shabd-logo

गुलामगिरी भाग ७

26 June 2023

10 पाहिले 10
ब्रह्मा, ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादुमंत्र, संस्कृताचें मूळ, आटक नदीचे पलीकडेस जाण्याची बंदी. पूर्वी घोडी वगैरे जनावरें ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुरांचे मरण, परवारी, सुताचे पाष्टींचे चिन्ह, बीजमंत्र, माहार, शूद्र, कुळकर्णी, कुळंबी, कुणबीण, शूद्रांचा द्वेष, सोंवळें, धर्मशास्त्र, मनू, भट, पंतोजींचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतींचे मरण, ब्राह्मण इत्यादिकांविषयी.

थो० वामन मेल्यामागें उपाध्यांचा कोण अधिकारी झाला ?

जो० या प्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही, सबब ब्रह्मा या नांवाचा एक पटाईत कारकून होता, तोच सर्व राज्यकारभार चालवू लागला, तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधाणारा होता त्याच्या बोलण्याचा काडीमात्र विश्वास नसे, म्हणून त्यास चार तोंडांचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा. सारांश, तो अतिशय दक्ष, हट्टी, धूर्त, धाडस आणि निर्दय होता.

थो० ब्रह्मानं प्रथम काय काय केलें?

जो०- ब्रह्माने प्रथम ताडपत्रांवर खिळ्यानें उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादूमंत्र व ज्या कांही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यांत सामील करून त्या सर्वाचें त्यानें त्यावेळच्या सर्वकृत (ज्याचा अपभ्रंश संस्कृत) चालू भाषेत, आतांच्या फारशी बयतीसारिखीं लहान लहान कवनें करुन त्या सर्वांचा सार ताडपत्रावर टिपून ठेविला पुढं त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेर्णेकरून बह्याच्या मुखापासून त्या कादंबऱ्यासहित जादूमंत्र विद्या निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी. इतक्यांत उपाध्ये लोक उपासाने मरू लागले, यामुळे ते इराणांत परत माघारे चोरून छपून पळून जाऊ लागले; तेव्हा त्यानें आटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लघून पलीकडेस जाऊं नये म्हणून तलाख घालून बंदोबस्त केला.

धों० त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीव वाचविले?

जो०- त्यांनी मग तेथील झाडांचीं फळें, पाने, जमिनींतील कंदमुळे व जंगलांतील अनेक तऱ्हेचे पशुपक्षी तर काय, पण कित्येकांनी अखेरीस आपल्या बसल्या घोड्यांचासुद्धां वच करून त्यांस भाजून खाऊन आपले जीव वाचविले. यामुळे त्यांजवरचे रक्षक त्यांस भ्रष्ट म्हणू लागले. पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस, आणि भ्रष्ट या शब्दाचा अपभ्रंश भट झाला. नंतर त्या भटानी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना तऱ्हेच्या प्राणीमात्रांचे मांस खाल्लें व त्याची त्यांस लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी तें खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे; परंतु त्यातून कित्येक भटांस मांस खाण्याची रुची लागलेली संवय सुटेना, त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्या नीच कर्माचा दोष छपविण्याकरितां पशूंचा वध करून त्यांचं मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशूचे वधास पशूयज्ञ, अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथी दाखल केली.

थों० नंतर ब्रम्ह्याने काय केलें?

जो०- पुढे बळी राजाचा पुत्र बाणासूर मरताच त्याच्या एकदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे, जिकडे पहावें तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐषआरामात गुंतला. अशी संधी पाहून ह्याने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित भट परिवारांस (ज्याचा अपभ्रंश हल्ली "परिवारी" होय) घेऊन त्याने राक्षसावर (रक्षकावर) एकाएकीं रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला. नंतर त्यानें बाणासुराच्या राज्यांत शिरण्याचे पूर्वी असा विचार केला की, पुढे कदाचित् न जाणों आपल्यावर एकादें संकट येऊन आपली सर्वाची दाणादाण झाल्यास पुनः आपण आपल्या परिवारातील एकमेकानी एकमेकांस ओळखून काढिता घावें, म्हणून ब्रम्ह्याने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यांत एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचें जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्यास हल्लीं ब्रम्हसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीजमंत्र, म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात, ती शिकवून पुढे त्याजवर कसाहि प्रसंग गुजरला, तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियास सांगू नये म्हणून तलाख मारून टाकिली यावरुन भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकांस एकमेक सहज ओळखून काढू लागले.

झो० यानंतर ब्रम्ह्याने काय केलें?

जो० नंतर बम्ह्याने त्या आपल्या सर्व परिवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यांतील कित्येक लहानमोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेताच त्यापैकीं रणांगणीं कबरा बांधून लढणाऱ्या महाअरी (हल्लींचा ज्याचा अपभ्रंश महार होय) क्षत्रियांशिवाय जे लोक त्याच्या तावडींत सांपडले होते तेवढ्यांचे मात्र त्यानें सर्व हरण करून त्या सर्वास केवळ सत्तेच्या मदानें क्षुद्र लोक (ज्याचा अपभ्रंश शूद्र होय) मानून आपले दास केले. त्यांतून कित्येकांस आपल्या लोकांच्या घरोघर सेवाचाकन्या करण्याकरिता वाटून दिलें. बाकी राहिलेल्या शुद्रांची गांवोगांव एकेक भटकामगार पाठवून कुळेवारी करून त्यांजपासून शेतातील काम करून घेऊन, त्यांचे पोटापुरतें अन्न देण्याची वहिवाट घातली. यावरून त्या कामगाराचे नाव कुळेकरणी पडलें. (ज्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय) त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली, (ज्याचा अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय) व त्या दास कुणब्यांच्या स्त्रियास नेहमी शेती पुरते काम नसल्यामुळे कधीं कधीं कारणपरत्वें भटांच्या घरी सेवाचाकऱ्या करावयास जावें लागत असे; यास्तव कुणबीण आणि दासी या दोन शब्दांमध्ये तीळमात्र भेद दिसून येत नाहीं वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत जाऊन शूद्रांस किती नीच मानू लागले की, त्याविषयी सर्व हकीकत लिहू गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल, या भयास्तव त्यापैकी कांहीं कांही. सांप्रत मुद्दे आढळतात, ते थोडक्यात येथे लिहितो, ते येणेप्रमाणे:- हल्लींचे भट (मग ते झाडणाऱ्या मांगा महारासारिखे अक्षरशून्य का असेनात) उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही तीं नीच कर्मे आचरून पापपुण्याचा विधिनिषेध न मानितां अज्ञानी शुद्रांस फसविण्यास काडीमात्र मागेपुढे पाहात नाहीत. शेवटीं त्यांचा कोठें उपाय चालेनासा झाला म्हणजे ते शूद्रांचे दारोदार धर्माच्या मिषानें दोम दोम करून आपली कशी तरी पोटे जाळतात; परंतु शूद्रांचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुर्रे सांभाळून त्यांच्या गोठ्यांतील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकण्यास, नांगर, कुळव, मोटा आणि गाड्या हांकण्यास, खांदणी, खुरपणी आणि कोळपणी करण्यास, सोनखताच्या पाट्या डोईवर वाहून झाडास खतविण्यास, कडब्याच्या आळाशा वाहून गंजी रचण्यास, रात्री हातांत काठ्या घेऊन शेताची राखण करण्यास व त्यांचे शेतांतील धान्याची व भाजीपाल्याची ओझी वाहून त्यांच्या घरीं नेऊन टाकण्यास लाजतात, ते शूद्रांचे घरी चाकरीस राहून त्यांची घोडी खाजवून त्यांच्या घोड्यापुढे धांवण्यास, त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास, त्यांच्या घरांतील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी भांडी घासण्यास, त्यांच्या घरांतील समया घांसून दिवे लावण्यास व त्यांच्या घरीं चिखलमाती वाहून बिगाऱ्याचे काम करण्यास लाजतात. त्याचप्रमाणे भटणी शूद्रांच्या चाकरिणी होऊन त्यांच्या स्त्रियास उटणी लावून त्यांस नाहू घालून त्यांचे केस विंचरण्यास, त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्याचे पाय चेपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुऊन त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात. पुढे जेव्हा ते महाअरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातांतून सोडवावे म्हणून भटावर हमेशा हल्ले