मुलींची मते, त्यांची परवानगी अजिबात लक्षात न घेता, तिला गृहित धरले जातेवआणि मग तिचा नकार आला किंवा तिने फक्त मैत्रीभावनेतूनच नाते ठेवायचे म्हटले,तर मग अहंकारदुखावतो. नकार पचवणे शक्य होत नाही. यातून अॅसिड अटॅक, खून, जाळपोळ यांसारख्या घटना घडतात. त्यानंतर समाज मात्र या मुलींच्या चारित्र्यावर तोंडसुख घेत राहतो. याचा त्यांच्या पाठिमागे राहिलेल्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल,याचा कधीही विचार केला जात नाही.
एकतर्फी प्रेमातून किंवाप्रेमाला नकार दिला म्हणून मुलीची हत्या, ब्रेकअप किंवारिलेशनशिपमध्ये वाद झाले म्हणून हत्या हे आजकाल रोजच्या हेडलाइनचा भाग झाले आहे. दर्शना पवार, सरस्वती वैद्य, अमृता देशपांडे, प्राची झाडे, श्रद्धा वालकर, मोनिका किरणापुरे, रिंकू पाटील, अफसाना चौधरी, अशी मोठी यादी तयार करता येईल. या बातम्या इतक्या रोजच्या झाल्या आहेत,की कदाचित धक्काही बसत नसेल.
अशा घटनांनंतर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, पीडितेच्या, मृत मुलींच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करणारा, मुलींनी कसे वागावे, काय घालावे, कुणाशी मैत्री करावी, प्रेम करावे,की नाही यावर चर्चा झोडणारा, इतर मुलींना उपदेशाचे डोस पाजायला पुढे येणारा समाज. हत्या करणारे पुरुष, हिंसा करणारी मुले यांच्या चारित्र्य, जडणघडणीवर कुणीही बोलत नाहीकिंवा मुलींशी कसे वागावे, नकार कसा पचवावा यावर मुलांना उपदेश करताना दिसत नाहीत. मारेकरी मुस्लिम असेल,तर त्याला धार्मिक रंग दिला जातो; पण मूळ प्रश्नावर बोललं जात नाही की, कामही केले जात नाही.
दर्शना पवार प्रकरणाला स्पर्धा परीक्षेमुळे असूयेचा रंग दिला गेला. महाराष्ट्रात तिसरी आलेली मुलगी इतकी बावळट कशी, मित्र आवडत नव्हता तरी ती एकटी त्याच्यासोबत का गेली किंवा स्वतःच्या यशानंतर तिचे मन बदलले वगैरे. जणू काही य