मित्रांनो आज देशात बालकामगारांचे प्रमाण खुपच वाढत चालले आहे.याला कारण कमकुवत आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव ह्या दोन गोष्टी आहेत.
आज देशामध्ये बाजमजदुरीला आळा घालण्यासाठी अनेक कडक कायदे देखील करण्यात आले आहेत.तरी देखील बालमजदुरांची संख्या पाहिजे तेवढी कमी झालेली आपणास दिसुन येत नाही. याला कारण समाजात बालमजदुरी विषयी पाहिजे तेवढी जागृकता नाहीये.
म्हणून समाजामध्ये बालमजदुरी विषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी संपुर्ण जगभर आंतरराष्टीय पातळीवर जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो.
आजच्या लेखात आपण ह्याच बालकामगार विरोधी दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहोण.
बालकामगार म्हणजे काय?
अशी मुले ज्यांचे वय 14 पेक्षा कमी आहे आणि ते आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरीची तसेच इतर जड कामे करतात.अशा बालकांना बालकामगार म्हणुन संबोधिले जाते.
जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी आणि केव्हा साजरा केला जातो?
संपुर्ण जगभरात बालकामगार विरोधी दिन दरवर्षी 12 जुन रोजी साजरा केला जातो.
संपूर्ण जगभरात जागोजागी सुरू असलेल्या बालमजदुरी,बालकामगार प्रथेवर समाजाचे लक्ष केंद्रित करण्याकरीता आणि त्यावर कायमस्वरूपी आळा घालण्याच्या उददिष्टासाठी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो.
बालमजदुरीचे मुख्य कारण काय आहे?
समाजात बालमजदुरीला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो?
● खुप ठिकाणी लोक आपल्या मुलांना लहान वयात कामाला यासाठी पाठवतात की त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजुक असते.घरात एकवेळ खायला अन्न मिळत नाही म्हणजेच गरीबी हे बालमजदुरीचे मुख्य कारण आहे.म्हणू ही गरीबी दुर करण्यासाठी आपण तसेच मुख्यकरून सरकारने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.नाहीतर अनेक लहान मुलांना ह्या गरीबीमुळे बालमजदुरीला बळी पडावे लागेल.
● काही ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्याने बालमजुरी मुलांसाठी किती घातक आहे आणि त्यावर सरकार काय कारवाई करते हे लोकांना माहीती देखील नसते.शिक्षण करणे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किती आवश्यक आहे हे देखील समाजातील काही लोकांना माहीत नसते.म्हणुन आपण अशा लोकांना बालमजुरी किती चुकीचे बेकायदेशीर काम आहे यावर आपल्याला काय शिक्षा होऊ शकते हे समजावून सांगुन त्यांना शिक्षित करायला हवे.
● बालमजदुरी विषयक कडक कायदा हा बालमजदुरीला आळा घालण्याचा अजुन एक उपाय आहे.कारण बालमजदुरीविषयक समाजात कडक कायदा करण्यात आला तर कोणीही कायद्याच्या भीतीने आपल्या दुकानात,कारखान्यात,लहान मुलांना कामाला ठेवणार नाही.
● बालमजदुरीचे अजुन एक कारण म्हणजे लोक अशा गोष्टी डोळयांना दिसुन देखील याकडे दुर्लक्ष करतात याने असे बेकायदेशीर काम करणारयांची हिंमत अजुन वाढते म्हणुन कोणी लहान मुलांकडुन काम करून घेताना दिसुन आल्यास आपण त्वरीत पोलिसात तक्रार करायला हवी.याविरूदध आवाज उठवायला हवा.
● बालमजदुरीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवले गेले पाहिजे.
● ज्या मुलांची शिक्षणाचा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिति नसते अशा गरीब आणि गरजु मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे.