न नाहीं. सत्यदर्शनाचा प्रश्न आहे.

कांहीं मंडळी म्हणतात, समाजवादी लोकांनी मजुरांना बगलेंत मारलें आहे. म्हणून आम्ही आतां मजुरांत मिसळले पाहिजे. बाबांनो ! समाज- वाद्यांच्या स्पर्धेनें कशाला, मजुराच्या प्रेमाने च मजुरांत मिसळा. पण तुम्ही मजुरांत कोणत्या पद्धतीने मिसळणार ? अहिंसक पद्धतीनें त्यांच्यांत मिसळायचें तर व्यवस्थापक आणि मजूर ह्यांच्यातील अंतर कमी करीत गेलें पाहिजें, व्यवस्थापकांनी मजुरांसारखे व्हावयास पाहीजे. आणि मजूरांची मजूरी वाढ- विली पाहिजे. मजुरांची मजूरी वाढवून तुम्ही त्यांचा एक खास वर्ग बनबाल' असा आक्षेप घेण्यांत येतो. पण देशाची सेवा करणाऱ्या देशसेवकाचा खास वर्ग मी निर्माण करत असा च माझ्यावर आक्षेप कां घेत नाहीं, १ मजुरीचे दर वाढविल्याखेरीज ते आणि मी एकरूप कसे होणार ? त्यांचा आणि माझा गोपाळ-काला कसा होणार १

किशोरलालभाईचा आग्रह होता की नईतालीमच्या प्राथमिक शिक्षकांना कमीत कमी २५ रुपये पगार मिळाला पाहिजे. आमच्या पवनारला श्रमाची प्रतिष्ठा मास्तरला १६ रुपये च पगार मिळतो, पण त्याचा मजुरांना हेवा वाटतो. तीन वर्षापूर्वी माझा जीव उडून गेला होता, तो कांतण्याचे भाव थोडे वाढल्यामुळे ह्या देहांत येऊन बसला. दहा दहा घंटे कांतून जेमतेम ४ आणे मिळायचे आणि माझा खर्च कर्मीत कमी ६ आणे. मी मजुरांत कसा मिसळणार ?

सध्या श्रमाला नुसत्या वाङ्मयांत प्रतिष्ठा आहे. तिचा उपयोग नाहीं- श्रमाला जास्त मनुरी देणें म्हणजे च त्याची खरी प्रतिष्ठा वाढविणे आहे. ह्याचा आरंभ तुम्ही आम्ही सर्वानी मिळून करावयाचा आहे.
इतके खादीधारी लोक येथे येतात. पण सर्वांजवळ तकल्या किंवा चरखे नसतात. येथे मंडळींना तकल्या द्याव्या लागतात. खादी यात्रेत येणाराने तकल्या विसरून येणे म्हणजे हजामतीला येतांना हजामानें वस्त्रा विसरून येण्यासारखेंच आहे. तेव्हां मंडळींनीं येथें यावयाचें तर आपल्या शस्त्रास्त्रांनीं सिद्ध होऊन आले पाहिजे. आपण येथे मौजा करण्यासाठीं जमत नाहीं. आपल्या खादीयात्रेत वैरागाचें वैभव व परिश्रमनिष्ठा प्रगट झाली पाहिजे.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा