आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे लोक जड आहेत. जूड संपत्ति वागवीत असल्यामुळें जड झालेले आहेत. मराठे लोक हे आधीच राजकारणासंबंधीं जागरूक 'आहेत. काँग्रेसच्या सत्तेमुळे ते जास्त जागृत झालेले दिसत आहेत.
मी आज खेडेगांवच्या जागृतिसंबंधानें दोन गोष्टी सांगणार आहे. -सध्यां किसानसभा वगैरे स्थापून शेतकऱ्यांची संघटना केली जात आहे. लोक विचारतात, किसानसभा होत आहेत हे पाहून तुम्हांला काय वाटतें ? मी म्हणतों, किसानसभा होत आहेत ह्याबद्दल आनंद न वाटण्याइतका मी का जड आहे ? किसानसभा झाल्या पाहिजेत, खेडोपाडी झाल्या पाहिजेत. पण ह्या बाबतीत मंडप सजविण्यासाठी लावलेल्या ह्या डाळ्यापासून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ह्या डाळ्या आज सुंदर दिसत आहेत. उद्यां ह्यांची काय दशा होईल ? झाडाची फांदी झाडाला चिकटून असली तर तिला पोषण मिळतें. ती अलग झाली तर सुकून जाते. आणि झाडाचे हि नुकसान करते. पन्नास वर्षापूर्वी लावलेल्या ज्या झाडाच्या छायेखाली ही सभा भरली आहे, त्या झाडाला सोडून किसानसभा अलग होतील तर त्यांचें हि नुकसान होईल; काँग्रेसचे हि नुकसान होईल. म्हणून किसानांच्या सर्व संघटना काँग्रेसला धरून झाल्या पाहिजेत, काँग्रेसला धरून म्हणजे आपल्या नावांत नुसता काँग्रेस शब्द घातला असे नको. हल्ली 'स्वराज्य' शब्दाला महत्त्व आहे. सेलसुरा येथे ता. १३-१-३८ रोजी वर्धा जिल्हा शेतकरीपरिषदेमध्ये झालेले भाषण.
म्हणून निरनिराळ्या संस्था 'वर्णाश्रम-स्वराज्य संघ ' सारखीं नांवें घेतात.. त्याप्रमाणे नको. काँग्रेसला धरून ह्याचा अर्थ काँग्रेसचें बळ आपल्या चळ-- वळीनें वाढवावयाचें आहे, ही वृत्ति, दृष्टि पाहिजे,
काँग्रेसच्या हाती सत्ता आली आहे ह्याचा अर्थ काय आहे ? दह्यांतील लोणी काढून घेतलेले आहे आणि ताकाचा चवथा हिस्सा आपणासाठीं ठेवलेला आहे. ह्या चार आणे ताकाची वांटणी ११ प्रांतांत झालेली आहे.. त्यापैकी आपली सत्ता असलेले प्रांत ७ आहेत म्हणून २॥ आगे ताक आपल्या पदरांत पडलें आहे. तुम्ही म्हणाल, मग ही स्थिति का स्वीकारली ? तर पाचर ठोकण्यासाठी. हिंदुस्थानच्या थोर पुरुषांनी ठरविलें कीं ब्रिटिश सत्तेच्या तुळईला ही जी थोडी फट पडली आहे तिच्यांत पाचर ठोका. पाचर ठोकण्यास गेले तर तेंच तुटून जाईल असा संशय असता तर ही स्थिति कधीं हि स्वीकारली नसती. आपलें पाचर पोलादी आहे, अशी खात्री आहे. पण नुसतें पाचर लावून चालत नाहीं. वर घणाचे घाव मारावे लागतात. आमच्या चळवळी हे घणांचे घाव आहेत.
ह्यासाठी आपण आपल्या चळवळी फार कुशलतेनें केल्या पाहिजेत. ज्याना आपण मतें देऊन पाठविले त्यांना आपल्या कामामुळे मदत होईल अशी काळजी घेतली पाहिजे. मागण्या अशा व अशा पद्धतीने मागितल्या पाहिजेत की आपल्या प्रतिनिधींना झोप घेण्याची तर सोय राहूं नये, पण त्यांचे बळ हि कमी होऊं नये.
