माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच 'हा भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच ' हा भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याची टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे. २५ जून १९७५ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. 'तो काळ म्हणजे देशासाठी अंधारयुग असल्यासारखा होता, जेव्हा अनेक राजकीय नेत्यांना बंदिस्त करण्यात आले होते' असे सांगत मोदींनी त्यावेळच्या आठवणी जाग्या केल्या.
' आणीबाणीविरुद्ध संपूर्ण क्रांतीचे आवाहन करणा-या लोकनेते जयप्रकाश नारायण यांना प्रतिसाद देत देशभरातील युवक, महिला व पुरूषांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी स्वत:ला निस्वार्थीपणे झोकून दिले. लोकशाहीच्या रक्षणासाठी झटणा-या त्या नागरिकांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे', असेही मोदींनी नमूद केले आहे. आणीबाणीविरोधातील आंदोलनातून आम्हा तरूणांना अनेक गोष्टी शिकायला मिळालं, असंही मोदींनी नमूद केलं आहे. तो काळ म्हणजे देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी, अनेक नेत्यांसोबत स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याच्या ध्येयासाठी लढण्याची उत्तम संधी होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच एक सशक्त, उदारमतवादी स्वातंत्र्याचा पुरसक्रा म्हणजे प्रगतीची, विकासाची गुरूकिल्ली आहे असे सांगत तिच्या मजबुतीसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
भारताच्या इतिहासात २५ जून १९७५ हा दिवस न विसरू शकणारा आहे. याचे कारणही तसे आहेत आजच्या दिवशी १९७५ मध्ये तात्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी (Emergency) लागू केली होती. या वेळी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या सिफारशीनुसार भारतीय घटनेच्या कल ३५२ नुसार देशात आणीबाणी जाहीर केली होती.
भारतीय राजकारणात त्या कालवधीवर मोठ्या प्रमाणात टीका होते. या काळात इंदिरा गांधी सरकारने मोठ्या प्रमाणात दडपशाही केली होती. या दरम्यान, सरकार विरुद्ध बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. तसेच प्रेसवरही मोठ्या प्रमाणात निर्बंधने लादली गेली होती. सुमारे २१ महिने आणीबाणी भारतात लागू करण्यात आली होती. याचा कालावधी २६ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ होता.
भाजप नेहमी आणीबाणीसाठी काँग्रेसवर हल्लाबोल करत आले आहे. आज आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण जाले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कटू आणवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकून आणीबाणीच्या कठीण काळावर भाष्य केले आहे. यात दडपशाहीचा कठोर काळ दाखविण्यात आला आहे.
भाजप नेहमी आणीबाणीसाठी काँग्रेसवर हल्लाबोल करत आले आहे. आज आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण जाले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कटू आणवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकून आणीबाणीच्या कठीण काळावर भाष्य केले आहे. यात दडपशाहीचा कठोर काळ दाखविण्यात आला आहे.
आणीबाणीची आठवण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहासह अनेक मंत्र्यांनी ट्विटद्वारे करून दिली. काँग्रेस सरकारने कशा प्रकारे जनतेवर दडपशाही लादली आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. तसेच राजकीय नेत्यांना कसा त्रास दिला याची आठवण करू दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून आणीबाणीच्या काळा दिनांची आठवण करून दिली.
गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले की आजच्या दिवशी राजकीय हितासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली होती.
तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी या संदर्भात आपल्या पद्धतीने ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की आज आणीबाणीचा वर्धापन दिली आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून देशात सुपर आणीबाणी लागू झाली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत टीप्पणी केली आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला मध्यरात्री आणीबाणी लागू केली होती. या दरम्यान नागरिकांचे अधिकार संपले होते. पोलीस मनमानी पद्धतीने लोकांना पकडून जेलमध्ये टाकत होते. आणीबाणीमध्ये वृत्तपत्रातील बातम्यांवर कडक पहारा लावण्यात आला होता.
मीडियावर सेन्सरशीप लावण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनी घटनेच्या कलम ३५२ नुसार देशात आणीबाणी जाहीर करून स्वतःला अपरिमित अधिकार प्राप्त करून घेतले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा सर्वात वादग्रस्त काळ होता. या काळात निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या २६ जूनला संपूर्ण देशाला रेडिओवर इंदिरा गांधी यांनी आणीबाणीबद्दल सांगितले होते.
• अलाहबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी विरूद्ध दिलेल्या निकालामुळे आणीबाणी
आणीबाणी लागू करण्यामागे अनेक कारण सांगण्यात येत होते. यात सर्वात महत्वाचे म्हणजे १२ जून १९७५ रोजी अलहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांच्या विरोधात निर्णय दिला. १२ जून १९७५ रोजी अलाहबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांच्या रायबरेली निवडणुकीदरम्यान सरकारी यंत्रणेचा दुरपयोग केल्याप्रकरणी दोषी ठेरवण्यात आले. त्यानंतर ती निवडणूक रद्द ठरविण्यात आली.
राज नारायण यांनी १९७१ मध्ये रायबरेलीमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर अहलाबाद हायकोर्टात प्रकरण दाखल केले होते. त्यावर जस्टिस जगमोहनलाल यांनी हा निकाल दिला होता. दरम्यान, २४ जून १९७५ ला सुप्रीम कोर्टाने तो निकाल कायम ठेवला होता. पण इंदिरा गांधी यांना पंतप्रधानाच्या खुर्चीवर कायम ठेवण्याची परवानगी दिली होती.
पण, एका दिवसानंतर जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा यासाठी देशभरात रोज आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरात आंदोलन सुरू झाले. जय प्रकाश नारायण, मोरारजी देसाईसह अनेक नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली व्यापकपणे विरोधी आंदोलनाने जोर पकडला.
इंदिरा गांधी इतक्या सहजपणे खुर्ची खाली करण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. दुसरीकडे विरोधीपक्ष सरकारवर दबाव टाकत होता. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी २५ जूनच्या रात्री देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. मध्य रात्री इंदिरा गांधी तत्कालिन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून आणीबाणीच्या निर्णयाच्या दस्ताऐवजावर सही करून घेतली होती.