पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.
नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.
भारताला १९४७ साली [ ब्रिटिश भारत ]ब्रिटिश राजवटीपासून भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने युनायटेड किंग्डम ब्रिटनमधील संसदीय प्रजासत्ताक ह्या प्रकारच्या सरकारचे अंगीकरण केले. ह्यामध्ये राष्ट्रप्रमुखाला केवळ औपचारिक अधिकार असून बव्ह्ंशी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानाद्वारे घेतले जातात.
भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो.
पात्रता
भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.
- लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
- केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.
शपथ
पंतप्रधानपद ग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधानाला राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये खालील शपथा घ्याव्या लागतात: (इंग्लिश मजकूर)
पदाची शपथ:
I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as prime minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.
• पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते व त्यात वेळोवेळी बदल केले जातात. जुलै २०१२ मध्ये पंतप्रधानाचे मासिक वेतन ५०००० व भत्ते ह्यांची रक्कम एकूण भारतीय रूपया १६०००० (१.६ लाख) इतकी आहे.
• पंतप्रधानांची यादी
• सध्या असलेले भारताचे पंतप्रधानान विषयी जाणून घेऊ
नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. गतिशील, समर्पित आणि दृढनिश्चयी नरेंद्र मोदी एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात.
मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. जिथे प्रत्येक भारतीय त्याच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने ते सर्वाधिक प्रेरित आहेत.
अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील याची सरकारने खबरदारी घेतली आहे. सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे.
देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि ‘श्रमेव जयते’ उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले तसेच आपल्या कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले.
भारत सरकारने येथील जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विम्याचे कवच देण्यावर भर दिला. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणारी ही योजना आहे.
2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले, जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक लोक चळवळ ठरली आहे. या अभियानाची व्याप्ती आणि प्रभाव ऐतिहासिक आहे.
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नेपाळचा, 28 वर्षांनंतर ऑट्रेलियाचा, 31 वर्षांनंतर फिजीचा आणि 34 वर्षांनंतर सेशेल्सचा द्विपक्षीय दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. त्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत-जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवले.
अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिला आहे. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला. जुलै 2015 मध्ये मोदी यांनी पाच मध्य आशियाई देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा अनेक दृष्टीनं पथदर्शी मानला जातो. ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट, चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात भारताचा दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे या सर्व देशांबरोबर भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत झाली. भारत आणि अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच 2015 च्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
ऑगस्ट 2015 मध्ये भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाचे नेते या परिषदेत उपस्थित होते. भारत आणि प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.
एखादा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र परिषदेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला. प्रथमच जगभरातील 177 देशांनी एकत्र येऊन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत पारित केला.
गुजरातमधील लहान शहरात 17 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब समाजातील शोषित आणि वंचित असणाऱ्या ‘इतर मागासवर्गीय’ गटातील होते. गरीब परंतु प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले, त्यांच्याकडे कधी जास्तीचा एक रुपयासुद्धा नसायचा. आयुष्यातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना कठोर परिश्रमाचा धडा दिला, मात्र त्याचबरोबर सामान्य जनतेच्या टाळता येण्याजोग्या हालअपेष्टांची त्यांना जाणीव झाली. यातूनच तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या राष्ट्रवादी संघटनेबरोबर काम केले. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी संघटनेबरोबर काम करताना त्यांनी स्वत:ला राजकारणात झोकून दिले. गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
वर्ष 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी चार कार्यकाळ पूर्ण केले. विनाशकारी भूकंपाच्या दुष्परिणामांचा सामना करणाऱ्या गुजरातचा त्यांनी विकास इंजिनाच्या रुपात कायापालट केला आणि आज हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत.
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ते वेबचा वापर करतात. Facebook, Twitter, Google+, Instagram, sound cloud, Linkedin, weibo यांसारख्या अन्य सोशल मिडिया व्यासपीठावर ते खूप सक्रिय आहेत.
राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे. ते आपल्या दिवसाची सुरुवात योग साधनेतून करतात. योग केल्यामुळे त्यांचे शरीर आणि मन संतुलित राहते आणि अतिशय धकाधकीच्या दैनंदिन जीवनात त्यांना शांतीची अनुभूती मिळते.
ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिला.
मोदी सरकारचे अग्गण प्रमुख, नरेंद्र मोदी, आपल्याला एक नेतृत्वात दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट राजकारणाच्या मुद्द्यांचे साधन करते. त्यांनी भारतीय राज्यात उपक्रमांचा रूप घेतला आहे, जे आर्थिक, सामाजिक, आरोग्यिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी मुद्दे घेतले, प्राथमिक शिक्षण आणि स्वच्छतेसाठी अभियांत्रिकीचे उपयोग केले आणि प्राथमिक आरोग्य सेवांचे विस्तार केले. त्यांचे प्रमुख उद्देश्य भारताची प्रगती आणि विकास करणे आहे जेणेकरून भारतीय सामरिक शक्ती, आर्थिक सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेची वाढ सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख ठरले आहेत.