shabd-logo

वर्धा आश्रमात

27 June 2023

10 पाहिले 10

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला गेले काही दिवस त्यांनी आईची सेवा केली. विनोबाला पाहून आईला समाधान वाटले. परंतु २४ ऑक्टोबर १९१८ रोजी विनोबांच्या आई रुक्मिणीदेवी देवाघरी गेल्या. पारंपारिक पद्धतीने आईची अंतिम क्रिया ब्राह्मणांच्या हातून करायची नाही, हा विनोबांचा हट्ट कुटुंबियांना मान्य नव्हता. त्यावर बरीच वादावादी झाली. शेवटी विनोबांनी अंतिम क्रियेसाठी स्मशानात न जाता घरी बसूनच गीता पाठ केला. 'आई मला श्रुतीमाऊलीच्या ओटीत टाकून गेली.' या भावनेने वेदपाठ सुरू केले. तत्त्वासाठी आईच्या अंतिमक्रियेसाठी स्मशानात न जाणारा कठोर वेदांती सत्याग्रह आश्रमात परतताना आईच्या दोन वस्तू घेऊन परतला. एक आईचे लुगडे आणि दुसरी अन्नपूर्णादेवीची पितळी मूर्ति, या मूर्तीची पूजा आई दररोज करीत असे. आईचे लुगडे विनोबा अनेक दिवस उशाखाली घेऊन झोपत. परंतु जेव्हा आश्रमात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खादीचा विकास होऊ लागला तेव्हा त्यांनी आईचे कापड गिरणीतले लुगडे चूपचाप साबरमतीला अर्पण केले, आणि अन्नपूर्णेची मूर्ती विनोबांनी प्रयुदासा गांधीची आई काशीबा यांनी दिली आणि सांगितले, या मूर्तिची दररोज सूर्यप्रकाशात पूजा केली पाहिजे. प्रथदासांनी विनोबाचे शिष्यत्व मान्य केले असल्यामुळे विनोबाची अट मान्य करीत मूर्ति स्वीकारली. शेवटपर्यंत काशीबांनी ती मूर्ति सांभाळली. आजही ती मुर्ती प्रयुदास गांधींकडेच आहे.

१९२०च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात जमनालाल बजाज बापूंच्या संपर्कात आले. जमनालाल साबरमतीला अधूनमधून भेटी देत. बापूंनी त्यांना आपला पाचवा मुलगा म्हणून मानले होते. जमनालाल यांची इच्छा होती की साबरमती आश्रमासारखा आश्रम वर्धा येथेही असावा, आणि बापूंनी तेथे आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेश वास्तव्य करावे. गांधींनी जमनालालजींना अडचण सांगितली, 'मी गुजराथी असून गुजराथेतच अधिक सेवा कार्य करू शकतो. तरीपण जमनालालजींनी आग्रह कायम ठेवला. शेवटी गांधीजींनी सत्याग्रह आश्रम- साबरमतीचे ज्येष्ठ आश्रमवासी रमणीकलाल मोदी यांना वर्धा येथे आश्रमाची शाखा सुरू करण्यासाठी पाठवले. त्यांना वर्धा येथील पाणी, हवामान मानवले नाही. तेव्हा विनोबांनी वर्धा येथे जाऊन आश्रमाची शाखा सुरू करावी असा आग्रह जमनालालनी धरला. पण मगनलाल विनोबांना सोडण्यास तयार नव्हते. त्यापेक्षा वर्धा आश्रम बंद करावा असे मगनलाल गांधींनी सुचविले. पण एकदा एखादी सुरू केलेली संस्था सहसा बंद करू नये' असे गांधीनी सुचवले आणि जमनालाल यांची बापूंनी मागणी मान्य केली. विनोबांनीही आपल्या सहकाऱ्यासोबत वर्धा येथे जाण्यास मान्यता दिली.