करू लागले, तेव्हा एकंदर सर्व भट, शूद्रांचा इतका द्वेष करू लागले कीं ते शूद्र शिवलेले अन्नसुद्धा खाईनातसे झाले व त्याच द्वेषावरून हल्लींचे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय पण ते शूद्र शिवलेले पाणीसुद्धा पीत नाहींत त्यांनी आपणांस कोणी शूद्रांनी शिवूं नये याजकरिता सोवळें होण्याची चाल पाडली. पुढे कित्येक शूद्रद्रोही भटग्रंथकारानी जनाची तर नाहीं, पण मनाची सुद्धा काडीमात्र लाज न धरितां सधी पाहून त्या सोंवळ्याचें इतके महत्व वाढविलें को सोवळ्या भटास एकादे शूद्राचा स्पर्श झाला असतांसुद्धां तो वास्तविक अपवित्र होतो, म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तकें करून ठेविली आहेत; व कांहीं कालानंतर शूद्रांस आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीं तरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत, या भयास्तव शूद्रांस मुळींच कोणी ज्ञान शिकवूं नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले, इतकेंच नाहीं परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थ संबंधी ग्रंथ वाचीत असल्यास त्यांतील एक शब्दसुद्धां शूद्रांचे कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकिला याविषयी मनुसंहितेत दाखलेही सांपडतात, त्या आधारावरुन हल्लीचे सोवळे भट तसले अपवित्र पुस्तक शूद्रांचे समक्ष वाचीत नाहीत. आता जरी। ख्रिस्ती म्हणविणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकानें विद्याखात्यांतील पोटार्थी भटपंतोजीच्यानें शूद्रांस आम्ही लिहिणें शिकविणार नाहीं, असें उघड तोंडाने म्हणवत नाहीं, तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शूद्रांस त्यांविषयीं खरा समज देऊन आपलें महत्व कमी करून घेववत नाहीं. सबब ते शूद्रांचे मुलांस केवळ कामापुरतें व्यावहारिक ज्ञानसुद्धां न शिकवितां ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची अपुरती देशाभिमानाची खोटी तत्वें मात्र भरवून त्यांस पक्के इंग्लिश राज्यभक्त करून अखेरीस त्यांस शिवाजीसारिख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजानें आपला देश म्लेंच्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसें पालन केले, याविषयी अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात. यामुळे शूद्र समाजाचे मानाप्रमाणे ते मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत. एकंदर सर्व खात्यांत भटांची गर्दी होऊन ते शूद्रावर इतक्या सफाईनें जुलूम करितात, कीं त्याविषयीं यथासांग हकीगत लिहू गेल्यास, कलकत्त्यातील नीळ पिकविणान्या इंग्लिश लोकांचे जुलूम 'खडींत नवाटकेसुद्धां भरणार नाहीत. आता चहुंकडे भटांच्या हातांत ( नांवाला मात्र टोपीवाले) सत्ता असल्यामुळे ते गरीब व अज्ञानी शूद्र रयतेचें तर काय, पण ते सरकारचेंसुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहींत असे कोणाच्यानें म्हणवणार नाहीं. याविषयीं आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून तें, आंधळ्याच सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या धोरणानें वागते. यास्तव ह्यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यांत तिळमात्र संशय नाही. सारांश, ब्रम्ह्याने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो गवर्न इतका फुगला होता की, महाअरींनीं त्याचें नांव थट्टेने "प्रजापती" पाडिलें होतें असा तर्क निघतो. परंतु ब्रम्हा मेल्यावर आर्य लोकांच्या मुळच्या भट नांवाचा लोप होत जाऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडलें.