मी हि रागीट माणूस आहे. रागीट आणि कळकळीच्या माणसाचे तोंड बहुधा खवळते. ह्याचा मला अनुभव आहे. तुकारामाचें असें च झाले होते. 'तुका म्हणे माझें खवळलें तोंड ' असें म्हणून त्यांनी देवाला खूप शिव्या दिल्या होत्या. किसानसभावाल्यांनी कमी जोराने बोलावें असें मी म्हणत नाहीं. पण तुकारामाप्रमाणे त्यांचा जोर प्रेमाचा असावा. म्हणजे त्यांचा जोर है त्यांच्या प्रेमाचे लक्षण असावें, प्रेम न ठेवतां जोर दाखविण्यानें ज्यांच्याशी आम्हांला एकजुटीनें झगडावयाचे आहे ते सुरक्षित राहतील व ज्यांना आम्हीं मर्ते देऊन पाठविलें त्यांच्याशी आम्ही भांडत बसूं. कळकळ पुष्कळ आहे, पण बुद्धि गेली तर सर्व गेलें. बोलण्यांत विवेक सुटता कामा नये. पुराव्यानिशीं आंकडे मांडून बोललें पाहिजे. स्वराज्याचा लाडू खरा. पण तो मेथीचा लाडू आहे. जबाबदारीचा कडूपणा त्यांत आहे. आम्हांला स्वराज्य कां पाहिजे ? तर अडचणी आल्या म्हणजे त्यांतून मार्ग कसा काढावयाचा ह्या बाबतींत आमची बुद्धि चालावी म्हणून. सध्यां आम्हांला कांहीं करावें लागत नाहीं त्यामुळे आम्ही जड झालो आहोत. उद्यां इंग्रजांनी आपले लष्कर काढून घेतले तर कदाचित् आम्हांला जड जाईल. पण तरी तें आम्हांला हवें. कारण त्यानें आमच्या बुद्धीला वाव मिळेल. आम्हांला सध्यांचा गुरगुट्या भात नको, कणखर भाकर पाहिजे. बुद्धिमत्तेचीं क्षेत्रे जीं आम्हांला अजीबात बंद होतीं तीं आतां किंचित् खुलीं झालीं आहेत इतकें च. म्हणून स्वराज्याच्या जबाबदारीची जाणीव राखून किसानांनी आपल्या चळवळी अभ्यासपूर्वक व आपल्या तोंडून निघणान्या शब्दांचा तोल संभाळून केल्या पाहिजेत. ब्रह्म वाक्याप्रमाणें किसान वाक्य ही म्हण झाली पाहिजे. किसानाच्या तोंडून निघणारे वाक्य बेजबाबदार किंवा असत्य असणार च नाहीं अशी सर्वांची खात्री झाली पाहिजे. सरकारचा हात आज कमी मजबूत नाहीं. चांगला मजबूत आहे. पण तो धरण्याची हिंमत आज आम्ही लोकांच्या बळावर केली आहे. म्हणून लोकांच्या चळवळी आवेशपूर्ण, उत्साहवर्धक पण प्रेमयुक्त आणि विवेक व सत्य ह्यांना धरून, आपल्या प्रतिनिधींचें बळ वाढविण्याच्या दृष्टीने, झाल्या पाहिजेत.