६ एप्रिल १९२१ रोजी विनोबा आपले सहकारी रघुनाथ श्रीधर धोत्रे, द्वारकानाथ हरकारे, आणि वल्लभस्वामी त्यांचे बंधू भास्कर केशो गांधी, कृष्णदास गांधी इत्यादी निवडक विद्यार्थ्यासह साबरमती आश्रमातून वर्ध्याला रवाना झाले व ८ एप्रिल १९२१ रोजी वर्ध्याला पोहोचले. विनोबासह सर्वांनी वर्ध्यात जमनालालजींच्या बागेत मगनवाडी येथे कामाला सुरुवात केली. या बागेत गावातील लोक प्रातर्विधी आणि स्नानासाठी येत म्हणून जागा बदलण्याची सूचना विनोबांनी जमनालालजी यांना सुचवले. जमनालालजी यांनी लगेचच आपला बंगला आणि त्या भोवतालची आठ एकर जागा आश्रमासाठी दिली. ही बजाजवाडीची जागाही शहरालगतच होती. शेवटी जुलै १९२१ मध्ये विनोबांनी या आश्रमाचे स्थलांतर गावापासून दूर एकांतात घासवंगला येथे केले. कालांतराने बाबा मोघे, गोपाळराव काळे, वाळुजकर वर्धा येथे हजर झाले. विनोबांचे बंधू बाळोबांनी अध्ययनाच्या निमीत्याने वर्ध्याला हजर झाले. तेथे साफ आणि विंचवाची भीती होती. विनोबांनी विद्यार्थ्यांना साप विंचू पकडणे शिकवले आणि सुचवले की यांना मारून टाकण्याऐवजी लांब नेऊन सोडावे.

जमनालालजींना घास बंगला आश्रमासाठी योग्य वाटला नाही. म्हणून त्यांनी घास बंगल्यापासून एक मैलाचा अंतरावर दुसऱ्या जागेत नवीइमारत बांधून तेथे आश्रमाची व्यवस्था करण्याचे ठरवले. बांधकामाची जबाबदारी द्वारकानाथ हरकारे आणि गोपाळराव काळे यांचेकडे सोपवण्यात आली. १९२४ साली वर्धा आश्रम नव्या जागेत सुरू झाला. १९३२च्या शेवटी विनोबा कैदेतून सुटल्यानंतर वर्ध्यास कॉटन मार्केटजवळ व नंतर नागपूर रोडवरील तनालवाडी या ठिकाणी राहू लागले. नालवाडी ही अधिकांश दलित वस्ती होती.. वर्धा आश्रम कार्यपद्धती विनोबांनी वर्धा आश्रमाची कार्यपद्धती साबरमती आश्रमाच्या धर्तीवरच केली. त्याचबरोबर विनोबांनी आपल्या काही विचाराची भर घालून वर्धा आश्रमात नवनवे प्रयोग सुरू केले. वर्धा आश्रमातील जिवनपद्धती साबरमती आश्रमातील जीवनपद्धतीपेक्षा अधिक कठोर आणि अनुशासनबद्ध केले. आश्रमातील जीवन अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याकडे विनोबांचा कल होता. त्यासाठी त्यांनी नियम केला. प्रत्येक आश्रमवासी जितके शारीरिक श्रमाची कमाई करील त्यातच त्याने आपला उदरनिर्वाह करावा. अनेक 'वर्ष रात्रीचे जेवण दुपारच्या कामाच्या हिशोबानंतरच तयार केले जाई. जितका कामाचा मोबदला तेवढेच जेवण तयार केले जाई. आठ तास सूत कताईची मजुरी तीन आणे, विणकामाचा दीड रुपया, शेतकामाचे आठ आणे अशाप्रकारे कामाचे दर ठरवलेले होते, मजुरीचे दर कमी अधिक असले तरी जेवण मात्र सर्वांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मिळे. कामाचे उत्पन्न आणि जेवणाचा खर्च यांचा मेळ घातला जाई. कमी काम झाले की अर्धपोटी राहावे लागे. विनोबा आश्रमातील जेवणाच्या वेळी स्वतः वाढण्याचे काम करीत. वल्लभस्वामीचा धाकटा भाऊ भास्कर कधीकधी तक्रार करी इतरापेक्षा माझ्या कामाचे मूल्य कितीतरी अधिक असताना मात्र पोटभर जेवण मिळत नाही, तेव्हा सौम्यस्वरात विनोबा समजावत, " आश्रमातील आपले जीवन सहयोगी जीवन असून प्रत्येकाने आपली पात्रता आणि शक्तीनुसार काम करावे आणि सर्वांचे मिळून आपल्या वाट्याला येईल त्यातच समाधान मानावे हीच आश्रम जीवनाची पद्धती असते. "