Mahatma Jyotirao Phule ची आणखी पुस्तके

1

गुलामगिरी भाग १

23 June 2023
0
0
0

ब्रह्मा, उत्पत्ति, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी.धों०-युरोपखंडांतील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लावि

2

गुलामगिरी भाग २

23 June 2023
0
0
0

मत्स्य आणि शेखासूर याविषयी.धो०- वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकदर किती टोळ्या आल्या असाव्या?जो० या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जळमागनि अनेक आल्या.धो० त्यापैकी पहिली टोळी जळमार्गाने लढा

3

गुलामगिरी भाग 3

23 June 2023
0
0
0

कच्छ, भूदेव अथवा भूपती, क्षत्रिय, द्विजआणि कश्यपराजा याविषयी.धो०- मासा आणि कासव यामध्ये एकदर सर्व गोष्टी ताडून पहातां त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते; परंतु इतर काही गोष्टीत म्हणजे जलीत रहाणे, ओडी

4

गुलामगिरी भाग ४

23 June 2023
0
0
0

वराह आणि हिरण्याक्ष याविषयी.घो०-कच्छ मेल्यामागे द्विजाचा कोण अधिकारी झाला ?जो०- वराह.घों०-वराह हा डुकरापासून जन्मला असे भागवत वगैरे इतिहासकयोंनी लिहून ठेविलें आहे, याविषयी आपले मत कसे काय आहे?जो०- वास

5

गुलामगिरी भाग ५

23 June 2023
0
0
0

नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप्र,विरोचन इत्यादिकाविषयी.धो०- वराह मेल्यावर द्विज लोकाचा कोण अधिकारी झाला?जो०- नृसिंह,धो० नृसिंह स्वभावाने कसा होता?जो०- नृसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितूरी, कप

6

गुलामगिरी भाग ६

23 June 2023
0
0
0

बळीराजा, जोतीबा मऱ्हाठे, खंडोबा, महासुभा नऊ खंडांचा न्यायी, भैरोबा, भराडी, सात आश्रयीत, तळी भरणे, आदितवारास पवित्र मानणे, वामन, पक्ष घालणे, विध्यावली, घट बसविणे, बळीराजाचे मरण, सति जाणे, आराधी लोक, शि

7

गुलामगिरी भाग ७

26 June 2023
0
0
0

ब्रह्मा, ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादुमंत्र, संस्कृताचें मूळ, आटक नदीचे पलीकडेस जाण्याची बंदी. पूर्वी घोडी वगैरे जनावरें ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुरांचे मरण, परवारी, सुताचे पाष्

8

गुलामगिरी भाग ८

26 June 2023
0
0
0

परशुराम, मातृवध, एकवीस स्वाऱ्या, दैत्य, खंडेरावाने रावणाचा आश्रय केला. नऊखंडाची जाणाई, सात आसरा, महारांच्या गळ्यातील काळा दोरा, अतिशूद्र अत्येज, मांग, चांडाळ, महारास जिवंतच पायामध्ये दडपणे, बाह्मणात प

9

गुलामगिरी भाग ९

26 June 2023
0
0
0

वेदमंत्र, जादूचे वजन, मूठ मारणे, देव्हारे घुमविणे, जप, चार वेद, ब्रम्हघोळ, नारदशाई, नवीन ग्रंथ, शूद्रांस ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा, इत्यादिकाविषयी.धो०- तुम्ही खुटीस नागर बर

10

गुलामगिरी भाग १०

26 June 2023
0
0
0

दुसरे बळीराजे, ब्राह्मणधमांची फजीती, शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष, आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकानी बाह्मणांचा कृत्रिमरू

11

गुलामगिरी भाग ११

26 June 2023
0
0
0

पुराण सांगणे, बड़े वगैरे परिणाम, शूद्र संस्थानिक, कुळकर्णी, सरस्वतीची प्रार्थना, जप, अनुष्ठाने, देवस्थाने, दक्षिणा. मोठ्या आडनावाच्या सभा इत्यादिकाविषयी.धो०- काय? या अधर्म भटगारुड्याच्या दंगेखोर मूळ प

12

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

13

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

14

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाचे

15

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपलीतय

16

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

17

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

18

गुलामगिरी भाग १२

27 June 2023
0
0
0

वतनदार भट कुळकर्णी, युरोपिअन लोकाचे वसाहतीची जरुरी, विद्याखात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपिअन कामगारांची अक्कल गुंग कशी होते, इत्यादिकाविषयी घो०- असो, परंतु आपण पूर्वी म्हणाला की, बाकी एकदर स