म पूर्वी सांगितलेली गोष्ट लक्षांत ठेवा. मुळाला लागून फांदी पाहिजे. नसल्यास दोघांचे हि नुकसान आहे. सर्व शेतकन्यांनी आणी इतरांन काँग्रेसचे सभासद झाले पाहिजे, चार आणे वर्गणी जास्त आहे अशी तक्रार करूं नका. एक वर्ष चार आणे द्या. पुढे बहुमत करून वाटल्यास वर्गणी कमी करून घ्या. सभासदांची संख्या वीसपट वाढली तर वर्गणी कमी होण्यास काय अडचण आहे ? पण किसान काँग्रेसचे सभासद होणार नाहींत तर त्यांच्या चळवळी सुकून जातील. बाबासाहेब मला म्हणाले, आज तुम्हांला समेत बसण्याची चांगली शिक्षा मिळाली आहे. ते बोलले निराळ्या अर्थानें, पण मी शिक्षा ह्या शब्दाचा कार्यकत्यांची आणि त्यांच्या कार्याची हानि झालेली दिसते. उद्योगाशी नित्या परिचय न राहिल्यामुळे ज्ञान मागासुतें, मग जुन्या ज्ञानावर च काम. भागवतात, हें बरें नाहीं. ह्यासाठी ग्रामसेवकानें प्रतिदिन कांहीं वेळ- माझ्या मर्ते शक्य तर अर्धा दिवस-उद्योगाला दिला पाहिजे. ग्रामसेवेचें तें अंग च समजलें पाहिजे
खेड्यांत जाल, पण तेथें जमीन टणक राहील. येथें संस्थेत तुमच्या साठी सर्व सोई हजर आहेत. खेड्यांत सर्व गैरसोई असतील, पाचर तुटली, वाढ्याचें काम येत नाहीं, वाढी ( सुतार ) मिळत नाहीं. घाणा अडकून पडला. त्यामुळे खचून जातां कामा नये. धीर धरला पाहिजे. धीराचें काम आणि बारीकसारीक गोष्टींचें पूर्ण ज्ञान करून घेतलें पाहिजे. मोठ्या गोष्टीइतके च लहान गोष्टींना महत्त्व दिले '
लहान गोष्टींचे
महत्त्व
पाहिजे. किंबहुना, लहान गोष्टींना च अधिक महत्त्व दिले पाहिजे. मोठ्या गोष्टी सहसा कोणी विसरणार नाहीं. कारण, त्या मोठ्या च. म्हणून लहान वाटणाऱ्या गोष्टीकडे च अधिक लक्ष पुरवायला पाहिजे. नाहीं तर त्यांच्या ज्ञानाच्या अभावी गार्डे अडकून पडायचे. विणकामांत चांगला तयार होऊन एकजण खेड्यांत माग घालून बसला. पण त्याला विणर्णे जरी उत्तम येत होते, तरी माग कसा बसवावा, हैं नीट अवगत नव्हते. त्यामुळे त्याच्या मागावर कपडा, यावा तसा येई ना. जो म्हणून त्या मागावर विणी त्याचे कापड बिघडावयाचे. हा परिणाम- कशाचा ? माग कसा बसवावा, ही बाब क्षुल्लक म्हणून दुर्लक्षिली त्याचा.
खरी प्रमाणपत्रे
मला सांगायचें तें मी थोडक्यांत सांगितले. तुम्हांला आज इथे संस्थेकडून प्रमाणपत्रे तर मिळाली. पण खरी प्रमाणपत्रे जनतेकडून च मिळावयाची आहेत. आणि तीं आपल्या खऱ्या सेवेच्या गुणामुळे च तुम्हांला मिळतील. शेवटी मी इतकी च. आशा करतो, की खेड्यांत जाऊन आणि जनतेची उत्तम. सेवा करून त्या वास्तविक प्रमाणपत्रांचे तुम्ही अधिकारी व्हाल. मिळण्याची सोय आहे. असें कांहीं आपण करूं, तर आपण चळवळी केल्या. नाहीतर आपल्या चळवळी ह्या वळवळी च. प्रत्येक खेडेगांव हैं एक राष्ट्र समजून तेथली संपत्ति कशी वाढेल, ह्याचा सामुदायिक दृष्टीनें विचार झाला पाहिजे. गांवच्या आवक-जावकीवर गांवची चौकी पाहिजे. हैं आपण केले तर आजच्या सरकारला बळ दिलें, नाहीं तर आपल्या चळवळीं- चा कांहीं उपयोग नाहीं.