साबरमती आश्रमाप्रमाणेच वर्धा येथे विनोबा संस्कृत शिक्षणासाठी संस्था पद्धतीचा अवलंब करीत. वर्गात दोन तीन विद्यार्थी असले तरी विनोबा मोठ्या आवाजाने शिकवीत. त्यांच्या मोठ्या बोलण्याने कधी कधी विद्यार्थी घाबरून जात, पण विनोबांच्या आंतरीक प्रेमामुळे विद्यार्थी पुन्हा त्यांच्याजवळ येत. विद्यार्थी शिक्षकांचा संबंध हा अध्यात्मिक संबंध असतो. वल्लभ हा त्यांचाच शिष्य जो पुढे वल्लभस्वामी बनला. कृष्णदास गांधी, सुतकताई आदी क्षेत्रातील नामवंत गणले जातात तर राधाकृष्ण बजाज हेही विनोबाचे शिष्य, ज्यांनी गोसेवा, खादी इत्यादी क्षेत्रात आपले जीवन घालवले. दुसरे शिष्य मनोहर दिवाण यांनी धोका पत्करून आयुष्यभर कुष्टरोग्यांची सेवा केली. अशी अनेक नावे देता येतील ज्यांनी वर्धा आश्रमाचे नाव अजरामर केले.

महाराष्ट्र धर्म: १९२१ ते १९२४ दरम्यान आश्रमाच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच विनोबांनी एक नवा उपक्रम सुरू केला. जाने. १९२३ साली 'महाराष्ट्र धर्म' मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. या मासिकातील बहुतेक लिखाण विनोबांचेच असे. दर महिन्याला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून विनोबा लोक प्रबोधनाचे काम करीत. ईश्वर निष्ठा, राजकारण आणि सर्व सावध वृत्ती ही महाराष्ट्र धर्माची व्याप्ती आणि धोरण असेल असे विनोबांनी जाहीर केले होते. या मासिकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात सत्याग्रह आश्रम वर्षाची नियमावली देण्यात येई. हा आश्रम म्हणजे साबरमती आश्रमाची स्वतंत्र शाखा असून दोन्ही आश्रमाची कार्यपद्धतीही समान आहे असे सतत सांगितले जाई. चार अंकानंतर 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक बंद पडले. कारण एप्रिल १९२३ मध्ये राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानासाठी नागपूरात झालेला झेंडा सत्याग्रह होय. सुरुवातीला विनोबांनी यात भाग घेतला नाही, परंतु घटना अशा घडत गेल्या की आपल्या सहकऱ्यासहीत त्यांना यात सहभागी व्हावे लागले. मुख्य म्हणजे झेंडा सत्याग्रहाचे संचलन विनोबांनी करावे असा सर्वांचाच आग्रह होता.

१३ एप्रिल १९२३ रोजी नागपूरला राष्ट्रीय झेंडा घेऊन एक मोठी मिरवणुक निघाली होती. पोलिसांनी ती अडवली आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली. हा पहिला अखिल भारतीय स्वरूपाचा सत्याग्रह होता. विनोबांना या झेंडा सत्याग्रहात अटक होऊन एक वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. १३ एप्रिल १९२३ रोजी विनोबांना झालेली शिक्षा ही पहिली शिक्षा व पहिला तुरुंगवास होय.