19

गुलामगिरी भाग १३

27 June 2023
0
0
0

मामलेदार, कलेक्टर, रेव्हिन्यु, जज्ज आणि इंजिनियरखात्यातील भट कामगार, इत्यादिकाविषयी धो०-यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करितात काय? जो०- आजपर्यंत जे भट मामलेदार झा

20

गुलामगरी भाग १४

27 June 2023
0
0
0

युरोपियन कामगारांचा निरुपाय, खोतांचे वर्चस्व, पेन्शन घेऊन निर्वेध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारांत गांवोगावच्या हकीगती कळविण्याची जरुरी, धर्म आणि जात्याभिमान इत्यादिकाविषयी धो०- असे जर अनर्थ

21

गुलामगिरी भाग १५

27 June 2023
0
0
0

सरकारी शाळाखाती. म्युनिसिपालिटी, दक्षणा प्राइज कमेटी व भट वर्तमानपत्रकत्यांची जूट आणि शूद्रादि अतिशूद्रांच्या मुलानी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादिकाविषयी.. धो०- सरकारी शाळाखात्यातील

22

गुलामगिरी भाग १६

27 June 2023
0
0
0

ब्रह्मराक्षसाचे पिंडेचा धिक्कार. ० या सर्व आपल्या सवादावरून असे सिद्ध होते की, एकदर सर्व भटानी आपल्या कृत्रिमी धर्माच्या अडून आपल्या भोळ्या सरकारच्या डोळ्यात माती टाकून आपण सर्व शूद्रादि अतिशूद्रास

23

सार्वजनिक सत्यधर्म ( ग्रंथकर्त्याची प्रस्तावना)

29 June 2023
0
0
0

या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकानें अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहोपग्रहांसीहत तत्संबंधी एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले आहे त्यांपकी आपण सर्व मानवस्त्रीपुरुषानी त्याविषयी काय

24

सार्वजनिक सत्यधर्म (सुख)

29 June 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्रश्न- मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?जोतीराव गोविंदराव फुले. उत्तर - सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही याविषयी प्रमाण देतो.|| अखंड ||।। सत्य सर्व

25

सार्वजनिक सत्यधर्म (धर्मपुस्तक)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०-यावरून कोणत्याच धर्मपुस्तकात सर्वचैव प्राणीमात्रास सुख देण्यापुरते सत्य नाही काय?जोतीराव गोविंदराव फुले उ०- या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तकें केली

26

सार्वजनिक सत्यधर्म (निर्माणकर्ता)

29 June 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले प्र० तर आपल्या या सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्त्ता कोण आहे?जोतीराव फुले. उ०- पूर्व अथवा पश्चिम अथवा दक्षिण, अथवा उत्तर इत्यादि दहा दिशांपैकी एका तरी दिशेचा आप

27

सार्वजनिक सत्यधर्म (पूजा)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०- आता आपल्या निर्माणकर्त्यावर पुष्पे चढवून त्याची पूजा आपण मानवानी कोणत्या तऱ्हेने करावी?जोतीराव उ० या अफाट पोकळीतील अनंत सूर्यमंडळासह त्याच्या ग्रहोपग्रहासहित पृथ्वीवरील पुष्

28

सार्वजनिक सत्यधर्म (नामस्मरण)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर. प्र० निर्माणकर्त्याचे वारवार पोकळ नामस्मरण केल्याने त्यास संतोष होईल काय?जोतीराव फुले उ०- आपण घरी असता मी आपल्या घरी तुमच्या नावाने एखाद्या धातूच्या अथवा दगडाच्या मूर्तीवर पुष्पे

29

सार्वजनिक सत्यधर्म (स्त्री आणि पुरुष)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र० निर्मिकानें या आपल्या पृथ्वीवर जलचर, स्थलचर व खेंचर अशा प्रकारच्या जिवाच्या तीन जाती निर्माण केल्या आहेत; त्यांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे?जोतीराव गोविंदराव फुले उ० त्यापैकी

30

पाप (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

पापमानाजी बोलूजी पाटील. प्र०- पापाचरण करून एकंदर सर्व मानवी प्राणी दुःखात पडू नयेत, म्हणून मानवाच्या बचावासाठी आपल्या निर्मीकानें त्यास काही साधन दिले नाही काय ?जोतीराव गोविंदराव फुले. 30- असे कसें हो

31

पुण्य (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०-पुण्य कशास म्हणावे?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- स्वतःस मात्र सुख होण्याकरिता एकदर सर्व मानव प्राण्यास कायीक व मानसिक पिडा दिली नाही, म्हणजे त्यासच पुण्य म्हणावें.बळवंतराव प्र०

32

जातिभेद (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्र०- मानवी प्राण्यात जातिभेद आहे किंवा नाही?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- मानवी प्राण्यात मूळ जातिभेद नाही,यशवंत प्र० मानवी प्राण्यात मूळ जातिभेद कसा नाहीं?जोतीराव उ०- पशुपक्षी वगैर

33

श्लोक (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

सहृदय समनस्य अविद्वेष कृणोमिवः अन्योन्य अभिहर्यत वत्सजात हवाध्या ।अनुव्रतः पितुः पुत्री मात्रा भवतु सम्मनः जायापत्ये मधुमतिं वाच वदतु शांतिवान् ।मा भ्राता भ्रातारं द्विषद् मास्वसार उतस्वसा संभ्यचः सव्

34

तर्क (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

गुडीराम धोडीराम मवाशी प्र० तर्क या शब्दाचे किती अर्थ होतात?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- तर्क या शब्दाचे तीन प्रकारचे अर्थ होतात. १ला प्रकार प्रत्यक्ष कर्त्यावरून कर्माचे आणि कर्मावरुन कर्त्याचं ज्ञान ह

35

ज्ञानेश्वरी, बारावा अध्याय ( सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

जोतीराव उ०- ज्ञानेश्वरी, अध्याय १२ वा II जो सर्व भूतांचे ठायीं ॥ द्वेषाते नेणेची काही II आप पर जया नाहीं II चैतन्या जैसे II १ II असा खरोखरच समज जर बाळबोध कृष्णाजीचा होता, तर त्याने पाडवांस मदत करून त्

36

ज्ञानेश्वरी, तेरावा अध्याय (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

तेराव्या अध्यायातील सातव्या व आठव्या ओवीतला अभिप्राय ज्या कोणास सर्वज्ञता आल्याबरोबर त्याचा महिमा वाढेल, या भयास्तव त्याने वेड्याचे सोंग घेणे व त्याने आपला चतुरपणा आवडीनें लपविण्यासाठी पिसा होणे, हें

37

दैव (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

।। मना त्वाचि रे पूर्वसचीत केलें । तयासारिखे भोगणे प्राप्त झालें ॥। ८ ।।-रामदास.गणपतराव दर्याजी थोरात प्र० देवाचे कोणते प्रतिशब्द आहेत?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- दैवास नशीब, प्रालब्ध, प्राक्तन, संचित

38

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय)

4 July 2023
0
0
0

गोविंदराव प्र० तूर्त हैं एकीकडे ठेवा, परंतु ताज्यातवान्या गायागुरे यांचे व बोकड यांचे बुक्यानें प्राण घेऊन त्यांचे मांस खाणारे अघोरी आर्यभट्ट ब्राह्मण व त्याचप्रमाणे रोगानें अथवा लंगडीलुलीं, आंधळीपांग

39

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 2)

4 July 2023
0
0
0

गोविंदराव प्र० सदरची जागा चालविण्यास एकसुद्धा ह्यार अथवा मांग निवडणार नाही.जोतीराव उ० याचप्रमाणे मोघम आम्हा हिंदूस कलेक्टरांच्या जागा, युरोपियन लोकांसारख्या इंग्रज सरकाराने द्याव्यात, म्हणून सार्वजनीक

40

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 3)

4 July 2023
0
0
0

सत्यगणपतराव दर्याजी थोरात प्र० सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- सत्यवर्तन करणाऱ्याविषयी नियम देतो, ते येणेप्रमाणे-१. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकदर सर्व प्राणीमात्रा

41

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 4)

4 July 2023
0
0
0

आकाशातील ग्रहबळवंतराव हरी साकवळकर. प्र० आकाशातील ग्रह या आपल्या भूमंडळावरील मानव स्त्री-पुरुषास पीडा देतात, ह्मणून ग्रहशास्त्रवेत्ते मोठ्या डौलाने ह्मणतात, हे खरे आहे काय?जोतीराव गोविंदराव फुले. उ० या

