दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन केले जाते. या रथात सहभागी होण्यासाठी परदेशातून लोक येथे पोहोचतात. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ. जगन्नाथ रथयात्रा हा सण भारतात साजरा केला जातो. चला जाणून घेऊया या रथयात्रेशी संबंधित खास गोष्टी.
ओडीसा मध्ये असलेल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे भारतातील पवित्र चार धामांपैकी एक आहे. हे मंदिर ८०० वर्षांहून अधिक जुने आहे. येथे भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाच्या रूपात विराजमान आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचीही येथे पूजा केली जाते.
रथयात्रेसाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी तीन स्वतंत्र रथ तयार करण्यात आले आहेत. जेव्हा रथयात्रा सुरू होते, तेव्हा बलरामाचा रथ पुढे, देवी सुभद्रा मध्यभागी आणि भगवान जगन्नाथाचा रथ मागे असतो.
बलरामाच्या रथाला तलध्वज म्हणतात. त्याच्या रथाचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदालन किंवा पद्मरथ म्हणतात. ज्याचा रंग काळा किंवा निळा आहे. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणतात ज्याचा रंग लाल किंवा पिवळा आहे.
जेव्हा तिन्ही रथ तयार होतात तेव्हा छर पहानरा नावाचा विधी केला जातो. पुरीचा गजपती राजा पालखीतून येथे येतो आणि या तीन रथांची पूजा करतो आणि नंतर सोन्याच्या झाडूने रथाचा मंडप आणि मार्ग स्वच्छ करतो.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी रथयात्रा सुरू होते. ढोल-ताशा वाजवून भाविक हे रथ ओढतात. असे मानले जाते की, ज्यांना रथ ओढण्याची संधी मिळते ते खूप भाग्यवान असतात. पौराणिक मान्यतेनुसार जो रथ ओढतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.
रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन गुंडीचा मंदिरापर्यंत जाते. येथे पोहोचल्यानंतर भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात. गुंडीचा मंदिरात जेव्हा भगवान जगन्नाथाचे दर्शन होते तेव्हा त्याला आडप दर्शन म्हणतात.
गुंडीचे मंदिर हे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे. याला गुंडीचा बाडी असेही म्हणतात. ही रथयात्रा आषाढ महिन्याच्या दुसर्या दिवशी सुरू होते आणि शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवशी भगवान परत येतात. यासह यात्रेचा प्रवास संपतो.
जगन्नाथ परत आल्यानंतर सर्व मूर्ती रथातच राहतात. एकादशीच्या दुसर्या दिवशी देवतांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. यानंतर विधिवत स्नान करून नामजपाच्या वेळी देवतेची पुनर्स्थापना केली जाते.
∆ जगातील सर्वात जुनी रथयात्रा कोठे भरवली जाते.
श्री जगन्नाथाची पुरीची ही रथयात्रा म्हणजे एक उत्सव आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ही यात्रा साजरी केली जाते. भारतातच नाही तर जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. श्री जगन्नाथाचा हा रथ उत्सव दरवर्षी आषाढ महिन्याच्या, शुक्ल पक्षाच्या द्वितिये पासून ते दशमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. ओडिशातील पुरी शहराच्या मंदिरापासून या यात्रेची सुरुवात होते. श्री जगन्नाथ, मंदिरातील प्रमुख देवता असते.
पुरीची ही रथयात्रा बहुप्रतिक्षित असलेला उत्सव आहे. सारे भक्तगण या रथोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. या रथोत्सवाला कार उत्सव म्हणूनही ओळखले जाते. देशातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला हा हिंदू सण आहे. ज्यामध्ये असंख्य भक्तगण आणि असंख्य स्वयंसेवक रथाची सजावट करतात. रथाची आरास करतात.
संपूर्ण यात्रेचे मुख्य आकर्षण हे तीन रथ असतात, या रथांना दोरांनी ओढले जातात.
पहिला रथ भगवान जगन्नाथाचा असतो. या रथाची उंची ४५ फूट इतकी असून याला १६ चाके असतात. या रथाला "नंदीघोष" असे म्हणतात.
दुसरा रथ भगवान बलभद्राचा असतो. या रथाची उंची ४५ फूट इतकी असून याला १४ चाके असतात. या रथाला "तलध्वज" असे म्हणतात.
तिसरा रथ देवी सुभद्रेचा असतो. या रथाची उंची ४४.६ फूट इतकी असून याला १२ चाके असतात. हा रथाला "देवदलन" या नावाने ओळखले जाते.
• रथयात्रा कधी सुरू झाली?
आपण जगन्नाथ रथयात्रा का साजरी करतो? रथयात्रा कुठे साजरी केली जाते?
पद्मपुराणानुसार भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ही त्यांची आणि बलरामाची लाडकी होती. एकदा सुभद्राने दोन्ही भावांकडे नगरला भ्रमण करण्याची इच्छा व्यक्त केली. ते बहिणीची इच्छा कशी टाळणार, म्हणून दोन्ही भावांनी बहिणीला शहरात फिरायला नेले. दरम्यान, ते त्यांची मावशी गुंडीचा यांच्या घरीही गेले आणि येथे त्यांनी ७ दिवस विश्रांती घेतली. तेव्हापासून भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची परंपरा सुरू झाली. पुरी येथून भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांची यात्रा निघते आणि ती गुंडीचा येथे पोहचते ७ दिवसांनी परत ती पुरी येथे
येते. देवांचे पुन्हा विधिवत विराजमान केले जातात. पूजा विधी होते आणि आषाढ त्रयोदशीला यात्रेचा समापन होते.
• रथयात्रा रथयात्रेची रीत :
आषाढ द्वीतेयेला - यात्रेचा आरंभ होतो. याच दिवशी तिन्ही देवांचे रथ, गुंडीचा मावशीच्या घरी भेट देतात. हेरा पंचमी: पुढील पाच दिवस भगवान गुंडीचा मंदिरात वास्तव्य करतात.
संध्या दर्शन: त्या नंतर श्री जगन्नाथाचे संध्या दर्शन घेतले जाते. या दिवशी दर्शन केल्याने १० वर्षे श्री हरीची पूजा केल्याचे पुण्य मिळते.
बहुदा यात्रा : भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची गुंडीच्या वरून पुन्हा परतीचा प्रवास यात्रा सुरु होते.
दहाव्या दिवशी सर्व देव, जगन्नाथ मंदिरात
परतल्यानंतर पुन्हा शाही रूप धारण करून, आपल्या जागी विराजमान होतात.
नीलाद्री बीजे : गलवार, द्वादशी ला, जगन्नाथ
रथयात्रेतील सर्वात मनोरंजक विधींपैकी एक म्हणजे नीलाद्री बीज. या या नंतर खऱ्या अर्थाने रथ यात्रेची सांगता होते.
"हे प्रभु जगन्नाथ थाम मेरा हाथ,
अपने रथ में ले चल मुझे साथ।
लुभाये न मुझको अब कोई पदार्थ
मेरा तो बस अब एक ही स्वार्थ,
धर्म युद्ध हो या कर्म युद्ध हो
तू बने सारथि, मैं बनूँ पार्थ ।
मैं हूँ अन्जान बन के मेरा नाथ
अपने रथ में ले चल मुझे साथ।”
🙏जय जगन्नाथ🙏