गांधीजींचे सचीव महादेव देसाई यांनी १९ जुलै१९२३ च्या 'यंग इंडिया' च्या अंकात विनोबावर एक लेख लिहीला होता. ते म्हणतात, "विनोबा सत्याग्रह आश्रमात आले त्यावेळी आश्रम नुकताच सुरू झाला होता आणि झेंडा सत्याग्रहाच्या समयी ते वर्धा आश्रमाचे संचालक होते. आश्रमातील शारीरिक मेहनतीच्या कामाने आपल्या बौद्धिक शक्तीवर गंज चढेल असे त्यांना कधीही वाटले नाही. त्यांचे अनुशासन कठोर होते. त्यांना जेव्हा वसतिगृहाचा गृहपती नेमले गेले त्यावेळी सर्वांना धास्ती वाटत होती पण त्यांनी जेव्हा आश्रम सोडायचे ठरवले. तेव्हा विद्यार्थी त्यांच्या होणाऱ्या वियोगामुळे इतके रडले की त्यांचे सांत्वन करणे अवघड गेले....

महादेवभाई पुढे लिहितात, विनोबांचा आत्मसंयम अद्भुत असून ब्रह्मचर्य, स्वाध्याय त्याचे संकल्प आहेत. धर्म आणि अध्यात्माबाबत सर्व वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला आहे.

पुढे विनोबांच्या विषयी लिहिताना महादेवभाईने लिहिले की, "विनोबा उत्तम वक्ता, अप्रतिम लेखक, चांगले स्वयंपाकी, खेळाडू असलेले प्रसिद्धी आणि तथाकथित सामाजिक जीवनापासून ते अलिप्त आहेत...' १८ जून १९२४ पासून 'महाराष्ट्र धर्म' मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात करण्यात आले. मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात झाले तरी त्यातील बहुतांशी लिखाण विनोबांचेच असे. उपनिषदासारख्या गंभीर विषयावर अत्यंत सोप्या भाषेत मांडणी असे. संतवाणीतून विविध संतांनी सांगितलेली वचने कुणी ही समजेल अशा भाषेत मांडली जात. 'उपनिषदाचा अभ्यास' हे पुस्तक आणि 'संताचा प्रसाद' हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्र धर्म या साप्ताहिकातून विनोबांनी केलेले लिखाण होय. महाराष्ट्र धर्म साप्ताहिकातील ठळक लेखाचा संग्रह मधुकर या नावाने प्रसिद्ध करण्यात आला. १९२४ ते १९२७ या काळातील विनोबाच्या लेखांचा हा संग्रह "मधुकरचा उलगडा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत विनोबा लिहितात, 'महाराष्ट्र धर्म शब्दांचे संक्षिप्त रूप 'म. घ.' त्याला पणितीप्रमाणे 'उ' अनुवेध जोडून 'मधु' हा सांकेतिक शब्द साधला आहे. मधु म्हणजे महाराष्ट्र धर्मातून निवडलेले लिखाण...'

१९२७ साली शंकरराव देव आणि इतर मान्यवरांच्या कल्पनेवरून शि. म. परांजपे यांनी चालविलेल्या स्वराज्य पत्रात पुण्याची गांधी शिक्षणमाला आणि महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक समाविष्ट करण्याचे ठरवण्यात आले अशा रितीने 'महाराष्ट्र धर्म' हे साप्ताहिक ११ एप्रिल १९२७ ला बंद करण्यात आले..

