राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी पावसाची एन्ट्री जोरदार होती. यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून पेरण्यांच्या कामाला आता वेग आला आहे. तर अद्यापही राज्यातल्या काही भागांमध्ये मान्सून कमी बरसला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दडी मारून बसलेला वरुणराजा दोन दिवसांपासून विदर्भात बरसू लागला आहे. कुठे दमदार; तर कुठे तुरळक सरी कोसळत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे; पण अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही. कोकण वगळता मराठवाड्यात ३९, विदर्भात ३१; तर मध्य महाराष्ट्रात २९ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. परिणामी धरणांमध्ये केवळ ३० टक्केच पाणीसाठा उरला आहे.राज्यातील 'येलो झोन'मध्ये असलेल्या हिंगोली जिल्ह्यात ८३ टक्के, सांगलीत ७१, अकोला ७०; तर जालना जिल्ह्यात ६२ टक्के कमी पाऊस झाला आहे.
रेड झोन'मध्ये १९ जिल्हे असून, विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, वाशीम, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मृग नक्षत्रात बेपत्ता असलेला पाऊस आर्द्राच्या आगमनाला बरसला. या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नंतर हा पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली. वर्धा जिल्ह्यात दुबार पेरण्या करण्यात आल्या. स्थिती बिकट होऊ लागली असतानाच दोन दिवसांपासून पाऊस परतला आहे.
अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा पावसाच्या आगमनाने सुखावला आहे.अमरावती विभागात ६० टक्के पेरण्याया पावसामुळे अमरावती विभागात ६० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यात ७१.०५ टक्के,