42

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 5)

4 July 2023
0
0
0

जन्मलक्ष्मण मनाजी, प्र० या जगात मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास कसें वाटते?जोतीराव फुले उ०- मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास आनंद होऊन उल्हास वाटतो खरा,

43

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 6)

4 July 2023
0
0
0

कन्या अथवा पुत्र यांचे नावाचा संस्कार,-अन्नाचा संस्कार आणि शाळेचा संस्कार.यशवंत जोतीराव फुले. प्र० कन्या अथवा पुत्र यांच्या नांवाचा संस्कार केव्हा करावा?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- कन्या असल्यास तिच्य

44

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 7)

4 July 2023
0
0
0

लग्नगणपतराव दर्याजी थोरात, पेन्शनर प्र० - लग्न म्हणजे काय?जोतीराव गोविदराव फुले. उ०- आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने जेवढे म्हणून प्राणीमात्र निर्माण केले आहेत, त्यातून मानव स्त्री-पुरुषास एक तऱ्हेच

45

सार्वजनिक सत्यधर्म (दुष्टाचरण)

5 July 2023
0
0
0

लक्ष्मण मानाजी पाटील, मगर प्र०- आपण सर्वाच्या निर्मीकाने एकंदर सर्व प्राणी मात्रास उत्पन्न करतेवेळी फक्त मानव स्त्री-पुरुषांस सारासार विचार करण्याची बुद्धि देऊन, त्यास अतिपवित्र केले आहे, असा जर

46

सार्वनिक सत्यधर्म (मृत्यू)

5 July 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्र०- मृत्यु ह्मणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- एकदर सर्व प्राणीमात्राचे देहस्थित प्राण्यांचे जे गमन ते.यशवंत प्र०- कित्येक मानव स्त्रीपुरुषांच्या तान्ह्या मुली-मुलास मरण येण्य

47

सार्वनिक सत्यधर्म. ।। प्रार्थना ||

5 July 2023
0
0
0

या तुझ्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडलासहित या पृथ्वीवरील प्राणीमात्रासह मज मानवास निर्माण करून मला सद्सद्विचार करण्याची बुद्धि दिलीस व तुझ्या आज्ञेप्रमाणे सत्यास स्मरून मी या जगांत वर्

48

सार्वनिक सत्यधर्म. (प्रेताची गती)

5 July 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर, प्र० एकदर सर्व मानव कन्यापुत्रांनी आपल्या माता-पित्यांच्या प्रेतांची गति कशी लावावी ?जोतीराव गोविंदराव फुले उ० एकंदर सर्व मानव कन्यापुत्रांच्या मातेने अथवा पित्यानें आपल्या मरणाच

49

सार्वनिक सत्यधर्म. (प्रार्थना)

5 July 2023
0
0
0

तू एकदर सर्व पृथ्वीवरील मातीस निर्माण करून तिच्याद्वारे आम्हा सर्व मात्रांचे पोषण करवितोस. यास्तव आम्हांपैकी एका मानवाचे प्राणोत्कमण झाले. त्यातील माती, मातीस मिळवून आह्मी सर्व तुझ्या शाश्वत अविनाशी व

50

सार्वजनिक सत्यधर्म (श्राद्ध)

5 July 2023
0
0
0

गोविंद गणपतराव काळे प्र० श्राद्ध म्हणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले उ०- मृत पितरांचे उद्देशाने पुत्रादिकांनी करायाचीं ब्राह्मणभोजने पिडदानें एतद् प्रधान कर्मे आहेत ती.गोविंद प्र०- यावरून शुद्रादी अतिशू

51

सार्वजनिक सत्यधर्म (एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस ग्रंथकर्त्याची प्रार्थना)

5 July 2023
0
0
0

।। अखंड ||निर्मीकाने जर एक पृथ्वी केली । वाही भार भली । सर्वत्रीचा ||१॥ध्रु० ।। तृण वृक्ष भार पाळी आम्हासाठीं ।। फळें तीं गोमटी ।। छायेसह ।। २ ।। सुखसोईसाठी गरगर फेरे रात्रदीन सारें । तीच कर

---

एक पुस्तक वाचा