वर्धा येथे जमनालाल बजाज यांचे लक्ष्मीनारायणाचे मंदिर होते. १९७-१९२८ रोजी एका विशेष समारंभानंतर हे मंदिर विनोबांचे हस्ते दलितासाठी खुले करण्यात आले. देशातील कदाचित हे पहिले मंदिर असावे जेथे सर्वप्रथम दलितांना प्रवेश मिळाला. विनोबांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन व आपल्या कार्यकर्त्यांशी परिचय व्हावा म्हणून वर्षातून एक महिना बापू वर्धा येथे येऊन राहात. विनोबाही वारंवार आपल्या कार्याची माहिती गांधींना देत. गांधीजीही त्यांना सतत प्रोत्साहन देत. एकदा एका पत्रात गांधींनी विनोबांना लिहिले, 'तुझ्या पेक्षा मोठा महान आत्मा मला कधीच आढळला नाही,' हे पत्र विनोबांनी वाचून त्वरीत फाडून टाकले. जमनलाल बजाज यांनी पत्राचे ते तुकडे एकत्र करून वाचले आणि विनोबांना प्रश्न केला, 'इतके अमुल्य पत्र आपण का फाडले?' तेव्हा विनोबांनी प्रश्न केला, 'मला महान आत्मा संबोधून गांधींनी चूक केली असे नाही वाटत? अशा पत्रामुळे मी अहंकारी बनेन हे म्हणून हे पत्र फाडून टाकले.'

वायकोम सत्याग्रहः त्रावणकोर संस्थानात वायकोम दलितांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू झालेल्या वादाबाबत म. गांधींनी विनोबांना १९२४ मध्ये वायकोम गावी सत्याग्रहींना मार्गदर्शन करण्यासाठी पाठविले. वायकोम येथेच विनोबांनी नंबुदी ब्राह्मणांशी शास्त्रार्थ केला. अस्पृशाची सावली पडली तरी विटाळ होतो अशा केरळी ब्राह्मणांना अस्पृश्यता शास्त्राविरुद्ध आहे हे पटवून दिले. कालांतराने म. गांधीही वायकोम गावी पोहोचले. म. गांधी आणि विनोबांच्या नेतृत्वाखाली एक वर्ष चार महिने हा सत्याग्रह चालू होता. शेवटी त्रावणकोर राज्याच्या अधिकाऱ्यांनी आपली हार कबूल केल्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सामोपचाराने सुटला. येथूनच म. गांधींचे सहकारी म्हणून विनोबांची संपूर्ण देशाला ओळख झाली.

नवा उत्साह आणि नव्या प्रेरणेसह विनोबा वर्धा आश्रमात परतले. यावेळी संपूर्ण आश्रमाच्या सफाईचे काम विनोबांनी स्वतःकडे घेतले. या दरम्यान १९४६ मध्ये विनोबा आजारी पडले. तेव्हा १९-२-१९२७ च्या पत्रात विनोबांना कळवले, 'जर आपल्यासारखा आजन्म ब्रह्मचारी आजारी होऊ शकतो, तेव्हा माझ्यासारख्याचा आजारी पडण्याचा हक्क अधिक वाढतो. आम्ही दोघांना विनोबा आणि गांधी- आजारी पडण्याचा हक्क सोडायचा आहे. खरा ब्रह्मचारी तो ज्याचे शरीर वज्रासारखे कठीण असते. आजारपण हे असंयमाचे चिन्ह नाही का?"

आश्रम जीवनात आश्रमवासियाचा परस्परावर विश्वास, प्रेम, आदर असावा, यावर विनोबांचा कटाक्ष असे. यासाठी विनोबा बुद्ध वंदनेतील त्रिसरणाचा सतत उल्लेख करीत.

बुद्धं सरणं गच्छामि

धम्मं सरणं गच्छामि

संघं सरणं गच्छामि

हा काळ विनोबांच्या तीव्र कर्मयोगाचा होता, १२ ते १४ तास विनोबा सतत कार्यमग्न असत. श्रमाधिष्ठित जीवनाचा प्रयोग याच काळात विनोबांनी केला. त्याचप्रमाणे सत्य, अहिंसा, असत्येय इत्यादी 'एकादश व्रतावर', 'एकादश व्रतमाला'. 'विचार पोथी' इत्यादी ग्रंथही याच काळात आकारास आले.


Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा